शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

उकाड्याने केली रोजगार निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : उकाड्याने शरीराची लाहीलाही होत असताना शहर परिसरातील शेतकऱ्यांनी यातून रोजगार निर्मिती केली आहे. सातारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : उकाड्याने शरीराची लाहीलाही होत असताना शहर परिसरातील शेतकऱ्यांनी यातून रोजगार निर्मिती केली आहे. सातारा कोंडवे रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी रसवंती गृहे थाटून यातून व्यवसाय निर्मिती केली आहे.

सातारा शहर व आजूबाजूच्या उपनगरांत पन्नासहून अधिक रसवंती गृहे पाहावयास मिळतात. यंदा मार्च महिन्यामध्येच उकाड्याचे प्रमाण वाढले आहे.

सातारा शहर सोडून महाबळेश्वरच्या दिशेने निघाले की या मार्गावर अनेक रसवंती गृहे दिसतात. प्रत्येक ठिकाणी रसवंती गृहांवर गर्दी दिसते. उकाड्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. विशेष म्हणजे, कोंडवे येथील शेतकऱ्यांनी लाकडी चरक बसविले आहेत. तिथे बैल लाकडी चरक ओढताना दिसतो. कोंडवे येथील प्रकाश सरडे यांनी अशा प्रकारचा चरक बसविला आहे. त्यामुळे रस काढण्याचे काम सोपे होते. ग्राहकसुद्धा टकमक या बैलाकडे व लाकडी चरकाकडे पाहत बसतात. उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा रस आरोग्याला चांगला असतो; त्यामुळे अन्य शीतपेये पिण्यापेक्षा नागरिक उसाच्या रसाला प्राधान्य देतात.

या रस्त्यावरून जाणारे प्रवासी रोज साधारणत: ५०० लिटर उसाचा रस फस्त करतात. एका दिवसाचा एका व्यावसायिकाचा गल्ला हजार रुपयांच्या पुढे असतो, असे येथील व्यावसायिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. (वार्ताहर)

उन्हाळा सुरू होताच आम्ही हा लाकडी चरक बैलासकट घेऊन मेढा-महाबळेश्वर रस्त्याला रानात लावतो. दोन-तीन महिन्यांच्या या कालावधीत रसवंती गृहात चांगला मोबदला मिळतो. घरात हातभार लागतो.

- प्रकाश मतकर, कोंडवे

आम्ही गेली दोन-तीन वर्षे सतत उन्हाळा लागला की या रसवंती गृहात थांबतो. आकर्षण म्हणजे बैलाच्या साह्याने रस काढून दिला जातो. यासाठी शहरी भागातील ग्राहकांची संख्या वाढती आहे.

- वनिता शिंगटे, गोगावलेवाडी

..............