शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

मुद्दा एक अन् ऊस परिषदा अनेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:38 IST

संजय कदम । लोकमत न्यूज नेटवर्क वाठार स्टेशन : राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू ...

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत असून, अद्याप मागील हंगामातील जाहीर केलेली एफआरपी कारखान्यांकडून देण्यात आली नाही. साखर आयुक्तांनी अशा कारखान्यांना गाळप परवाना देऊ नयेत व यंदा उसाला किमान ३ हजार ५०० रुपये पहिली उचल एकरकमी मिळावी, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना २७ आॅक्टोबरला जयसिंगपूर तर किसान मंच २४ आॅक्टोबर रोजी पाटणला ऊस परिषदा घेऊन आंदोलनाच्या दिशा ठरवणार आहे.गतवर्षी साडेनऊ टक्के साखर उतारा ग्राह्य धरून एफआरपी निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे एफआरपी अधिक दोनशे हे सूत्र मान्य करत उसाचा तिढा सुटला होता. पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यात सर्व कारखान्यांनी यास सहमती दिल्यानंतर सर्वच जिल्ह्यांत ऊस दराचे हे सूत्र मान्य झाले. मात्र, याची अंमलबजावणी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कारखान्यांनी केली. सातारा जिल्ह्यातील सह्याद्री, कृष्णा व अजिंक्यतारा हे कारखाने वगळता इतर कोणत्याही कारखान्याने हे आश्वासन पाळले नाही. असे असताना आता १ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात ऊसदराची भूमिका काय असावी, यासाठी राज्यातील वेगवेगळ्या शेतकरी संघटनांच्या भूमिका ऊस परिषदेच्या माध्यमातून जाहीर होऊ लागल्या आहेत.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी न देता गुजरातप्रमाणे समान हप्त्यामध्ये देण्याबाबत घोषणा केली.रघुनाथदादा पाटील यांच्या महाराष्टÑ राज्य शेतकरी संघटनेने चालू वर्षी एफआरपीचे तुकडे न करता एकरकमी द्यावी तसेच उसाला चालू हंगामात किमान ३ हजार ५०० रुपये दर जाहीर करावा, ही मागणी कोल्हापूर येथे झालेल्या ऊस परिषदेत केली. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत शेतकरी संघटनेची व पंजाबराव पाटील यांच्या बळीराजा संघटनेची अद्याप घोषणा झाली नाही.राज्यात सर्वाधिक महत्त्व असलेल्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २७ आॅक्टोबरला जयसिंगपूर या ठिकाणी ऊस परिषद होणार आहे.यावेळी ऊसदराची घोषणा तसेच संघटनेचे धोरण निश्चित होणार आहे. याशिवाय शंकर गोडसे यांनी पाटण या ठिकाणी २४ आॅक्टोबरला ऊस परिषदेचे आयोजन केले असून, यावेळी गतवर्षी जाहीर केलेली एफआरपी पूर्ण न केलेल्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये तसेच चालूहंगामात ३ हजार ५०० रुपये रक्कम पहिली उचल जाहीर करावी, याप्रमुख मागण्या केल्या जाणारआहेत. या आंदोलनाकडे लक्ष लागले आहे.एक दर निश्चित करावा...ऊस दर हा एकच प्रमुख मुद्दा असताना राज्यात कार्यरत असलेल्या जवळपास पाच शेतकरी संघटनांची ऊस दराची भूमिका मात्र वेगवेगळी आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. भूमिका जरी वेगवेगळ्या असल्या तरी सरकार दरबारी या पाचही संघटनांनी किमान उसाचा कोणताही एकच दर निश्चित करण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी ऊस उत्पादक करत आहेत.