शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

कार्वेची रताळी पोहोचली परदेशात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST

कऱ्हाड तालुक्यात कृष्णा-कोयना नदी तीरावर वसलेल्या कार्वे शिवारात रताळी हे नगदी पीक म्हणून रब्बी-खरीप हंगामांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ...

कऱ्हाड तालुक्यात कृष्णा-कोयना नदी तीरावर वसलेल्या कार्वे शिवारात रताळी हे नगदी पीक म्हणून रब्बी-खरीप हंगामांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जशी तासगावची द्राक्षे, नागपूरची संत्री, जळगावची केळी, तशी कार्वेची रताळी देशातच काय; पण परदेशातही प्रसिद्ध आहेत.

कार्वेच्या शिवारात रताळी पीक घेतले जाते. रताळी पिकास काळी-तांबडी भुसभुशीत व निचऱ्याची जमीन आवश्यक असते. पूर्वी रताळीचे क्षेत्र मर्यादित होते. उत्पादनसुद्धा तसे जेमतेमच निघत होते. त्यावेळी प्रति एकरी ४ ते ५ टन एवढे उत्पन्न मिळत होते. प्रति क्विंटलचा दर १०० ते १२५ रुपये एवढा मिळत असे. पूर्वी रताळीस कऱ्हाड, कुंडल, मसूर, उंब्रज व मोठी बाजारपेठ सांगली येथे होती. सध्या एकरी रताळीचे उत्पादन ६ ते ७ टन एवढे मिळत आहे. त्यामुळे पुणे, मुंबई बाजारपेठेत किलोला १८ रुपये ते २० रुपये एवढा दर मिळतो. रताळीच्या कार्वे, बदलामपुरी, बेळगावी अशा जाती आहेत. सध्या ऊस उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. कमी खर्चात व कमी व्यापात उसातून प्रति एकरी किमान ५० ते ८० टन एवढे उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. मात्र, ऊस उत्पादनास एक वर्षे ते दीड वर्षाचा कालावधी जातो, तर रताळी पिकास ४ ते ५ महिने कालावधी लागतो. कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे रताळी हे पीक आहे.

रताळी हे प्रथम उपवासाकरिता वापरले जाते. येथील रताळी देशातच नव्हे तर दुबई, चीन, अमेरिका, जपान, फ्रान्स, बल्गेरिया, इटली, इंग्लड आदी देशांत मोठ्या प्रमाणात पाठवली जातात. त्यासाठी पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता येथून एजंटांच्या माध्यमातून ही खरेदी-विक्री होते.

- युवराज मोहिते

- कोट

रताळी हे पीक ४ ते ५ महिन्यांचे नगदी पीक असून, या पिकापासून कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळते, तसेच खर्चही कमी होतो. रताळीस खेड्या-पाड्यांपासून शहरापर्यंत, तसेच देशात सर्वत्र मोठी मागणी आहे. हे पीक चांगले उत्पादन देणारे असून, शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा होत आहे.

- विश्वास थोरात, शेतकरी

- कोट

रताळी पिकाची पूर्वी कुदळीने खांदणी करून काढणी केली जात होती. त्यासाठी मजुरांची आवश्यकता निर्माण होत होती. मात्र, आता आधुनिकीकरणामुळे ट्रॅक्टरच्या फनपाळीच्या अवजाराने रताळीची काढणी होते. त्यामुळे मजुरांचा त्रास कमी झाला आहे.

- राजेंद्र थोरात, शेतकरी

फोटो : १०संडे०६,०७,०८

कॅप्शन : प्रतिकात्मक