शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
5
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
6
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
7
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
8
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
9
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
11
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
12
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
13
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
14
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
15
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
16
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
17
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
18
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
19
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
20
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जयेंद्र चव्हाणांकडून राजीनाम्याचा बाँब

By admin | Updated: December 16, 2014 00:11 IST

अशी माहिती नगरविकास आघाडीचे नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सातारा : ‘गेल्या तीन वर्षांपासून सातारा नगर पालिकेत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शेकडो विकासकामे रखडली असून, आता शिक्का बनून राहण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेपर्यंत मी पोहोचलो असून, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा करून लवकरच याचा निर्णय घेईन,’ अशी माहिती नगरविकास आघाडीचे नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पालिका प्रशासनाकडून नागरिकांची कामे होत नाहीत, नगरसेवकांचे प्रशासन ऐकत नाही, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा होत नाही, विकास योजना कागदावरच राहतात, प्रशासन विकास योजना हाणून पाडतात, अशा विविध मुद्द्यांवर नाराज असलेले नगरविकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक जयेंद्र चव्हाण याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कानावर सर्व गोष्टी घालून ते देतील, त्या आदेशाप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे सांगितले.सातारा पालिका प्रशासनाकडून नागरिकांचे कामे होत नाहीत, नगरसेवकांचे प्रशासन ऐकत नाही, विकास योजना राबविल्या जात नाहीत, त्या कागदावरीच राहतात, प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन आणि पाठपुरावा करून कामे होत नाहीत. त्यामुळे नाराज असलेल्या नगरविकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांनी वार्डातील कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाच्या विरोधात पदाचा राजीनामा देण्याची भूमिका मांडली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ‘राजीनामा देण्यापेक्षा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू, मोर्चे काढू, प्रसंगी उपोषण करू; परंतु राजीनामा देऊ नका,’ अशी कार्यकर्त्यांनी विनंती केली. त्यानंतर याबाबतची सर्व माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या कानावर घालून नंतर काय तो निर्णय घ्यायचा, असे बैठकीत ठरले.दरम्यान, याबाबत नगरसेवक जयेंद्र चव्हाण म्हणाले, ‘पालिकेच्या कारभाराबाबत आणि कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, याबाबत आपण नेहमीच अशा बैठका घेत असतो. राजीनामा देण्याबाबतच्या भूमिकेबाबत चर्चा झाली हे खरे आहे; परंतु पालिका प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना माहिती सांगणार असून, ते ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे निर्णय घेणार आहे.’ (प्रतिनिधी)