शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी दहा ते दुपारी दोन कोरोना नाही का? : उदयनराजेंचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 18:45 IST

दहा ते दोन या वेळेत कोरोना नसतो का? आणि दोन नंतर तो बाहेर पडतो का?, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांची व्यथा मांडली आहे.

ठळक मुद्देसकाळी दहा ते दुपारी दोन कोरोना नाही का? : उदयनराजेंचा सवालकायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी योग्य निर्णय घ्यावा

सातारा : कोरोनाच्या महामारीत देखील राजधानीचे दिल्ली शहर सुरू ठेवण्यात आलेले आहे, मग साताऱ्यात कशासाठी लॉकडाऊन करण्यात येते. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत केवळ दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश प्रशासन देत आहे, मला प्रश्न पडतो की दहा ते दोन या वेळेत कोरोना नसतो का? आणि दोन नंतर तो बाहेर पडतो का?, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांची व्यथा मांडली आहे.खासदार उदयनराजे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डॉक्टरांसोबत घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.खासदार उदयनराजे म्हणाले, ''कोरोनाशी लढताना लॉकडाऊन हा उपाय नाही. प्रशासन लोकांना किती दिवस दामटून ठेवणार आहे. लोकांनी व्यवसायासाठी बँकांची कर्ज घेतले आहेत. जरी हप्ते भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली असली तरी देखील त्यानंतर त्यांना व्याजासहित कर्जाच्या रकमा भराव्य लागणार आहेत.

अशा परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जिल्हाधिकाऱ्यांवर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या संख्येपेक्षा कितीतरी पट लोकसंख्या आहे. भविष्यामध्ये चोऱ्यामाऱ्या तसेच इतर गुन्हे वाढू शकतात, हे लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले पाहिजेत.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्यांना लक्षणे दिसून आली आहेत. त्यांना सेंटरमध्ये न नेता त्यांना होम कॉरनटाईन होण्यास मुभा देण्यात यावी. कारण कॉरनटाईन सेंटरमध्ये उपासमार होऊ लागली आहे, तसेच एकमेकांच्या संपर्कामुळे त्याठिकाणी कोणाची संसर्ग वाढू शकतो.

जिल्हा शासकीय रुग्णालयमध्ये नर्सिंग स्टाफची भरती करणे तसेच तज्ञ फिजिशियन उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे. खासगी तज्ञ डॉक्टर्स जिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी तयार आहेत; परंतु त्यांना अल्प मानधन दिले जाते. त्याउलट खासगी दवाखान्यात चालून त्यांना चांगले पैसे मिळतात, त्यामुळे सरकारनेच आपले धोरण बदलणे गरजेचे आहे. खासगी डॉक्टरांना नेमणूक देताना त्यांना मानधन वाढवून द्यावे, तसेच कंपन्यांचा सीएसआर फंड विरोधातील लढाईत वापरावा.पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री यांच्याकडे लोकांनी लॉकडाऊन बाबतचा तसेच कोरोना वाढीसंदर्भातल्या अनेक तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, त्याबाबत उपाययोजना होताना दिसत नाहीत. या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले या दोघांशीही मी चर्चा करतो नंतर तुम्हाला उत्तर देतो.आमदार, खासदार यांचा फंड वापराकोरोनाशी लढा देत असताना आर्थिक समस्या पुढे येत आहे, अशा वेळी आमदार-खासदार यांचे फंड या लढ्यामध्ये विना अटी-शर्तीचे वापरले गेले पाहिजेत, असा अशा सूचना देखील उदयनराजे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले