शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडचा पारा @ 38 अंश सेल्सिअस !

By admin | Updated: March 2, 2017 23:47 IST

मार्चच्या सुरुवातीलाच हिट : होळीची चाहूल लागताच उन्हाचा तडाखा; शीतपेयांच्या स्टॉलवर वाढली गर्दी

कऱ्हाड : होळीत पोळी पडली की थंडी गायब होते, असं म्हणतात. सध्या होळीचा सण दहा दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र, होळी पेटण्यापूर्वीच उन्हानं रान तापू लागलय. मार्चच्या सुरुवातीलाच पारा ३८ अंशांवर पोहोचलाय. त्यामुळे सकाळी अकरा वाजल्यापासूनच घामाच्या धारा लागतायत. कडक उन्हाळा आणि वातावरणातील उष्णतेमुळे सध्या सर्वजण हैराण झालेत. परिणामी, सावली आणि गारवा मिळविण्यासाठी जो-तो धडपडताना दिसतोय. कऱ्हाड तालुक्याची भौगोलिकदृष्ट्या दोन भागांत विभागणी झाली आहे. तालुक्याचा पश्चिमेकडील भाग सदाहरित असलेला दिसतो. या भागात कृष्णा, कोयना नद्यांना बारमाही पाणी वाहते. तसेच या विभागातील विहिरी, जलसिंचन योजना तसेच कूपनलिकांची संख्याही भरमसाठ आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. याउलट तालुक्याचा पूर्वेकडील भाग दुष्काळी समजला जातो. हा भाग डोंगराने व्यापला आहे. तसेच येथे पाण्याची सोय नाही. कृष्णा कॅनॉल वगळता भागात कोठेही नदी अथवा बारमाही ओढा नाही. विहिरींची पाणी पातळीही डिसेंबरअखेरीस खालावते. तलावातील पाणीही जानेवारीतच तळ गाठते. या भागात काही ठिकाणी जलयुक्त शिवारमधून बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या बंधाऱ्यांचाही विभागाला म्हणावा तेवढा फायदा होत नाही. परिणामी, तालुक्यातील सुर्ली व शामगावचा घाट ओलांडताच उन्हाळ्याची मोठ्या प्रमाणात जाणीव होते. या भागात बसणाऱ्या झळा सर्वांनाच हैराण करतात. सध्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. सकाळी अकरा वाजल्यापासूनच उन्हाचा पारा वाढायला सुरुवात होते. भरदुपारी रस्त्यावर येताच घामाच्या धारा सुरू होतात. सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत कडक ऊन जाणवते. या कालावधीत रस्तेही ओस पडत असल्याचे सध्या दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करणारे हेल्मेट घालून अथवा डोक्यावर रूमाल टाकूनच मार्गस्थ होतायत. तसेच कडक उन्हात गारवा मिळावा, यासाठी सरबत तसेच ज्युसच्या गाड्यांवर गर्दी होताना दिसते.बाजारपेठेमध्ये सध्या विविध प्रकारच्या सरबतांबरोबर लिंंबू, कोकम, उसाचा रस, ताक, लस्सी, नारळ पाणी, ताज्या फळांचा रस यासारखे थंडगार पेय उपलब्ध झाली आहेत. सरबत तयार करताना साखरेच्या पाकात नारंगी, हिरवा, निळा यासारखे रंग टाकले जात आहेत. त्यामुळे सरबतांना आकर्षक रंगही प्राप्त होत आहे. अशा रंगीबेरंगी सरबतांची मागणीही सध्या वाढली आहे. याशिवाय नारळ पाणी, कलिंगडांच्या फोडींनाही मोठी मागणी असल्याचे दिसते. शहरात बसस्थानक परिसर, उपजिल्हा रुग्णालय परिसर, दत्त चौक, भाजी मंडई परिसर अशा ठिकाणी कलिंगड विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ठेवले आहेत. तर कलिंगडासोबत द्राक्षेही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. ऐंशी ते शंभर रुपये किलो दराने द्राक्षांची विक्री केली जात आहे.प्रत्येक ऋतूचे काही विशेष असतात. या ऋतूची गरजही वाटते आणि त्याचवेळी तो नकोसा वाटतो. कडाक्याच्या थंडीनंतर उबदार ऊन पडले की, सुखद वाटते. परंत ही भावना वैशाखापर्यंत टिकत नाही. हा वैशाख वणवा जोरात असताना अंगाची लाहीलाही होते. उष्णतेचाही खूप त्रास होतो. घराबाहेर पडणे आणि फिरणे अवघड होऊन बसते. त्याचवेळी उष्माघाताचा तडाखा बसून झालेल्या त्रासाच्या बातम्या ऐकायला मिळतात. या काळात अनेक गोष्टी टाळणे गरजेचे असते. त्या टाळल्यास आरोग्य उत्तम राहते. (प्रतिनिधी)