शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

कऱ्हाड पालिकेतही म्हणे मैत्रिपर्वाचा ‘फॉर्म्युला’!

By admin | Updated: July 25, 2016 23:35 IST

आघाड्या टिकणार की बिघडणार : उंडाळकर-रेठरेकरांच्या ‘गुगली’ने प्रस्थापित पुढाऱ्यांसह कार्यकर्तेही अस्वस्थ

प्रमोद सुकरे -- कऱ्हाड --गेल्या आठवड्यात कऱ्हाडात उंडाळकर, रेठरेकरांच्या मैत्रीपर्वाचा एक मेळावा झाला. निमित्त होतं. मैत्रिपर्वाने जिंकलेल्या निवडणुकीतील विजयी कारभाऱ्यांच्या सत्काराचं! पण या सत्कार समारंभात विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. सुरेश भोसले रेठरेकर यांनी आगामी पालिका निवडणुकीत हे मैत्रिपर्व तसेच कायम राहील, अशी ‘गुगली’ टाकल्याने कऱ्हाडातील प्रस्थापित पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता मात्र पसरली आहे. कऱ्हाड नगरपरिषद गेल्या विधानसभा निवडणुकीपासून दक्षिण विधानसभा मतदार संघात समाविष्ट झाली आहे. यापूर्वी पालिका उत्तर विधानसभा मतदार संघात होती. त्यामुळे उंडाळकर पाटलांचा शहराशी तसा संबंध आला नाही. अन् दक्षिणेतील पाटलांचा अन् उत्तरेतील पाटलांचा तसा अलिखित करारच होता की एकमेकांच्या कार्यक्षेत्रात कुणी हस्तक्षेप करायचा नाही. पण गेल्या विधानसभेला कऱ्हाड शहर दक्षिणेत आले अन् उंडाळकरांच्या पदरात सगळ्यात कमी मतरूपी ‘दक्षिणा’ मिळाली. त्यामुळे भविष्यातील राजकारणासाठी त्यांना शहरात हातपाय पसरणे गरजेचेच आहे. अन् त्यांना तेवढेच साध्य करायचे आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मैत्रिपर्वातले दुसरे शिलेदार असणाऱ्या रेठरेकरांनी यापूर्वी सन २००६ मध्ये छुप्या पद्धतीने पालिकेच्या निवडणुकीत ‘एन्ट्री’ केली. अनेक अपक्षांना रसद पुरवून गनिमी कावा केला. निकालानंतर निवडून आलेल्या तीन अपक्षांनी भोसलेंचे आशीर्वाद घेण्यासाठी कृष्णा ट्रस्ट गाठले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण कृष्णा विकास आघाडी अस्तित्वात आली. या तीन अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या गेल्या अन् पुढचं राजकारण सर्वांना माहीतच आहे. त्यानंतरही भोसले कंपनी कऱ्हाडच्या राजकारणात हस्ते परहस्ते सक्रिय राहिली. मात्र, भाजपचं कमळ हातात घेतलेल्या डॉक्टरांना विधानसभेला प्रथम क्रमांकाची मते शहराने दिली नाहीत. कऱ्हाड शहराच्या राजकारणात आजवर दिवंगत पी. डी. पाटील गटाचाच प्रभाव अधिक राहिल्याचे पाहायला मिळते. त्याला जनशक्ती आघाडी, नगरविकास आघाडी आदींच्या माध्यमातून दिवंगत जयवंतराव जाधव, माजी नगराध्यक्ष शारदा जाधव, अरुण जाधव, दिवंगत द. शि. एरम, सुभाषराव जोशी आदींनी त्या-त्या काळात छेद देण्याचा प्रयत्न केला; पण अपवाद वगळता यांना तितकेसे यश मिळाल्याचे दिसत नाही. सध्याच्या शहराच्या राजकारणात हे पारंपरिक स्पर्धक निवडणुकीची चाचपणी करीत आहेत. मूळच्या कोणकोणत्या आघाड्यात बिघाड्या होणार? नव्या आघाड्या कशा होणार? कोण कोणाकडे जाणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात असतानाच उलट सुलट चर्चा सुरू असतानाच, मैत्रिपर्वाच्या नेत्यांनी टाकलेल्या गुगलीने पुढाऱ्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे.मतदार बाहेरच्या नेत्यांना स्वीकारणार का?कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत नेमक्या कशा प्रकारे आघाड्या होणार हे अद्याप अस्पष्ट आहे. पण या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध आघाड्यांचे प्रमुख चाचपणी करीत आहेत. त्यामुळे शहरातील नेहमीचीच नेतृत्व सोडून मतदार बाहेरच्या या नेत्यांना स्वीकारणार का, हे पाहावे लागेल. उदयदादाही म्हणतायत,‘वेट अ‍ॅण्ड वॉच’माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी कऱ्हाड पालिकेत मैत्रिपर्व असेच राहणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतर रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना छेडले असता. नेत्यांनी घेतलेला निर्णय राबविणे एवढेच आपले काम करणे, असे सांगत पालिका निवडणुका घडामोडीबाबत जरा थांबा व पाहा चित्र स्पष्ट होईलच, अशी प्रतिक्रिया दिली.