शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

पोलादी अजिंक्यताऱ्यावर लोखंडाची चोरी

By admin | Updated: October 13, 2015 00:18 IST

किल्ल्याची वाट बिकट : मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या सातारकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजनेची गरज

सचिन काकडे- सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याकडेला बसविण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगची दुरवस्था झाली आहे. रेलिंगला लावण्यात आलेले लोखंडी पाईप तुटून गेले आहेत, तर अनेक ठिकाणच्या पाईप चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे. एवढे घडूनही संबंधित विभागाचे याबाबीकडे अजूनही दुर्लक्ष आहे. सुरक्षा रेलिंगची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याठिकाणचे सौंदर्य नागरिकांना नेहमीच भुरळ घालते. त्यामुळे भल्या पहाटे आबालवृद्धांची किल्ल्यावर मॉर्निंग वॉकसाठी गर्दी होते. किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. मात्र, किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्याची वाट सध्या बिकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगची दुरवस्था झाली आहे. रेलिंगमधील अनेक लोखंडी पाईप चोरीला गेले आहेत. त्यामुळे रस्त्याकडेला केवळ खांबच उभे आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे चित्र असेच आहे. मात्र, संबंधित विभागाने याबाबत अद्याप कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना धोका पत्करूनच चालावे लागते.नवरात्रोत्सवास मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या कलावधीत किल्ल्यावर असणाऱ्या मंगळाई देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने किल्ल्यावर येतात. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.लोखंडी पाईप गंजखात; जागोजागी खड्डेरस्त्याकडेला असणाऱ्या लोखंडी पाईप गेल्या अनेक वर्षांपासून गंज खात पडल्या आहेत. पाईप कमकुवत झाल्याने चोरट्यांना त्या पाईप जमिनीतून काढणे सहज शक्य होत आहे. त्यामुळे लोखंडी पाईप चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.अजिंक्यतारा किल्याकड येणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नागरिकांचा कसरत करूनच या रस्त्यावरून चालावे लागले. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर डांबरच पडले नाही. त्यामुळे पावसामुळे हा रस्ता जागोजागी उखडला आहे.सुरक्षारक्षकाची कायमस्वरूपी नियुक्ती हवीकिल्ल्यावर चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच वृक्षतोडीच्या घटनाही घडत आहेत. या घटनांवर अंकुश लावण्यासाठी किल्ल्यावर कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.