शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘काकस्पर्श’ होईना.. गावावर म्हणे कावळा रुसलाय!

By admin | Updated: September 26, 2016 00:12 IST

जखिणवाडीसह तीन गावांतील स्थिती : देवतांच्या मूर्ती रंगविल्या; शांतता विधीही केला, अंधश्रद्धेला खतपाणी, कावकाव ऐकण्यासाठी ग्रामस्थांचा प्रयत्न

संजय पाटील ल्ल कऱ्हाड पितृपक्ष पंधरवड्यामुळे सध्या गावोगावी कावळ्यांना नैवेद्य दिला जातोय. बहुतांश गावात या नैवेद्याला ‘काकस्पर्श’ही होतोय; पण कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी गावचं दुखणं वेगळंच आहे. या गावातील स्मशानभूमीकडे गेल्या पंचवीस वर्षांत कावळाच फिरकलेला नाही. त्यामुळे गावावर कावळे रुसलेत, अशी अंधश्रद्धाच येथे पसरलीय. कावळ्यांना ‘खूश’ करण्यासाठी गावाने हरतऱ्हेचे प्रयत्न केलेत; मात्र परिस्थिती बदललीच नाही. जखिणवाडीची स्मशानभूमी. वेळ सकाळी दहा ते अकराची. अंत्यविधीसाठी ठाव मांडलेला; पण दूरवर कावळ्यांचा मागमूसही नाही. ग्रामस्थांनीही पूर्वानुभवाने हेच गृहित धरलेलं. अखेर गाईने नैवेद्य शिवला अन् आप्तस्वकीय, पै-पाहुण्यांसह भावकी मार्गस्थ झाली. गावात हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. गेल्या पंचवीस वर्षांत एकही ‘ठाव’ कावळ्याने शिवला नसल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात. नदीकाठावर गर्द झाडीत स्मशानभूमी असूनही नैवेद्य शिवायला कावळा येत नाही, हीच सल ग्रामस्थांच्या मनात आहे. सर्वसाधारणपणे गर्द झाडी व नदीकाठच्या विस्तारलेल्या झाडांवर कावळ्यांचे वास्तव्य असते. उंच झाडावर फांदीच्या बेचक्यात हा पक्षी काट्याकुट्यांचे ओबडधोबड घरटे बांधतो़ तेथेच तो समूहाने वास्तव्य करतो; पण सध्या काट्याकुट्याची घरटी ओकीबोकी पडलीयेत. कावळा दृष्टीस पडणे दूरच; पण दूरवरून त्याची ‘कावकाव’ही ऐकायला येत नाही. कावळे गावावर रुसलेत, अशी अंधश्रद्धाच येथे निर्माण झालीय. कावळ्यांना खूश करण्यासाठी अंधश्रद्धेतून येथे अनेक मार्ग काढले जातायत़ वेगवेगळे विधी केले जातायत; पण परिस्थिती बदलत नाही, असे येथील ग्रामस्थ सांगतात. ‘कावळ्यांची संख्या कमी झाली, असं म्हणावं तर शिवारात कावळे दिसतात. मात्र, ते स्मशानभूमीकडे फिरकत का नाहीत, याचं कोडं आम्हाला उलगडेना.’ जखिणवाडीचे माजी सरपंच रामराव नांगरे-पाटील ‘लोकमत’ला सांगत होते़, ‘एका ज्योतिषानं सांगितल्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी आम्ही गावातील सर्व देवतांच्या मूर्ती रंगविल्या़ स्मशानभूमीत शांतता विधी केला; पण कावळ्यांची नाराजी दूर झालेली नाही़ सर्व देवतांना नैवेद्य देऊनही या समस्येतून मार्ग निघालेला नाही़’ तालुक्यातील चचेगावातही हीच स्थिती आहे़ कावळे रुसल्याचा समज करून घेऊन ग्रामस्थ ‘उपाय’ शोधण्याच्या मार्गावर आहेत़ ‘काही वर्षांपूर्वी अंत्यविधीचा नैवेद्य शिवायला एकतरी कावळा यायचा; पण सध्या स्मशानभूमीत एकही कावळा दिसत नाही. अंत्यविधीवेळी कावळ्याची वाट पाहणंच आता आम्ही सोडून दिलंय़, असं तेथील ग्रामस्थ सांगतात. नारायणवाडीतही कावळ्याची वाट पाहत नाहीत. वाट पाहणं व्यर्थ ठरतंय, असं ग्रामस्थांचंही मत आहे. अंत्यविधीवेळी ग्रामस्थ गाय घेऊन येतात. गाईने नैवेद्य शिवला तर ठिक नाही तर तो नदीपात्रात सोडला जातो, असं काही ग्रामस्थ सांगतात. डोमकावळा अन् गावकावळा... कावळा हा पक्षी वर्गाच्या ‘काक’ कुलातील पक्षी आहे़ ‘गावकावळा’ व ‘डोमकावळा’ असे त्याचे दोन प्रकार आहेत़ गावकावळ्याच्या रंगात किंचित हिरवट, निळसर किंवा जांभळ्या रंगाची झाक असते़ मानेभोवती, पाठीकडे आणि छातीवर करडा किंवा राखाडी रंग असतो़ डोमकावळा दणकट असतो़ त्याची चोच अधिक धारदार आणि बळकट असते़ तसेच सर्वांगावर चकचकित काळाभोर रंग असतो़ दीड वर्ष स्मशानभूमीत नैवेद्य जखिणवाडीच्या ग्रामस्थांनी कावळ्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केलेत. स्मशानभूमीत दररोज नैवेद्य ठेवावा, असे एकदा सांगण्यात आले. त्यानुसार ग्रामस्थांनी सलग दीड वर्ष दररोज स्मशानभूमीत गोडाचा नैवेद्य ठेवला. दररोज एका घरातून हा नैवेद्य जायचा. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही. एकही नैवेद्य कावळ्याने शिवला नाही. सर्वभक्षी असूनही कावळा गायब! कावळा सर्वभक्षीय आहे़ त्यामुळे भक्ष्य उपलब्ध नसल्याने त्याची संख्या घटली, असे म्हणणे उचीत ठरणार नाही़ ‘स्वच्छतादूत’ म्हणून हा पक्षी परिचित आहे़ तसेच छोट्या पक्ष्यांची पिले तो खातो़ पिकांवरील कीटकनाशकांच्या वापरामुळे कावळ्यांवर दुष्परिणाम झाला असल्याने त्यांची संख्या घटल्याचा एक निष्कर्ष काढण्यात आला आहे. पण हेच मूळ कारण आहे का, याची कारणमीमांसा करण्याचे आव्हान पक्षीतज्ज्ञांसमोर आहे़ खाद्य आणि सुरक्षितता असेल त्याठिकाणी कावळा हमखास असतो. तो सर्वभक्षी आहे. शिवारात मोठ्या प्रमाणावर खाद्य असेल तर कावळे स्मशानभूमीकडे फिरकत नसावेत किंवा स्मशानभूमी परिसरात त्यांना सुरक्षितता वाटत नसावी. कीटकनाशकांच्या अती वापराचा पक्ष्यांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, कावळ्यांची संख्या कमी झाली असे म्हणता येत नाही. सर्वत्र कावळ्यांचे वास्तव्य व वावर आहे. - सुधीर कुंभार, संचालक, एम. एन. रॉय पर्यावरण संस्था जखिणवाडी गावावर कावळ्यांचा रुसवा आहे. आजपर्यंत याबाबत आम्ही अनेकांचे मार्गदर्शन घेतले आहे. गावची स्मशानभूमी गर्द झाडीत आहे. मात्र, या झाडीत एकही कावळा येत नाही. याचे कारण अद्याप आम्हाला समजलेले नाही. अनेक वर्षांपासून ही परिस्थिती आहे. - रामदादा पाटील, ग्रामस्थ, जखिणवाडी