शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

कामात मन रमविणे हीच शेतकऱ्यांची करमणूक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST

कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कृषी क्षेत्रही याला अपवाद ठरले नाही. शेतकऱ्यांना तर कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतमाल ...

कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कृषी क्षेत्रही याला अपवाद ठरले नाही. शेतकऱ्यांना तर कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतमाल विकताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतातील कामे करतानाही मजूर मिळत नसल्याने ताणतणावात राहावे लागतेय. अशा काळात तणाव दूर करण्यासाठी शेतकरी मोबाईलमध्येही रमू लागले आहेत. कधी शेतीविषयक माहिती मिळवत आहेत. तर काहीवेळा त्यातून गाणी ऐकण्याचा आनंदही घेत आहेत. काहीजण घरात टीसव्ही बघत आहेत. या मनोरंजनापेक्षा शेतकऱ्यांना आता खरीप हंगाम तयारीचे वेध लागले आहेत. त्यामुळे कामात मन रमविणे हेच करमणुकीचे साधन झाले आहे.

मागील एक वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम आहे. कधी त्याची तीव्रता कमी होते तर काहीवेळा वाढते. पण, या कोरोना संकटाचा परिणाम कृषी क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामध्ये शेतकरी पिचलाय. पिकलेल्या मालाला भाव मिळत नाही. विकायचा झाला तर आठवडी बाजार बंद. बाजार समितीत घेऊन जायचं झालं तर उठाव आणि दर नाही. यामुळे शेतकरी तणावात आहेत. त्यातच आता खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यासाठी बियाणे आणि खतांची जुळणी करायची आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकायची आहेत. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेतीची खूप कामे करायची आहेत. वेळ आहे पण कोरोनामुळे बाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोबाईलमध्येही रमू लागले आहेत. त्यामधून शेतीविषयक चांगली माहिती मिळवणे, गाणी ऐकणे अशाप्रकारे ते आपली करमणूक करून घेत आहेत. काही शेतकरी तर मोबाईलवरून विविध बाजार समितीमधील दाराची माहिती घेत आहेत. काही शेतकरी शेतशिवारात जाऊन शक्य तसे शेतीची कामे करत आहेत. कारण, खरीप हंगाम तयारी आतापासूनच केली तरच पाऊस झाल्या-झाल्या पेरणीला सुरुवात करता येणार आहे. एकप्रकारे कोरोना तणावातही शेतीची कामे करणे शेतकऱ्यांसाठी मनोरंजनच ठरणारे आहे.

चौकट :

बळीराजासाठी शेतीच श्वास अन् घास...

बळीराजा वर्षभर शेतीतच रमत असतो. कितीही संकटे आली तरी त्याला त्यापासून दूर पळता येत नाही. एका पिकाने दगा दिला तर दुसरे पदरात टाकेल, असा विश्वास असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेती हा श्वास असतो तर पिकल्यावर घास मिळवून देणारा आधार ठरतो. वर्षभर शेतीत रमणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनामुळे प्रथमच थोडासा विसावा मिळालाय. पण, हा विसावाही शेतकऱ्यांना शिक्षा वाटते. कारण, खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळे कामं करावीच लागणार आहेत.

- नितीन काळेल

.........................................................................