शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

जिहे-कठापूरचे पाणीपूजन युतीच करेल

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

विजय शिवतारे : वडूज येथील जाहीर मेळाव्यात व्यक्त केला विश्वास

वडूज : ‘युती शासनाच्या काळात मंजूर झालेली उरमोडी व जिहे-कठापूरची योजना पूर्ण करण्यासाठीच नियतीने युतीचे सरकार सत्तेवर आणले आहे. भविष्यात पाण्याचे पूजनही युतीच्या मंत्र्यांच्या हस्तेच होणार आहे,’ असा विश्वास पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.खटाव तालुका शिवसेना व रणजितसिंंह देशमुख मित्र मंडळातर्फे वडूज बाजार पटांगणावर आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, माजी आमदार दिलीप येळगांवकर, शिवसेना नेते रणजितसिंंह देशमुख, जिल्हाध्यक्ष नंदकुमार घाडगे, हर्षल कदम, गणेश रसाळ, अनिल सुभेदार, संजय भोसले, माजी सभापती शिवाजी पवार, वसंत गोसावी, हणमंतराव देशमुख, युवराज पाटील, प्रताप जाधव उपस्थित होते.मंत्री शिवतारे म्हणाले, ‘युतीच्या काळात सुरू झालेल्या बहुतांशी योजना त्या-त्या काळात सुरू झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील दोघांना जलसंपदा खाते मिळूनसुध्दा त्यांच्या संकुचीत दृष्टीकोनामुळे जिहे-कठापूर योजना रखडली आहे. याच मंडळींनी योजनेच्या कामाबाबत आंदोलनाचे इशारे देत कोल्हेकुई सुरू केली आहे. कोरेगांव व माणच्या आमदारांनी यासंदर्भात भाष्य करताना गेल्या पाच वर्षांत आपल्याकडे सर्व सत्ता असताना योजनेसाठी काय दिवे लागले याचे आत्मपरिक्षण करावे. जिहे-कठापूर, उरमोडी, टेंभू, तारळी या रखडलेल्या योजनांची कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण व्यक्तिगत लक्ष घालणार आहोत.’ दुष्काळी तालुक्यातील शेती-पाणी व इतर विकासकामासाठी पालकमंत्री शिवतारे यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी रणजितसिंह देशमुख यांनी केली. ते म्हणाले, ‘प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आता सरकार बदलले आहे. हे ध्यानात ठेवावे. चांगल्या कामात आमचे प्रशासनाचे सहकार्य राहील. तर कोणाच्यातरी दबाव व सल्यावरुन चुकीची कामेङ्ककरणारांची गय केली जाणार नाही.’येळगांवकर, आमदार देसाई, बानुगडे-पाटील, रामभाऊ घार्गे, सतीश जगताप यांची भाषणे झाली.ङ्कयावेळी डी. आर. पाटील, मा. ए. खाडे, माजी सरपंच अनिल गोडसे, आबासाहेब देवकर, संतोष गोडसे, रणधीर जाधव, चंद्रकांत पवार, शिवाजी यादव, विजय शिंदे, परेश जाधव, बापुराव देवकर, पृथ्वीराज गोडसे, शिवाजी देवकर, संभाजी फडतरे, लक्ष्मण शिंगाडे, पोपट मोरे, धनंजय निंंबाळकर, धनाजी लवळे, कृष्णराव बनसोडे, सत्यवान कांबळे, शिवाजी सर्वगोड, अनिल देशमुख, अंकुश फडतरे, प्रा. रामचंद्र साळुंखे, शंकर फडतरे, विजय पवार, महेश गोडसे, अ.ङ्कर. कांबळे उपस्थित होते. राजूभाई मुलाणी यांनी प्रास्तविक केले. अनिल गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. पांडूरंग खाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)