शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक कुटुंब दिन विशेष: कोरेगावातील अख्खं केंजळे कुटुंब करतंय वकिली !

By जगदीश कोष्टी | Updated: May 15, 2025 17:30 IST

कोरेगावच्या केंजळे परिवारातील नऊजणांची तालुका ते सर्वोच्च न्यायालयात सेवा

जगदीश कोष्टीसातारा : वकिली हा केवळ पैसा कमविण्याचा व्यवसाय नसून न्याय मिळवून देण्याची सेवा आहे, ही भावना मनात बाळगून कोरेगावचे जयवंत केंजळे कुटुंबीय वकिली सेवा बजावत आहे. कोरेगाव तालुका, सातारा जिल्हा सत्र, मुंबई उच्च न्यायालय अन् सर्वोच्च न्यायालयात एक मुलगा, सून कार्यरत आहेत. या कुटुंबातील नऊजण वकिली करीत आहेत.जगभर १५ मे हा जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय माणूस हा कुटुंबवत्सल मानला जातो. बहुतांश कुटुंबांत आजी-आजोबा, आई-वडील, मुलं एकत्र राहतात. एकत्र कुटुंब हीच त्या घराची ताकद असते; पण काही कुटुंब असेही असतात की, एखाद्या क्षेत्रात झपाटल्यासारखे काम करतात. यासाठी चार भिंतींत अडकून राहत नाहीत. अशांपैकीच एक कुटुंब म्हणजे कोरेगावचे केंजळे कुटुंब.

ॲड. जयवंत केंजळे यांचे मूळ गाव हे खटाव तालुक्यातील ललगुण. त्यांच्या वडिलांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता. तेथून निवृत्त झाल्यानंतर व्यवसायाच्या निमित्ताने ते कोरेगावात स्थायिक झाले. ॲड. जयवंत केंजळे यांनी विज्ञान शाखेतून पदवी संपादन केली. त्यानंतर वकिलीचे शिक्षण घेतले. दरम्यानच्या काळात त्यांनी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून तीन वर्षे कामही केले. त्यांनी वर्ष १९७६ पासून कोरेगावातून वकिलीस सुरुवात केली. त्यांचे या पेशावर प्रचंड प्रेम असल्याने त्यांनी अख्खं कुटुब या क्षेत्रात आणले.त्यांचेच बंधू ॲड. श्रीकांत केंजळे यांनी मुंबईतून ‘एमबीए’चे शिक्षण घेतले. काही काळ नोकरीही केली; पण तेथे फार काळ रमले नाहीत. त्यामुळे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेऊन सातारा जिल्हा न्यायालयात वर्ष १९८८ पासून वकिली सुरू केली. त्यांची पत्नी संगीता याही जिल्हा न्यायालयात सेवा बजावत आहेत. त्या कवयित्री, लेखिका आहेत.

जयवंतराव यांना दोन मुलं. त्यातील अजित यांनी उच्च न्यायालयात वकिली करावी म्हणून त्यांना वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला पाठवले. दुसऱ्या वर्षापासूनच वकील मित्राकडे त्यांना व्यवहारज्ञान मिळावे म्हणून पाठविले. सकाळी कॉलेज करून दिवसभर न्यायालयात जात. ते गेली २३ वर्षे उच्च न्यायालयात सेवा बजावीत आहेत. त्यांच्यासोबत अजित यांची पत्नी उत्कंठा याही वर्ष २००४ पासून उच्च न्यायालयातच वकिली करत आहेत. दुसरे चिरंजीव अभिजित आणि त्यांची पत्नी अश्विनी दोघेही सातारा व कोरेगाव न्यायालयात बारा वर्षांपासून सेवा बजावत आहेत.श्रीकांत यांचीही मुलं याच क्षेत्रात आहेत. एक मुलगा प्रशांत हे सर्वोच्च न्यायालयात सेवा बजावत आहेत. सर्वोच्च न्यायालयातच कर्तव्य बजवायचे म्हणून त्यांना वकिलीच्या शिक्षणासाठी दिल्लीला पाठवले. तेथेही शिक्षण घेत असतानाच नामांकित वकील मित्रांकडे पाठवले जात. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान चांगले मिळत. गेली बारा वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात आहेत. त्यांच्यासोबतच पत्नी मोहिनी या वकिली करत आहेत. त्यांनी लग्नानंतर वकिलीचे शिक्षण घेऊन सेवा बजावत आहेत.

ही जपली पथ्ये

  • एखाद्या पक्षकाराने फी दिली नाही म्हणून मधूनच त्याला सोडायचे नाही. खटल्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच थांबायचे.
  • मुंबई, दिल्लीत येणारे पक्षकार हे ग्रामीण भागातून येतात. तेव्हा ते कसे आले, त्यांनी चहा, नाश्ता केला का नाही, याची अगोदर चौकशी करावी. त्यांचे हित जोपासावे.

वकिली हा केवळ पैसे कमविण्याचा व्यवसाय नाही. वंचितांना न्याय मिळवून देणे, लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी खांद्यावर घेण्याची सेवा आहे. त्यामुळे मुलं, सुनाही हे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. - ॲड. जयवंत केंजळे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरkoregaon-acकोरेगावadvocateवकिल