शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

कामात मन रमविणे हीच शेतकऱ्यांची करमणूक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST

कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कृषी क्षेत्रही याला अपवाद ठरले नाही. शेतकऱ्यांना तर कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतमाल ...

कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कृषी क्षेत्रही याला अपवाद ठरले नाही. शेतकऱ्यांना तर कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतमाल विकताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतातील कामे करतानाही मजूर मिळत नसल्याने ताणतणावात राहावे लागतेय. अशा काळात तणाव दूर करण्यासाठी शेतकरी मोबाईलमध्येही रमू लागले आहेत. कधी शेतीविषयक माहिती मिळवत आहेत. तर काहीवेळा त्यातून गाणी ऐकण्याचा आनंदही घेत आहेत. काहीजण घरात टीसव्ही बघत आहेत. या मनोरंजनापेक्षा शेतकऱ्यांना आता खरीप हंगाम तयारीचे वेध लागले आहेत. त्यामुळे कामात मन रमविणे हेच करमणुकीचे साधन झाले आहे.

मागील एक वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम आहे. कधी त्याची तीव्रता कमी होते तर काहीवेळा वाढते. पण, या कोरोना संकटाचा परिणाम कृषी क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामध्ये शेतकरी पिचलाय. पिकलेल्या मालाला भाव मिळत नाही. विकायचा झाला तर आठवडी बाजार बंद. बाजार समितीत घेऊन जायचं झालं तर उठाव आणि दर नाही. यामुळे शेतकरी तणावात आहेत. त्यातच आता खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यासाठी बियाणे आणि खतांची जुळणी करायची आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकायची आहेत. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेतीची खूप कामे करायची आहेत. वेळ आहे पण कोरोनामुळे बाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोबाईलमध्येही रमू लागले आहेत. त्यामधून शेतीविषयक चांगली माहिती मिळवणे, गाणी ऐकणे अशाप्रकारे ते आपली करमणूक करून घेत आहेत. काही शेतकरी तर मोबाईलवरून विविध बाजार समितीमधील दाराची माहिती घेत आहेत. काही शेतकरी शेतशिवारात जाऊन शक्य तसे शेतीची कामे करत आहेत. कारण, खरीप हंगाम तयारी आतापासूनच केली तरच पाऊस झाल्या-झाल्या पेरणीला सुरुवात करता येणार आहे. एकप्रकारे कोरोना तणावातही शेतीची कामे करणे शेतकऱ्यांसाठी मनोरंजनच ठरणारे आहे.

चौकट :

बळीराजासाठी शेतीच श्वास अन् घास...

बळीराजा वर्षभर शेतीतच रमत असतो. कितीही संकटे आली तरी त्याला त्यापासून दूर पळता येत नाही. एका पिकाने दगा दिला तर दुसरे पदरात टाकेल, असा विश्वास असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेती हा श्वास असतो तर पिकल्यावर घास मिळवून देणारा आधार ठरतो. वर्षभर शेतीत रमणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनामुळे प्रथमच थोडासा विसावा मिळालाय. पण, हा विसावाही शेतकऱ्यांना शिक्षा वाटते. कारण, खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळे कामं करावीच लागणार आहेत.

- नितीन काळेल

.........................................................................