शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ओढ्यावरील अतिक्रमणामुळे जखिणवाडी रस्ता तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:14 IST

मलकापूर : महामार्ग ते जखिणवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तीन दिवस बंद होता. काही दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार ...

मलकापूर : महामार्ग ते जखिणवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तीन दिवस बंद होता. काही दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार पावसामुळे या ओढ्याचे पाणी तीन फुटांनी रस्त्यावरून वाहू लागल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसह प्रवाशांचे हाल झाले. या रस्त्याकडेने जाणाऱ्या ओढ्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. प्रशासनाने लक्ष घालून या ओढ्यावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थ करत आहेत.

महामार्गावरून जखिणवाडीसह आगाशिव डोंगर व ऐतिहासिक लेण्यांकडे जाण्यासाठी मळाईदेवी पतसंस्था ते जखिणवाडी हा जवळचा रस्ता आहे. इतर गावांमधून येणाऱ्या पर्यटकांसह या भागातील शेतकऱ्यांना सोयीस्कर अशा या रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी जमीन देऊन डांबरीकरणही केले आहे. याच रस्त्यालगत आगाशिव डोंगरावरून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक ओढा आहे. या ओढ्यावर काही ठिकाणी अतिक्रमण झाले होते. यापूर्वी शेतकऱ्यांची सोय व पर्यटनाला चालना देण्यासाठी यापूर्वीच्या सरपंचांसह सदस्यांनी काही अतिक्रमणे काढून रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण केले आहे. मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांनी ओढ्यावरच अतिक्रमण करत आडमुठे धोरण स्वीकारल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून रस्त्यालाच ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गेल्या आठवड्यात संततधार पावसाने हजेरी लावली. सलग तीन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. सलग पडत असलेल्या पावसाने या ओढ्यालाही पूर आला होता. पुराचे पाणी तीन फुटाने रस्त्यावरून वाहत असल्यमुळे तीन दिवस हा रस्ता वाहतुकीस बंद केला होता. काही शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे या ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पर्यटकांसह शेतकरी व ग्रामस्थांना हकनाक त्रास होत आहे. प्रशासनाने लक्ष घालून या ओढ्यावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थ करत आहेत.

चौकट

एक किलोमीटरसाठी सहा किलोमीटर प्रवास

महामार्गावरून जखिणवाडीला जाणाऱ्यांसाठी या रस्त्याने साधारणतः केवळ एक किलोमीटर अंतरात पोहोचते. मात्र या रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे कसरत करत प्रवास करण्यापेक्षा कृष्णा रुग्णालयाकडून किंवा नांदलापुरातून सहा किलोमीटर लांबून प्रवास करावा लागत आहे.

चौकट

अर्जावर अर्ज......पण हात रिकामेच

या ओढ्यावर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी इतर शेतकऱ्यांसह ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदारांसह शासन दरबारी अनेकवेळा अर्जावर अर्ज केले आहेत. मात्र प्रत्येकवेळी संबंधित अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केवळ आश्वासनच दिले आहे. या मुसळधार पावसाने झालेल्या हाहाकाराने तर यांचे डोळे उघडणार का? असा सवाल ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

फोटो ०१मलकापूर

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग ते जखिणवाडी रस्त्याकडेने जाणाऱ्या ओढ्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. यामुळे पर्यटकांसह शेतकरी व ग्रामस्थांना हकनाक त्रास होत आहे. (छाया : माणिक डोंगरे)

010821\img_20210724_131436.jpg

फोटो कॕप्शन

महामार्ग ते जखिणवाडी रस्त्याकडेने जाणाऱ्या ओढ्यावर कांही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत असल्यमुळे पर्यटकांसह शेतकरी व ग्रामस्थांना हकनाक त्रास होत आहे. (छाया-माणिक डोंगरे)