शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

पोलादी अजिंक्यताऱ्यावर लोखंडाची चोरी

By admin | Updated: October 13, 2015 00:18 IST

किल्ल्याची वाट बिकट : मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या सातारकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजनेची गरज

सचिन काकडे- सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याकडेला बसविण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगची दुरवस्था झाली आहे. रेलिंगला लावण्यात आलेले लोखंडी पाईप तुटून गेले आहेत, तर अनेक ठिकाणच्या पाईप चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे. एवढे घडूनही संबंधित विभागाचे याबाबीकडे अजूनही दुर्लक्ष आहे. सुरक्षा रेलिंगची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याठिकाणचे सौंदर्य नागरिकांना नेहमीच भुरळ घालते. त्यामुळे भल्या पहाटे आबालवृद्धांची किल्ल्यावर मॉर्निंग वॉकसाठी गर्दी होते. किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. मात्र, किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्याची वाट सध्या बिकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगची दुरवस्था झाली आहे. रेलिंगमधील अनेक लोखंडी पाईप चोरीला गेले आहेत. त्यामुळे रस्त्याकडेला केवळ खांबच उभे आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे चित्र असेच आहे. मात्र, संबंधित विभागाने याबाबत अद्याप कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना धोका पत्करूनच चालावे लागते.नवरात्रोत्सवास मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या कलावधीत किल्ल्यावर असणाऱ्या मंगळाई देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने किल्ल्यावर येतात. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.लोखंडी पाईप गंजखात; जागोजागी खड्डेरस्त्याकडेला असणाऱ्या लोखंडी पाईप गेल्या अनेक वर्षांपासून गंज खात पडल्या आहेत. पाईप कमकुवत झाल्याने चोरट्यांना त्या पाईप जमिनीतून काढणे सहज शक्य होत आहे. त्यामुळे लोखंडी पाईप चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.अजिंक्यतारा किल्याकड येणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नागरिकांचा कसरत करूनच या रस्त्यावरून चालावे लागले. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर डांबरच पडले नाही. त्यामुळे पावसामुळे हा रस्ता जागोजागी उखडला आहे.सुरक्षारक्षकाची कायमस्वरूपी नियुक्ती हवीकिल्ल्यावर चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच वृक्षतोडीच्या घटनाही घडत आहेत. या घटनांवर अंकुश लावण्यासाठी किल्ल्यावर कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.