शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

सकाळी दहा ते दुपारी दोन कोरोना नाही का? : उदयनराजेंचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 18:45 IST

दहा ते दोन या वेळेत कोरोना नसतो का? आणि दोन नंतर तो बाहेर पडतो का?, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांची व्यथा मांडली आहे.

ठळक मुद्देसकाळी दहा ते दुपारी दोन कोरोना नाही का? : उदयनराजेंचा सवालकायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी योग्य निर्णय घ्यावा

सातारा : कोरोनाच्या महामारीत देखील राजधानीचे दिल्ली शहर सुरू ठेवण्यात आलेले आहे, मग साताऱ्यात कशासाठी लॉकडाऊन करण्यात येते. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत केवळ दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश प्रशासन देत आहे, मला प्रश्न पडतो की दहा ते दोन या वेळेत कोरोना नसतो का? आणि दोन नंतर तो बाहेर पडतो का?, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांची व्यथा मांडली आहे.खासदार उदयनराजे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डॉक्टरांसोबत घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.खासदार उदयनराजे म्हणाले, ''कोरोनाशी लढताना लॉकडाऊन हा उपाय नाही. प्रशासन लोकांना किती दिवस दामटून ठेवणार आहे. लोकांनी व्यवसायासाठी बँकांची कर्ज घेतले आहेत. जरी हप्ते भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली असली तरी देखील त्यानंतर त्यांना व्याजासहित कर्जाच्या रकमा भराव्य लागणार आहेत.

अशा परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जिल्हाधिकाऱ्यांवर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या संख्येपेक्षा कितीतरी पट लोकसंख्या आहे. भविष्यामध्ये चोऱ्यामाऱ्या तसेच इतर गुन्हे वाढू शकतात, हे लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले पाहिजेत.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्यांना लक्षणे दिसून आली आहेत. त्यांना सेंटरमध्ये न नेता त्यांना होम कॉरनटाईन होण्यास मुभा देण्यात यावी. कारण कॉरनटाईन सेंटरमध्ये उपासमार होऊ लागली आहे, तसेच एकमेकांच्या संपर्कामुळे त्याठिकाणी कोणाची संसर्ग वाढू शकतो.

जिल्हा शासकीय रुग्णालयमध्ये नर्सिंग स्टाफची भरती करणे तसेच तज्ञ फिजिशियन उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे. खासगी तज्ञ डॉक्टर्स जिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी तयार आहेत; परंतु त्यांना अल्प मानधन दिले जाते. त्याउलट खासगी दवाखान्यात चालून त्यांना चांगले पैसे मिळतात, त्यामुळे सरकारनेच आपले धोरण बदलणे गरजेचे आहे. खासगी डॉक्टरांना नेमणूक देताना त्यांना मानधन वाढवून द्यावे, तसेच कंपन्यांचा सीएसआर फंड विरोधातील लढाईत वापरावा.पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री यांच्याकडे लोकांनी लॉकडाऊन बाबतचा तसेच कोरोना वाढीसंदर्भातल्या अनेक तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, त्याबाबत उपाययोजना होताना दिसत नाहीत. या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले या दोघांशीही मी चर्चा करतो नंतर तुम्हाला उत्तर देतो.आमदार, खासदार यांचा फंड वापराकोरोनाशी लढा देत असताना आर्थिक समस्या पुढे येत आहे, अशा वेळी आमदार-खासदार यांचे फंड या लढ्यामध्ये विना अटी-शर्तीचे वापरले गेले पाहिजेत, असा अशा सूचना देखील उदयनराजे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले