शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत चेंगराचेंगरीमुळे गेला ३१ जणांचा जीव, अभिनेत्याला पाहण्याचा नादात मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
5
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
6
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
7
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
8
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
9
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
10
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
11
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
12
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
13
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
14
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
15
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
16
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
17
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
18
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
19
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
20
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

महाराष्ट्राची परिस्थिती शरमेने मान खाली घालावी अशी, पृथ्वीराज चव्हाणांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

By प्रमोद सुकरे | Updated: July 31, 2024 15:49 IST

राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर

कराड : माजी गृहमंत्र्यांनी विद्यमान गृहमंत्र्यांवर केलेले गंभीर आरोप पाहता महाराष्ट्राची परिस्थिती शरमेने मान खाली घालावी अशी झाली आहे. महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर न बोललेलेच बरे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. कराड येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी इंद्रजीत चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे झाकीर पठाण, कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज मोरे यांची उपस्थिती होती.राज्यातल्या राजकारणावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, घोडेबाजार करणाऱ्या लोकांना, विश्वासघात करणाऱ्या लोकप्रतिनिधींना शिक्षा करायची का बक्षीस द्यायचे हे आता लोकांनाच ठरवावे लागेल. महाराष्ट्रातील सत्तांतर हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने झाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी हा देश कुठे आणून ठेवला आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.काँग्रेसच्या बैठकीत सूत्र ठरणार!आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस किती जागा लढणार? याबाबत छेडले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीचे विधानसभेच्या जागांचे सूत्र ठरलेले आहे. किती जागा लढणार हे मी स्पष्ट सांगणार नाही मात्र तिन्ही पक्ष एकत्रित बसून यावर चर्चा करून निर्णय होईल हे मात्र नक्की.

राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीरउपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी वेशांतर करून मुंबई ते दिल्ली प्रवास करणे म्हणजेच देशातील विमानसेवा किती ढिसाळ आहे हे समोर येते. यातून राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे मतही चव्हाण यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणHome Ministryगृह मंत्रालय