शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कासचे पाणी गतवर्षीपेक्षा दोन फुटाने कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:03 IST

पेट्री : साताऱ्याला पाणीपुरवठा करत असलेल्या कास तलाव परिसरात दोन आठवड्यांत दोन ते तीन वेळा मोठा पाऊस आणि अधूनमधून ...

पेट्री : साताऱ्याला पाणीपुरवठा करत असलेल्या कास तलाव परिसरात दोन आठवड्यांत दोन ते तीन वेळा मोठा पाऊस आणि अधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे. तरीही पाणीपातळीत केवळ दीड फुटाने वाढ झाली. कास तलावात पाच फूट पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी यावेळी तलावात सात फूट पाणीसाठा शिल्लक होता.सातारा शहराला पाणीपुरवठा करणाºया कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. मागील पंधरवड्यात कास तलावात केवळ साडेतीन फूट पाणीसाठा शिल्लक राहिला होता. कास तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडा पडला आहे. साताºयाला अंतिम तिसºया व्हॉल्वद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून मध्यम स्वरुपात तसेच दोनवेळा जोरदार पाऊस पडला. या पावसाने तलावाच्या पाणीपातळीत दीड फुटाने वाढ होण्यास मदत झाली आहे.पावसाचा जोर अद्याप समाधानकारक नसल्याने सातारकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. सध्या तलावात पाणी पातळी वाढू लागल्याने पाणी टंचाईची समस्या दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदा अवकाळी पावसाने बराच कालावधी ओढ दिल्याने व उन्हाची तीव्रता जास्त असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तलावात दोन फुटाने पाणीसाठा कमी शिल्लक आहे. मागील आठवड्यात दोन वेळा मान्सूनपूर्व पाऊस चांगल्या स्वरुपात पडला. तरीही तलावातील पाणी पातळीत वाढ झाली नव्हती; परंतु जमिनीची धर धरण्यास मदत झाली होती. त्यानंतर दोनवेळा चांगल्या स्वरुपात पाऊस झाल्याने तलावाच्या पाणीपातळीत आत्तापर्यंत दीड फुटाने वाढ झाली. अधूनमधून पाऊस पडत असला तरी दमदार पावसाची आवश्यकता आहे. तोपर्यंत सातारकरांनी पाण्याची काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. तरच पाणी पुरणार आहे.पाऊस पडेपर्यंत बचतीची गरजसध्या कास तलावात पाच फूट पाणीसाठा शिल्लक असून, दोनवेळा मोठ्या स्वरुपात पाऊस झाल्याने आत्तापर्यंत दीड फुटाने पाणीसाठा वाढला आहे. सातारकरांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी लवकरात लवकर मान्सूनचा पाऊस सुरू होणे आवश्यक आहे. तोपर्यंत नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन पाटकरी जयराम कीर्दत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.