शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

मुद्दा एक अन् ऊस परिषदा अनेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:38 IST

संजय कदम । लोकमत न्यूज नेटवर्क वाठार स्टेशन : राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू ...

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत असून, अद्याप मागील हंगामातील जाहीर केलेली एफआरपी कारखान्यांकडून देण्यात आली नाही. साखर आयुक्तांनी अशा कारखान्यांना गाळप परवाना देऊ नयेत व यंदा उसाला किमान ३ हजार ५०० रुपये पहिली उचल एकरकमी मिळावी, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना २७ आॅक्टोबरला जयसिंगपूर तर किसान मंच २४ आॅक्टोबर रोजी पाटणला ऊस परिषदा घेऊन आंदोलनाच्या दिशा ठरवणार आहे.गतवर्षी साडेनऊ टक्के साखर उतारा ग्राह्य धरून एफआरपी निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे एफआरपी अधिक दोनशे हे सूत्र मान्य करत उसाचा तिढा सुटला होता. पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यात सर्व कारखान्यांनी यास सहमती दिल्यानंतर सर्वच जिल्ह्यांत ऊस दराचे हे सूत्र मान्य झाले. मात्र, याची अंमलबजावणी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कारखान्यांनी केली. सातारा जिल्ह्यातील सह्याद्री, कृष्णा व अजिंक्यतारा हे कारखाने वगळता इतर कोणत्याही कारखान्याने हे आश्वासन पाळले नाही. असे असताना आता १ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात ऊसदराची भूमिका काय असावी, यासाठी राज्यातील वेगवेगळ्या शेतकरी संघटनांच्या भूमिका ऊस परिषदेच्या माध्यमातून जाहीर होऊ लागल्या आहेत.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी न देता गुजरातप्रमाणे समान हप्त्यामध्ये देण्याबाबत घोषणा केली.रघुनाथदादा पाटील यांच्या महाराष्टÑ राज्य शेतकरी संघटनेने चालू वर्षी एफआरपीचे तुकडे न करता एकरकमी द्यावी तसेच उसाला चालू हंगामात किमान ३ हजार ५०० रुपये दर जाहीर करावा, ही मागणी कोल्हापूर येथे झालेल्या ऊस परिषदेत केली. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत शेतकरी संघटनेची व पंजाबराव पाटील यांच्या बळीराजा संघटनेची अद्याप घोषणा झाली नाही.राज्यात सर्वाधिक महत्त्व असलेल्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २७ आॅक्टोबरला जयसिंगपूर या ठिकाणी ऊस परिषद होणार आहे.यावेळी ऊसदराची घोषणा तसेच संघटनेचे धोरण निश्चित होणार आहे. याशिवाय शंकर गोडसे यांनी पाटण या ठिकाणी २४ आॅक्टोबरला ऊस परिषदेचे आयोजन केले असून, यावेळी गतवर्षी जाहीर केलेली एफआरपी पूर्ण न केलेल्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये तसेच चालूहंगामात ३ हजार ५०० रुपये रक्कम पहिली उचल जाहीर करावी, याप्रमुख मागण्या केल्या जाणारआहेत. या आंदोलनाकडे लक्ष लागले आहे.एक दर निश्चित करावा...ऊस दर हा एकच प्रमुख मुद्दा असताना राज्यात कार्यरत असलेल्या जवळपास पाच शेतकरी संघटनांची ऊस दराची भूमिका मात्र वेगवेगळी आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. भूमिका जरी वेगवेगळ्या असल्या तरी सरकार दरबारी या पाचही संघटनांनी किमान उसाचा कोणताही एकच दर निश्चित करण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी ऊस उत्पादक करत आहेत.