शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या चटक्यानंतर धुक्यात घुसमट

By admin | Updated: October 5, 2015 00:15 IST

संकट टळता टळेना : करपासह विविध रोगांचा पिकांवर प्रादुर्भाव; निसर्गाचे कालचक्र बिघडल्याने बळीराजा धास्तावला

भुर्इंज : पावसाळ्याआधीच पडलेल्या अवकाळी पावसाने हळदसह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने पडलेल्या दुष्काळामुळे बागायती भागातही शेतकरी अडचणीत आले. आणि आता धुके पडू लागल्याने भुर्इंज परिसरातील पिकांवर करपासह विविध रोगांनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेला दुष्टचक्राचा फेरा संपता संपेना, अशी परिस्थिती आहे.अवकाळी पावसाने या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तरीदेखील कंबर कसून उभे राहिलेल्या शेतकऱ्यांना पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे पिके धोक्यात आली. त्यातच आता गेली काही दिवस धुके पडू लागल्याने शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या अडणचीत आले आहेत. धुक्यामुळे पिकांवर रोग पडू लागले असून, हळदसह विविध पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे. निसर्गाचे कालचक्र बिघडल्याने बळीराजा धास्तावला आहे.याबाबत बोलताना प्रगतशील शेतकरी उत्तमराव भोसले म्हणाले, ‘आम्हाला निसर्गाचे काहीच कळेनासे झाले आहे. अवकाळी पावसाने नुकसान केले, दुष्काळाने फटका दिला आता धुकं आम्हा शेतकऱ्यांची वाट लावत आहे. हळद पिकावर करपा पडला आहे. इतर पिकांनाही या धुक्याचा मोठा फटका बसत असून, आम्ही बागायती भागातले म्हणून आमच्या नुकसानीची दखल सरकारही घेईना. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांची मात्र वाट लागत आहे. (वार्ताहर)धुकं पिकांना घातकच--धुकं पडलं की शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण होते. कारण धुक्यामुळे पिकांवर करपा आणि तांबरा यासह विविध रोग आक्रमण करतात. पोटच्या पोरावानी सांभाळलेली पिकं या रोगांनी वाया जाण्याची भीती अधिक असते. हळद, ज्वारी, गहू, आलं, सोयाबीन अशी नगदी पिकं यावेळी शेतात बहरलेली असतात; पण याच पिकांना धुक्यामुळे या रोगांचा जास्त धोका असतो. सध्या या रोगांचा प्रादुर्भाव या परिसरात दिसत असून, निसर्गाने का अवकृपा केली हेच समजेना? असा प्रश्न भुर्इंज येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब जाधवराव व जांब येथील दत्तात्रय शिंदे यांनी उपस्थित केला.