शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

जावळी तालुका पाण्यावाचून तहानलेलाच...

By admin | Updated: March 22, 2017 22:41 IST

प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष : २९ गावे टंचाईग्रस्त घोषित; ग्रामस्थ मात्र टँकरच्या प्रतीक्षेत

सायगाव : सातारा जिल्ह्यात सर्वाधिक अतिवृष्टीचा तालुका म्हणून जावळीला ओळखले जाते. परंतु पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळेच अधिक पाऊस पडूनही तसेच उशाला चार-चार धरणे असूनही जावळीकरांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे.तालुक्यातील ६८ गावांचे टंचाईग्रस्त म्हणून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २९ गावांचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांनी मंजूर केले असल्याची माहिती तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे यांनी दिली. जावळीत पाऊस अधिक प्रमाणात होतो. मात्र, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे हे पाणी डोंगर उतारावरून वाहून जाते. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ यासाठी शासनस्तरावरून नालाबंडिंग, पाणलोट विकास कार्यक्रम राबवले जात आहेत. मात्र, जावळीत हे केवळ कागदावर दाखविण्याचा प्रयत्न गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांच्याकडून होताना दिसतो. आजतागायत तालुक्यात पाऊस कधीच कमी पडला नाही. मात्र, भीषण पाणीटंचाई भासणाऱ्या गावांची संख्या मात्र प्रत्येक वर्षी वाढताना आढळत आहे. तालुक्यात यावर्षी तर ६८ गावांमध्ये तसेच काही गावांमधील वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी-बाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर कहर म्हणजे तालुक्यातील अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवताना आढळत आहेत. दरवर्षी पाणीटंचाईची आढावा बैठक घेऊन केवळ कागदोपत्री उपाययोजना करण्यातच मश्गूल असलेल्या तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाणीटंचाई भासणार नाही, अशा पद्धतीने टंचाई निवारण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरच कुठे तरी पाणीटंचाई भासणाऱ्या गावांची संख्या कमी होईल, यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शासकीय यंत्रणा कामाला लावून उन्हाळ्यातच यावर विचार करणे गरजेचे आहे.तालुक्यात सध्या पाणीटंचाईबाबत ६८ गावांचे प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी २९ गावांना प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी मंजुरी दिली आहे. १४ गावांचे नवीन नळ पाणी दुरुस्ती प्रस्ताव मंजुरीसाठी, दोन गावांचे विहिरी खोल करण्याकरिताचे प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे यांनी दिली. (वार्ताहर)या २९ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईतालुक्यातील केळघर, दुंद, कुसुंबी अंतर्गत बालदारवाडी, बेलोशी, वहागाव, केळघर, बिभवी, तेटली, शेंबडी, बामणोली कसबे अंतर्गत दंडवस्ती, मोहाट, केळघर तर्फ सोळशी, आसनी, दरे खुर्द अंतर्गत जावळेवाडी, भुतेघर (भुतेघरमुरा), बाहुळे, भोगवली, ओखवडी, दापवडी, मोरावळे-खामकरवाडी, करंजे (आनंदनगर), चोरांबे, कुरळोशी (वारनेवस्ती), गाढवली पुनर्वसित, डांगरेघर, केंजळ, निपाणी (अंतर्गत वाड्या), बेलावडे (बौद्धवस्ती), या भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या २९ गावांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यावर्षी कोणत्याही गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्यादृष्टीने ज्या गावात पाणीटंचाई आहे अशा गावांनी प्रस्ताव द्यावेत. तत्काळ अशा गावांना पाणी पुरवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील व प्रत्येकाला पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले जाईल.- दत्ता गावडे, उपसभापती