शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

दुष्काळाच्या चटक्यानंतर धुक्यात घुसमट

By admin | Updated: October 5, 2015 00:15 IST

संकट टळता टळेना : करपासह विविध रोगांचा पिकांवर प्रादुर्भाव; निसर्गाचे कालचक्र बिघडल्याने बळीराजा धास्तावला

भुर्इंज : पावसाळ्याआधीच पडलेल्या अवकाळी पावसाने हळदसह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने पडलेल्या दुष्काळामुळे बागायती भागातही शेतकरी अडचणीत आले. आणि आता धुके पडू लागल्याने भुर्इंज परिसरातील पिकांवर करपासह विविध रोगांनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेला दुष्टचक्राचा फेरा संपता संपेना, अशी परिस्थिती आहे.अवकाळी पावसाने या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तरीदेखील कंबर कसून उभे राहिलेल्या शेतकऱ्यांना पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे पिके धोक्यात आली. त्यातच आता गेली काही दिवस धुके पडू लागल्याने शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या अडणचीत आले आहेत. धुक्यामुळे पिकांवर रोग पडू लागले असून, हळदसह विविध पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे. निसर्गाचे कालचक्र बिघडल्याने बळीराजा धास्तावला आहे.याबाबत बोलताना प्रगतशील शेतकरी उत्तमराव भोसले म्हणाले, ‘आम्हाला निसर्गाचे काहीच कळेनासे झाले आहे. अवकाळी पावसाने नुकसान केले, दुष्काळाने फटका दिला आता धुकं आम्हा शेतकऱ्यांची वाट लावत आहे. हळद पिकावर करपा पडला आहे. इतर पिकांनाही या धुक्याचा मोठा फटका बसत असून, आम्ही बागायती भागातले म्हणून आमच्या नुकसानीची दखल सरकारही घेईना. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांची मात्र वाट लागत आहे. (वार्ताहर)धुकं पिकांना घातकच--धुकं पडलं की शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण होते. कारण धुक्यामुळे पिकांवर करपा आणि तांबरा यासह विविध रोग आक्रमण करतात. पोटच्या पोरावानी सांभाळलेली पिकं या रोगांनी वाया जाण्याची भीती अधिक असते. हळद, ज्वारी, गहू, आलं, सोयाबीन अशी नगदी पिकं यावेळी शेतात बहरलेली असतात; पण याच पिकांना धुक्यामुळे या रोगांचा जास्त धोका असतो. सध्या या रोगांचा प्रादुर्भाव या परिसरात दिसत असून, निसर्गाने का अवकृपा केली हेच समजेना? असा प्रश्न भुर्इंज येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब जाधवराव व जांब येथील दत्तात्रय शिंदे यांनी उपस्थित केला.