शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

संघर्ष यात्रा म्हणजे पन्नास वर्षांचे पाप

By admin | Updated: April 23, 2017 22:42 IST

सदाभाऊ खोत यांची टीका : विरोधकांच्या काळात आंदोलनावेळी शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचे काम

पाटण : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी शासनाने गेल्या ५० वर्षांच्या सत्तेत शेतकऱ्यांसाठी कोणतीही गुंतवणूक केली नाही. नवीन तंत्रज्ञान आणले नाही. आता कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढत असून,त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा यायला लागला आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलने केली तेव्हा त्यांना गोळ्या घालण्याचे काम त्यांच्याच सरकारने केले. म्हणूनच आजची संघर्ष यात्रा म्हणजे ५० वर्षांचे पाप आहे,’ अशी परखड टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. दौलतनगर, ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र शासन, देसाई कारखाना यांच्या वतीने आयोजित दौलत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री खोत म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी भाजीपाला नियमनमुक्ती विधेयक मंजूर करून घेतल्यानंतर राज्यातील शेतकऱ्याला त्याचा शेतीमाल कुठेही विकण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळेच मुंबई शहरात शंभर ठिकाणी शेतकऱ्यांचे बाजार सुरू झाले आहेत. ऐवढंच काय मंत्रालयात पायरीवर सुद्धा शेतकरी शेतीमाल विकू शकतात. जलयुक्त शिवार योजनेतून पाण्याचा थेंब न् थेंब साठविता आला पाहिजे. म्हणून ५२ कोटी रुपये उभे केले आहेत. नाबार्डच्या माध्यमातून ३ लाख हेक्टर जमीन ठिबकखाली आली पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’ या कार्यक्रमास रविराज देसाई, अ‍ॅड. मिलिंद पाटील, अशोकराव पाटील, नारायण शिसोदे, जितेंद्र शिंदे, अ‍ॅड. डी. पी. जाधव, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, गटविकास अधिकारी के.एस. गौतम, कृषी अधिकारी चांगदेव बागल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) पृथ्वीराज चव्हाण लक्ष्य...‘आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले. ७० हजार कोटी रुपये काँग्रेस सरकारने शेती व पाण्याच्या योजनांसाठी खर्च केल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगतात. तर मग आज ०.२० टक्के जमीनसुद्धा इरिगेशनच्या माध्यमातून ओलिताखाली आलेली नाही असे सांगत टीका केली. भाजप-सेना युतीचे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त कसे करता येईल, याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत,’ असे आमदार शंभूराज देसाई म्हणाले.