शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या पाच तासांत भरला डेरवण पाझर तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST

चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात चाळीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच बुधवारी पडलेल्या जोरदार पावसाने डेरवण पाझर तलाव अवघ्या पाच ...

चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात चाळीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच बुधवारी पडलेल्या जोरदार पावसाने डेरवण पाझर तलाव अवघ्या पाच तासांत पूर्ण क्षमतेने भरला. पाणी सांडव्यावरुन वाहू लागले आहे. त्यामुळे विभागातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हला गळती लागल्याने किती काळ हा पाणीसाठा तलावात राहणार, हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.

वाघजाईवाडी व डेरवण हद्दीत हा तलाव उभारण्यात आला आहे. १९७८मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत या तलावाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली होती. तब्बल दोन वर्षांनी १९८०मध्ये तलावाचे काम पूर्णत्वास गेले होते. ४५ एमसीएफटी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या तलावाला १९८५मध्ये तडे गेले होते. त्यामुळे हा तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली होती.

वाघजाईवाडी, खोनोली, मधलीवाडी, डेरवण, गमेवाडी, दाढोली येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून भराव टाकून तलाव भक्कम केला होता. या तलावाच्या पाण्यावर चाफळ विभागातील दाढोली खोऱ्यासह कऱ्हाड तालुक्यातील खालकरवाडी, चरेगाव, उंब्रज परिसरातील हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळते. कऱ्हाड, पाटण तालुक्यातील शेत जमिनीला पाणी मिळावे, या हेतूने डेरवण पाझर तलावाला मंजुरी देण्यात आली होती. या तलावामुळे शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटतो. तलावाच्या पाण्यावर परिसरातील शेतकरी उन्हाळी पिके घेऊन आपले आर्थिक जीवनमान सुधारतात. परंतु, पाणी साठवण विहिरीसह व्हॉल्व्हची दुरवस्था झाल्याने पाणीसाठा कमी होऊ लागला आहे.

या तलावाची देखभाल कोयना जलसिंचन लघु पाटबंधारे खात्यांतर्गत तारळी-चाफळ सिंचन लघु पाटबंधारे खात्यामार्फत केली जाते. या पाझर तलावाची उंची कमी असल्याने आणि गळतीमुळे पाणीसाठ्याचे प्रमाण घटले आहे. त्यातच शासनाचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. हा तलाव उन्हाळ्यात कोरडा पडतो. या तलावाचे पाणी उत्तरमांड नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे चाफळ, माजगाव, कऱ्हाड तालुक्यातील खालकरवाडी गावच्या शेतीला पाणी पुरत होते. हे पाणी पुरत नसल्याने या बंधाऱ्याची उंची वाढवून व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.