शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

दुष्काळाच्या चटक्यानंतर धुक्यात घुसमट

By admin | Updated: October 5, 2015 00:15 IST

संकट टळता टळेना : करपासह विविध रोगांचा पिकांवर प्रादुर्भाव; निसर्गाचे कालचक्र बिघडल्याने बळीराजा धास्तावला

भुर्इंज : पावसाळ्याआधीच पडलेल्या अवकाळी पावसाने हळदसह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने पडलेल्या दुष्काळामुळे बागायती भागातही शेतकरी अडचणीत आले. आणि आता धुके पडू लागल्याने भुर्इंज परिसरातील पिकांवर करपासह विविध रोगांनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेला दुष्टचक्राचा फेरा संपता संपेना, अशी परिस्थिती आहे.अवकाळी पावसाने या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तरीदेखील कंबर कसून उभे राहिलेल्या शेतकऱ्यांना पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे पिके धोक्यात आली. त्यातच आता गेली काही दिवस धुके पडू लागल्याने शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या अडणचीत आले आहेत. धुक्यामुळे पिकांवर रोग पडू लागले असून, हळदसह विविध पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे. निसर्गाचे कालचक्र बिघडल्याने बळीराजा धास्तावला आहे.याबाबत बोलताना प्रगतशील शेतकरी उत्तमराव भोसले म्हणाले, ‘आम्हाला निसर्गाचे काहीच कळेनासे झाले आहे. अवकाळी पावसाने नुकसान केले, दुष्काळाने फटका दिला आता धुकं आम्हा शेतकऱ्यांची वाट लावत आहे. हळद पिकावर करपा पडला आहे. इतर पिकांनाही या धुक्याचा मोठा फटका बसत असून, आम्ही बागायती भागातले म्हणून आमच्या नुकसानीची दखल सरकारही घेईना. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांची मात्र वाट लागत आहे. (वार्ताहर)धुकं पिकांना घातकच--धुकं पडलं की शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण होते. कारण धुक्यामुळे पिकांवर करपा आणि तांबरा यासह विविध रोग आक्रमण करतात. पोटच्या पोरावानी सांभाळलेली पिकं या रोगांनी वाया जाण्याची भीती अधिक असते. हळद, ज्वारी, गहू, आलं, सोयाबीन अशी नगदी पिकं यावेळी शेतात बहरलेली असतात; पण याच पिकांना धुक्यामुळे या रोगांचा जास्त धोका असतो. सध्या या रोगांचा प्रादुर्भाव या परिसरात दिसत असून, निसर्गाने का अवकृपा केली हेच समजेना? असा प्रश्न भुर्इंज येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब जाधवराव व जांब येथील दत्तात्रय शिंदे यांनी उपस्थित केला.