शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ओढ्यावरील अतिक्रमणामुळे जखिणवाडी रस्ता तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:14 IST

मलकापूर : महामार्ग ते जखिणवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तीन दिवस बंद होता. काही दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार ...

मलकापूर : महामार्ग ते जखिणवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तीन दिवस बंद होता. काही दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार पावसामुळे या ओढ्याचे पाणी तीन फुटांनी रस्त्यावरून वाहू लागल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसह प्रवाशांचे हाल झाले. या रस्त्याकडेने जाणाऱ्या ओढ्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. प्रशासनाने लक्ष घालून या ओढ्यावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थ करत आहेत.

महामार्गावरून जखिणवाडीसह आगाशिव डोंगर व ऐतिहासिक लेण्यांकडे जाण्यासाठी मळाईदेवी पतसंस्था ते जखिणवाडी हा जवळचा रस्ता आहे. इतर गावांमधून येणाऱ्या पर्यटकांसह या भागातील शेतकऱ्यांना सोयीस्कर अशा या रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी जमीन देऊन डांबरीकरणही केले आहे. याच रस्त्यालगत आगाशिव डोंगरावरून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक ओढा आहे. या ओढ्यावर काही ठिकाणी अतिक्रमण झाले होते. यापूर्वी शेतकऱ्यांची सोय व पर्यटनाला चालना देण्यासाठी यापूर्वीच्या सरपंचांसह सदस्यांनी काही अतिक्रमणे काढून रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण केले आहे. मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांनी ओढ्यावरच अतिक्रमण करत आडमुठे धोरण स्वीकारल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून रस्त्यालाच ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गेल्या आठवड्यात संततधार पावसाने हजेरी लावली. सलग तीन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. सलग पडत असलेल्या पावसाने या ओढ्यालाही पूर आला होता. पुराचे पाणी तीन फुटाने रस्त्यावरून वाहत असल्यमुळे तीन दिवस हा रस्ता वाहतुकीस बंद केला होता. काही शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे या ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पर्यटकांसह शेतकरी व ग्रामस्थांना हकनाक त्रास होत आहे. प्रशासनाने लक्ष घालून या ओढ्यावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थ करत आहेत.

चौकट

एक किलोमीटरसाठी सहा किलोमीटर प्रवास

महामार्गावरून जखिणवाडीला जाणाऱ्यांसाठी या रस्त्याने साधारणतः केवळ एक किलोमीटर अंतरात पोहोचते. मात्र या रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे कसरत करत प्रवास करण्यापेक्षा कृष्णा रुग्णालयाकडून किंवा नांदलापुरातून सहा किलोमीटर लांबून प्रवास करावा लागत आहे.

चौकट

अर्जावर अर्ज......पण हात रिकामेच

या ओढ्यावर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी इतर शेतकऱ्यांसह ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदारांसह शासन दरबारी अनेकवेळा अर्जावर अर्ज केले आहेत. मात्र प्रत्येकवेळी संबंधित अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केवळ आश्वासनच दिले आहे. या मुसळधार पावसाने झालेल्या हाहाकाराने तर यांचे डोळे उघडणार का? असा सवाल ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

फोटो ०१मलकापूर

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग ते जखिणवाडी रस्त्याकडेने जाणाऱ्या ओढ्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. यामुळे पर्यटकांसह शेतकरी व ग्रामस्थांना हकनाक त्रास होत आहे. (छाया : माणिक डोंगरे)

010821\img_20210724_131436.jpg

फोटो कॕप्शन

महामार्ग ते जखिणवाडी रस्त्याकडेने जाणाऱ्या ओढ्यावर कांही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत असल्यमुळे पर्यटकांसह शेतकरी व ग्रामस्थांना हकनाक त्रास होत आहे. (छाया-माणिक डोंगरे)