शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार हा समाजाचा आरसा : श्रीनिवास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:04 IST

पाटण : ‘पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील विविध घटकांचे दुखणे जाणून घेऊन तो त्यावर आवाज उठवतो. खरा पत्रकार समाजामध्ये प्रमुख भूमिका बजावत असतो. पत्रकारिता टिकली पाहिजे. राज्यातील पत्रकारांचा हा मेळावा म्हणजे आमची आषाढी एकादशी आहे,’ असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले.पाटण येथे रविवार राज्यातील पत्रकार संघांच्या ...

पाटण : ‘पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील विविध घटकांचे दुखणे जाणून घेऊन तो त्यावर आवाज उठवतो. खरा पत्रकार समाजामध्ये प्रमुख भूमिका बजावत असतो. पत्रकारिता टिकली पाहिजे. राज्यातील पत्रकारांचा हा मेळावा म्हणजे आमची आषाढी एकादशी आहे,’ असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले.पाटण येथे रविवार राज्यातील पत्रकार संघांच्या तालुकाध्यक्षांचा राज्यस्तरीय मेळावा व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, मनसेचे राज्यसरचिटणीस संदीप देशपांडे, भाजपचे भरत पाटील, सारंग पाटील, परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘पत्रकार समाजाचा डोळा असतो. तो चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी देतो. त्याचबरोबर वाईट गोष्टीही समाजासमोर मांडतो. मनोरंजनाबरोबरच दैनिकातून शिक्षण देण्याचे काम केले जाते. वर्तमानातील माहिती आणि भविष्याचे संकेत देण्याचे काम वर्तमानपत्रे करत आहेत.’जयंत पाटील म्हणाले, ‘पत्रकारांना आपल्या मागण्यांसाठी अनेक कष्ट घ्यावे लागत आहेत, ही खेदाची बाब आहे. राज्य शासन करत असलेल्या कामातील त्रुटींची माहिती वर्तमानपत्रातून कळते. पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही खेदाची बाब आहे. आजच्या पत्रकाराला विविध दहशतीतून जावे लागत आहे. ’आठ संघांना आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून गौरविण्यात आले. दुपारच्या सत्रात ‘आमचे प्रश्न आमच्या व्यथा’ यातून ग्रामीण पत्रकांराना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत संवाद साधण्यात आला. आमदार शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आदींनी मनोगत व्यक्त केले. शंकर मोहिते यांनी स्वागत केले. शरद काटकर यांनी प्रास्ताविक केले. शरद पाबळे यांनी आभार मानले