शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्राची परिस्थिती शरमेने मान खाली घालावी अशी, पृथ्वीराज चव्हाणांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

By प्रमोद सुकरे | Updated: July 31, 2024 15:49 IST

राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर

कराड : माजी गृहमंत्र्यांनी विद्यमान गृहमंत्र्यांवर केलेले गंभीर आरोप पाहता महाराष्ट्राची परिस्थिती शरमेने मान खाली घालावी अशी झाली आहे. महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर न बोललेलेच बरे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. कराड येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी इंद्रजीत चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे झाकीर पठाण, कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज मोरे यांची उपस्थिती होती.राज्यातल्या राजकारणावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, घोडेबाजार करणाऱ्या लोकांना, विश्वासघात करणाऱ्या लोकप्रतिनिधींना शिक्षा करायची का बक्षीस द्यायचे हे आता लोकांनाच ठरवावे लागेल. महाराष्ट्रातील सत्तांतर हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने झाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी हा देश कुठे आणून ठेवला आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.काँग्रेसच्या बैठकीत सूत्र ठरणार!आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस किती जागा लढणार? याबाबत छेडले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीचे विधानसभेच्या जागांचे सूत्र ठरलेले आहे. किती जागा लढणार हे मी स्पष्ट सांगणार नाही मात्र तिन्ही पक्ष एकत्रित बसून यावर चर्चा करून निर्णय होईल हे मात्र नक्की.

राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीरउपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी वेशांतर करून मुंबई ते दिल्ली प्रवास करणे म्हणजेच देशातील विमानसेवा किती ढिसाळ आहे हे समोर येते. यातून राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे मतही चव्हाण यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणHome Ministryगृह मंत्रालय