शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिहे-कठापूरचे पाणीपूजन युतीच करेल

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

विजय शिवतारे : वडूज येथील जाहीर मेळाव्यात व्यक्त केला विश्वास

वडूज : ‘युती शासनाच्या काळात मंजूर झालेली उरमोडी व जिहे-कठापूरची योजना पूर्ण करण्यासाठीच नियतीने युतीचे सरकार सत्तेवर आणले आहे. भविष्यात पाण्याचे पूजनही युतीच्या मंत्र्यांच्या हस्तेच होणार आहे,’ असा विश्वास पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.खटाव तालुका शिवसेना व रणजितसिंंह देशमुख मित्र मंडळातर्फे वडूज बाजार पटांगणावर आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, माजी आमदार दिलीप येळगांवकर, शिवसेना नेते रणजितसिंंह देशमुख, जिल्हाध्यक्ष नंदकुमार घाडगे, हर्षल कदम, गणेश रसाळ, अनिल सुभेदार, संजय भोसले, माजी सभापती शिवाजी पवार, वसंत गोसावी, हणमंतराव देशमुख, युवराज पाटील, प्रताप जाधव उपस्थित होते.मंत्री शिवतारे म्हणाले, ‘युतीच्या काळात सुरू झालेल्या बहुतांशी योजना त्या-त्या काळात सुरू झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील दोघांना जलसंपदा खाते मिळूनसुध्दा त्यांच्या संकुचीत दृष्टीकोनामुळे जिहे-कठापूर योजना रखडली आहे. याच मंडळींनी योजनेच्या कामाबाबत आंदोलनाचे इशारे देत कोल्हेकुई सुरू केली आहे. कोरेगांव व माणच्या आमदारांनी यासंदर्भात भाष्य करताना गेल्या पाच वर्षांत आपल्याकडे सर्व सत्ता असताना योजनेसाठी काय दिवे लागले याचे आत्मपरिक्षण करावे. जिहे-कठापूर, उरमोडी, टेंभू, तारळी या रखडलेल्या योजनांची कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण व्यक्तिगत लक्ष घालणार आहोत.’ दुष्काळी तालुक्यातील शेती-पाणी व इतर विकासकामासाठी पालकमंत्री शिवतारे यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी रणजितसिंह देशमुख यांनी केली. ते म्हणाले, ‘प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आता सरकार बदलले आहे. हे ध्यानात ठेवावे. चांगल्या कामात आमचे प्रशासनाचे सहकार्य राहील. तर कोणाच्यातरी दबाव व सल्यावरुन चुकीची कामेङ्ककरणारांची गय केली जाणार नाही.’येळगांवकर, आमदार देसाई, बानुगडे-पाटील, रामभाऊ घार्गे, सतीश जगताप यांची भाषणे झाली.ङ्कयावेळी डी. आर. पाटील, मा. ए. खाडे, माजी सरपंच अनिल गोडसे, आबासाहेब देवकर, संतोष गोडसे, रणधीर जाधव, चंद्रकांत पवार, शिवाजी यादव, विजय शिंदे, परेश जाधव, बापुराव देवकर, पृथ्वीराज गोडसे, शिवाजी देवकर, संभाजी फडतरे, लक्ष्मण शिंगाडे, पोपट मोरे, धनंजय निंंबाळकर, धनाजी लवळे, कृष्णराव बनसोडे, सत्यवान कांबळे, शिवाजी सर्वगोड, अनिल देशमुख, अंकुश फडतरे, प्रा. रामचंद्र साळुंखे, शंकर फडतरे, विजय पवार, महेश गोडसे, अ.ङ्कर. कांबळे उपस्थित होते. राजूभाई मुलाणी यांनी प्रास्तविक केले. अनिल गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. पांडूरंग खाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)