शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या जबड्यातून पुन्हा एकदा जीवनाच्या कुशीत

By admin | Updated: May 11, 2014 23:59 IST

मोहन मस्कर-पाटील ल्ल सातारा सातारा जिल्ह्यात ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांचे उपचार करवून घेण्याचे प्रमाण शंभर टक्के असल्यामुळे शंभरपैकी ८१ रुग्ण

 मोहन मस्कर-पाटील ल्ल सातारा सातारा जिल्ह्यात ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांचे उपचार करवून घेण्याचे प्रमाण शंभर टक्के असल्यामुळे शंभरपैकी ८१ रुग्ण ‘एमडीआर-टीबी’ सारख्या महाभंयकर रोगापासून मुक्ततेकडे वाटचाल करू लागले आहेत. मृत्यूच्या जबड्याकडे गेलेले हे रुग्ण पुन्हा एकदा जीवनाच्या कुशीत आणणारा ‘एमडीआर-टीबी’ मुक्तीचा ‘सातारा पॅटर्न’ आता राज्यात लक्षवेधी ठरला आहे. याचे संपूर्ण श्रेय सातारा जिल्हा क्षयरोग केंद्रातील वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. पृथ्वीराज भोसले आणि त्यांच्या सहकार्‍यांना जाते. राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वात चांगले असून, महाराष्ट्राची सरासरी २७ टक्के आहे. जगभरात ‘मोस्ट किलिंग डिसीज’ (मृत्यू होणारा आजार) म्हणून ‘एमडीआर-टीबी’ची ओळख झाली आहे. डॉ. नितीन भालेराव, डॉ. पृथ्वीराज भोसले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी राबविलेल्या शोधमोहिमेनंतर जून २०१२ मध्ये वाई तालुक्यात ‘एमडीआर-टीबी’चा पहिला रुग्ण आढळला. यानंतर जिल्ह्यात १२५ रुग्ण आढळले. हा आजार ‘टीबी’ झालेल्या रुग्णांनाच होतो. ‘टीबी’ तथा ‘क्षयरोग’ झालेला रुग्णाने औषधे घेताना धरसोड वृत्ती केली तर त्याला ‘एमडीआर-टीबी’ तथा ‘मल्टी ड्रग रेझिस्टन्स’ होतो. या आजाराला ‘विचित्र’ अथवा ‘कोडगा’ म्हणूनही ओळखले जाते. यासाठी सरकार एका रुग्णांवर वर्षाकाठी जवळपास चार ते साडेचार लाख रुपये खर्च करते. ‘टीबी’ बरा होण्यास सहा ते सात महिने तर ‘एमडीआर-टीबी’ बरा होण्यास दोन वर्षे लागतात. यावर शासनाकडून होणारा खर्च आणि कालावधी लक्षात घेता त्याची दाहकता लक्षात येते. ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांना पुन्हा एकदा जीवनाच्या कुशीत आणण्याचे काम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्याने सर्वाधिक चांगले केले आहे. ‘एमडीआर-टीबी’ रुग्णांनी सातारा जिल्हा क्षयरोग केंद्राने स्वत:चे एक प्रतिमान तयार केले आणि त्यानुसार उपचारपद्धती सुरू ठेवली आहे. ‘एमडीआर-टीबी’चा रुग्ण निश्चित झाल्यानंतर त्याला तत्काळ सात दिवसांत औषधे सुरू होतात. संबंधित रुग्णाची गुप्तता तर पाळलीच जाते, त्याचबरोबर तो औषधोपचार नियमित घेतो की नाही, याचा प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला जातो. आशा वर्कर्स, परिचारिका त्यांच्या घरी वारंवार भेटी देतात. राज्यात इतर जिल्ह्यांत मात्र, सातार्‍यासारखी तत्परता दिसून आलेली नाही. परिणामी महाराष्ट्रात ‘एमडीआर-टीबी’ रुग्ण बरे होण्याकडे वाटचाल करण्याचे प्रमाण २७ टक्के इतके आहे आणि सातारा जिल्ह्याचे ८१ टक्के आहे. विशेष म्हणजे ‘एचआयव्ही-एमडीआर-टीबी’ रुग्ण कव्हर करणे अवघड असते. सातारा जिल्हा क्षयरोग केंद्रात मात्र, त्याच्या उलट आहे. येथे या आजारांच्या रुग्णांना कव्हर करण्यात बर्‍यापैकी यश आले आहे.