शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

संघर्ष यात्रा म्हणजे पन्नास वर्षांचे पाप

By admin | Updated: April 23, 2017 22:42 IST

सदाभाऊ खोत यांची टीका : विरोधकांच्या काळात आंदोलनावेळी शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचे काम

पाटण : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी शासनाने गेल्या ५० वर्षांच्या सत्तेत शेतकऱ्यांसाठी कोणतीही गुंतवणूक केली नाही. नवीन तंत्रज्ञान आणले नाही. आता कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढत असून,त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा यायला लागला आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलने केली तेव्हा त्यांना गोळ्या घालण्याचे काम त्यांच्याच सरकारने केले. म्हणूनच आजची संघर्ष यात्रा म्हणजे ५० वर्षांचे पाप आहे,’ अशी परखड टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. दौलतनगर, ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र शासन, देसाई कारखाना यांच्या वतीने आयोजित दौलत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री खोत म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी भाजीपाला नियमनमुक्ती विधेयक मंजूर करून घेतल्यानंतर राज्यातील शेतकऱ्याला त्याचा शेतीमाल कुठेही विकण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळेच मुंबई शहरात शंभर ठिकाणी शेतकऱ्यांचे बाजार सुरू झाले आहेत. ऐवढंच काय मंत्रालयात पायरीवर सुद्धा शेतकरी शेतीमाल विकू शकतात. जलयुक्त शिवार योजनेतून पाण्याचा थेंब न् थेंब साठविता आला पाहिजे. म्हणून ५२ कोटी रुपये उभे केले आहेत. नाबार्डच्या माध्यमातून ३ लाख हेक्टर जमीन ठिबकखाली आली पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’ या कार्यक्रमास रविराज देसाई, अ‍ॅड. मिलिंद पाटील, अशोकराव पाटील, नारायण शिसोदे, जितेंद्र शिंदे, अ‍ॅड. डी. पी. जाधव, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, गटविकास अधिकारी के.एस. गौतम, कृषी अधिकारी चांगदेव बागल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) पृथ्वीराज चव्हाण लक्ष्य...‘आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले. ७० हजार कोटी रुपये काँग्रेस सरकारने शेती व पाण्याच्या योजनांसाठी खर्च केल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगतात. तर मग आज ०.२० टक्के जमीनसुद्धा इरिगेशनच्या माध्यमातून ओलिताखाली आलेली नाही असे सांगत टीका केली. भाजप-सेना युतीचे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त कसे करता येईल, याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत,’ असे आमदार शंभूराज देसाई म्हणाले.