शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

उपसा सिंचनच्या पंपहाऊसलाच कोरड !

By admin | Updated: May 29, 2015 00:05 IST

तारळे, बांबवडे योजना धुळखात पडून : उद्घाटन होऊनही पोटपाटाअभावी योजना बंद; शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीच्या स्वप्नांचा चुराडा

एकनाथ माळी- तारळे--उद्घाटन होवूनही तारळे, बांबवडे उपसा सिंचन योजना दोन वर्षांपासून धुळखात पडल्या आहेत. पोटपाटाच्या कामाचा नारळच न फुटल्याने कोट्यावधींच्या योजना, पंपहाऊस व यंत्रसामुग्री बेवारस बनली असून या योजना म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’ अशा बनल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न भंगले आहे.तारळी धरणातून वाहणारे पाणी नदीपात्रात कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. त्यातून शासन खर्चाने पन्नास मीटर हेड पाणी उचलून उपसा सिंचन योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या शेतीला देण्यात येणार आहे. पाच योजना प्रस्तावित असून तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजना दोन वर्षांपूर्वी पूर्ण होवून त्यांची उद्घाटने झाली आहेत; पण अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे दोन्ही योजनांच्या पोटपाटाच्या कामाला सुरूवात न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन्ही योजनांखाली येणाऱ्या क्षेत्रात बहुतांशी शेतकऱ्यांनी स्वत:च्या खर्चाच्या योजना केल्या आहेत. तरीही अंदाजे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलीताच्या प्रतिक्षेत आहे. तारळी धरणाच्या पाण्यावर भविष्याची स्वप्ने शेतकऱ्यांमधून बघण्यात येत आहेत; पण शासकीय अनास्थेमुळे दोन वर्षांपासून या योजना अडगळीत पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हिरवाईचे स्वप्न कोसो दूर असून यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच राजकीय यंत्रणेतसुध्दा अनास्था असल्याचे दिसते. दोन वर्षांपासून पोटपाटाच्या कामाचा सर्वेच झाला नसल्याची कबूली अधिकाऱ्यांनीच दिल्याने नक्की त्यांचा कारभार कसा दिशाहिन आहे, हे दिसून येत आहे. पोटपाटाचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधितांकडे वेळच नव्हता तर सरकारचे पर्यायाने गोरगरीब जनतेचे कोट्यावधी रूपये खर्च करून उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याची गरज काय होती, असा सवाल विचारण्यात येत आहे. कुणाचे हितसंबंध जपण्यासाठी का कुणाचे भले करण्यासाठी या हत्तीखाना असणाऱ्या योजना गोरगरीबांच्या माथी लादण्यात आल्या आहेत. उपसा सिंचनच्या पंपहाऊसलाच कोरड !तारळे, बांबवडे योजना धुळखात पडून : उद्घाटन होऊनही पोटपाटाअभावी योजना बंद; शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीच्या स्वप्नांचा चुराडाएकनाथ माळी ल्ल तारळेउद्घाटन होवूनही तारळे, बांबवडे उपसा सिंचन योजना दोन वर्षांपासून धुळखात पडल्या आहेत. पोटपाटाच्या कामाचा नारळच न फुटल्याने कोट्यावधींच्या योजना, पंपहाऊस व यंत्रसामुग्री बेवारस बनली असून या योजना म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’ अशा बनल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न भंगले आहे.तारळी धरणातून वाहणारे पाणी नदीपात्रात कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. त्यातून शासन खर्चाने पन्नास मीटर हेड पाणी उचलून उपसा सिंचन योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या शेतीला देण्यात येणार आहे. पाच योजना प्रस्तावित असून तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजना दोन वर्षांपूर्वी पूर्ण होवून त्यांची उद्घाटने झाली आहेत; पण अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे दोन्ही योजनांच्या पोटपाटाच्या कामाला सुरूवात न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन्ही योजनांखाली येणाऱ्या क्षेत्रात बहुतांशी शेतकऱ्यांनी स्वत:च्या खर्चाच्या योजना केल्या आहेत. तरीही अंदाजे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलीताच्या प्रतिक्षेत आहे. तारळी धरणाच्या पाण्यावर भविष्याची स्वप्ने शेतकऱ्यांमधून बघण्यात येत आहेत; पण शासकीय अनास्थेमुळे दोन वर्षांपासून या योजना अडगळीत पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हिरवाईचे स्वप्न कोसो दूर असून यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच राजकीय यंत्रणेतसुध्दा अनास्था असल्याचे दिसते. दोन वर्षांपासून पोटपाटाच्या कामाचा सर्वेच झाला नसल्याची कबूली अधिकाऱ्यांनीच दिल्याने नक्की त्यांचा कारभार कसा दिशाहिन आहे, हे दिसून येत आहे. पोटपाटाचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधितांकडे वेळच नव्हता तर सरकारचे पर्यायाने गोरगरीब जनतेचे कोट्यावधी रूपये खर्च करून उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याची गरज काय होती, असा सवाल विचारण्यात येत आहे. कुणाचे हितसंबंध जपण्यासाठी का कुणाचे भले करण्यासाठी या हत्तीखाना असणाऱ्या योजना गोरगरीबांच्या माथी लादण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या अनास्थेने अडगळीत पडलेल्या तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनांसाठी सुमारे चोवीस कोटींचा निधी जिरवण्यात आला आहे. यासाठी अधुनिक यंत्रसामुग्री वापरण्यात आली असून दोन वर्षात त्याची दुरवस्था झाली आहे.तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या पोटपाटाची कामे करण्यासंदर्भात गतवर्षी आमच्या कण्हेर विकास विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. आमच्या विभागाला स्वतंत्र निधी उपलब्ध होत नाही. उपविभागाकडून मिळणाऱ्या फंडावरच काम करावे लागते. तारळे उपसा सिंचन योजनेचा सर्व्हे पूर्ण होवून प्लॅन, इस्टिमेट तयार झाले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या पोटपाटाच्या कामाला विलंब झाला आहे. दोन्ही योजना पूर्ण होण्यासाठी निधीची मागणी केली असून लवकरात लवकर कामांना सुरूवात होईल. - वैष्णवी नारकर कण्हेर विकास विभाग, सातारा