शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

कऱ्हाडचा पारा चाळीस अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:37 IST

कऱ्हाड : कऱ्हाडचा पारा चाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान ४०, तर किमान २१ अंश सेल्सिअस ...

कऱ्हाड : कऱ्हाडचा पारा चाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान ४०, तर किमान २१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. उन्हाच्या झळा वाढल्यामुळे प्रत्येकाचा जीव कासावीस होत असून उकाड्याने हैराण केले आहे.

गत आठवड्यापासून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख मार्ग व बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. नागरिक सूर्यास्तानंतरच खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. यंदा उन्हाची तीव्रता लवकरच जाणवू लागली आहे. मार्च महिन्याच्या मध्यंतरानंतरच उन्हाचा तडाखा जाणवू लागला. उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, छत्रीचा वापर सुरू झाला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तर उन्हाची तीव्रता आणखीनच वाढली आहे. त्याचा दैनंदिन कामावर परिणाम होत आहे. दिवसभर कडक ऊन असते. तसेच उकाडाही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. शेतीची कामे दुपारच्या वेळेत ठप्प होत आहेत. घरात राहूनही उकाडा असह्य होत असल्यामुळे अनेक जण झाडांच्या सावलीत विसावा घेताना दिसून येत आहेत.

सोमवारी हवामान विभागाच्या वतीने कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून, यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान असावे. यापूर्वी गत काही दिवस पारा ३० ते ३४ अंशांवर होता. उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी गॉगल्स, टोप्या, महिलांसाठी सनकोट अशा वस्तूंसह शीतपेयांना मागणी वाढली आहे.

- चौकट

आठवडाभरातील तापमान

दिनांक : कमाल : किमान

२८ मार्च : ३८ : २१

२९ मार्च : ३९ : २०

३० मार्च : ३८ : २०

३१ मार्च : ३९ : १९

१ एप्रिल : ३८ : १९

२ एप्रिल : ३७ : १९

३ एप्रिल : ३७ : २०

४ एप्रिल : ३९ : २२

५ एप्रिल : ४० : २१

(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

- चौकट

अशी घ्याल स्वत:ची काळजी

१) दररोज आठ ते सहा ग्लासापेक्षा जास्त पाणी प्यावे.

२) नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लिंबूपाणी घ्यावे.

३) शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे.

४) फिरताना सोबत छत्री, टोपी बाळगावी.

५) ताजी फळे व फळभाज्यांचे अधिक सेवन करावे.

६) मसालेदार, तेलकट व अतितिखट पदार्थ खाऊ नये.

७) आहारात टरबूज, अननस, गाजर, काकडी यांचा समावेश असावा.

- चौकट

खबरदारी घेणे गरजेचे

उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात होय. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्चपातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याचीदेखील शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी उन्हात फिरताना अथवा काम करताना योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

..............................................................