शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
5
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
6
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
7
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
8
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
9
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
10
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
11
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
12
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
13
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
14
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
15
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
16
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
17
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
18
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
19
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
20
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

कऱ्हाडचा पारा चाळीस अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:37 IST

कऱ्हाड : कऱ्हाडचा पारा चाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान ४०, तर किमान २१ अंश सेल्सिअस ...

कऱ्हाड : कऱ्हाडचा पारा चाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान ४०, तर किमान २१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. उन्हाच्या झळा वाढल्यामुळे प्रत्येकाचा जीव कासावीस होत असून उकाड्याने हैराण केले आहे.

गत आठवड्यापासून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख मार्ग व बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. नागरिक सूर्यास्तानंतरच खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. यंदा उन्हाची तीव्रता लवकरच जाणवू लागली आहे. मार्च महिन्याच्या मध्यंतरानंतरच उन्हाचा तडाखा जाणवू लागला. उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, छत्रीचा वापर सुरू झाला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तर उन्हाची तीव्रता आणखीनच वाढली आहे. त्याचा दैनंदिन कामावर परिणाम होत आहे. दिवसभर कडक ऊन असते. तसेच उकाडाही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. शेतीची कामे दुपारच्या वेळेत ठप्प होत आहेत. घरात राहूनही उकाडा असह्य होत असल्यामुळे अनेक जण झाडांच्या सावलीत विसावा घेताना दिसून येत आहेत.

सोमवारी हवामान विभागाच्या वतीने कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून, यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान असावे. यापूर्वी गत काही दिवस पारा ३० ते ३४ अंशांवर होता. उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी गॉगल्स, टोप्या, महिलांसाठी सनकोट अशा वस्तूंसह शीतपेयांना मागणी वाढली आहे.

- चौकट

आठवडाभरातील तापमान

दिनांक : कमाल : किमान

२८ मार्च : ३८ : २१

२९ मार्च : ३९ : २०

३० मार्च : ३८ : २०

३१ मार्च : ३९ : १९

१ एप्रिल : ३८ : १९

२ एप्रिल : ३७ : १९

३ एप्रिल : ३७ : २०

४ एप्रिल : ३९ : २२

५ एप्रिल : ४० : २१

(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

- चौकट

अशी घ्याल स्वत:ची काळजी

१) दररोज आठ ते सहा ग्लासापेक्षा जास्त पाणी प्यावे.

२) नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लिंबूपाणी घ्यावे.

३) शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे.

४) फिरताना सोबत छत्री, टोपी बाळगावी.

५) ताजी फळे व फळभाज्यांचे अधिक सेवन करावे.

६) मसालेदार, तेलकट व अतितिखट पदार्थ खाऊ नये.

७) आहारात टरबूज, अननस, गाजर, काकडी यांचा समावेश असावा.

- चौकट

खबरदारी घेणे गरजेचे

उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात होय. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्चपातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याचीदेखील शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी उन्हात फिरताना अथवा काम करताना योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

..............................................................