शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

संघर्ष यात्रा म्हणजे पन्नास वर्षांचे पाप

By admin | Updated: April 23, 2017 22:42 IST

सदाभाऊ खोत यांची टीका : विरोधकांच्या काळात आंदोलनावेळी शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचे काम

पाटण : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी शासनाने गेल्या ५० वर्षांच्या सत्तेत शेतकऱ्यांसाठी कोणतीही गुंतवणूक केली नाही. नवीन तंत्रज्ञान आणले नाही. आता कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढत असून,त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा यायला लागला आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलने केली तेव्हा त्यांना गोळ्या घालण्याचे काम त्यांच्याच सरकारने केले. म्हणूनच आजची संघर्ष यात्रा म्हणजे ५० वर्षांचे पाप आहे,’ अशी परखड टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. दौलतनगर, ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र शासन, देसाई कारखाना यांच्या वतीने आयोजित दौलत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री खोत म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी भाजीपाला नियमनमुक्ती विधेयक मंजूर करून घेतल्यानंतर राज्यातील शेतकऱ्याला त्याचा शेतीमाल कुठेही विकण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळेच मुंबई शहरात शंभर ठिकाणी शेतकऱ्यांचे बाजार सुरू झाले आहेत. ऐवढंच काय मंत्रालयात पायरीवर सुद्धा शेतकरी शेतीमाल विकू शकतात. जलयुक्त शिवार योजनेतून पाण्याचा थेंब न् थेंब साठविता आला पाहिजे. म्हणून ५२ कोटी रुपये उभे केले आहेत. नाबार्डच्या माध्यमातून ३ लाख हेक्टर जमीन ठिबकखाली आली पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’ या कार्यक्रमास रविराज देसाई, अ‍ॅड. मिलिंद पाटील, अशोकराव पाटील, नारायण शिसोदे, जितेंद्र शिंदे, अ‍ॅड. डी. पी. जाधव, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, गटविकास अधिकारी के.एस. गौतम, कृषी अधिकारी चांगदेव बागल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) पृथ्वीराज चव्हाण लक्ष्य...‘आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले. ७० हजार कोटी रुपये काँग्रेस सरकारने शेती व पाण्याच्या योजनांसाठी खर्च केल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगतात. तर मग आज ०.२० टक्के जमीनसुद्धा इरिगेशनच्या माध्यमातून ओलिताखाली आलेली नाही असे सांगत टीका केली. भाजप-सेना युतीचे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त कसे करता येईल, याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत,’ असे आमदार शंभूराज देसाई म्हणाले.