शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

खंडाळा एमआयडीसी टप्पा तीनसाठी शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:05 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यातील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संमतीधारक शेतकऱ्यांचे सलग क्षेत्र ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यातील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संमतीधारक शेतकऱ्यांचे सलग क्षेत्र अधिग्रहीत करून त्याचा मोबदला त्वरित वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे या टप्प्यातील जमिनीवरील शिक्के उठवले असले तरी उर्वरित क्षेत्रात औद्योगिकीकरणाचा विस्तार होणार आहे.

औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यातील जमीन संपादनासाठी खंडाळा तहसील कार्यालयात संबंधित शेतकऱ्यांसमवेत एक बैठक घेण्यात आली. यावेळी एमआयडीसीचे कोल्हापूर विभागीय अधिकारी धनाजी इंगळे, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

तालुक्यातील मोर्वे, भादे, अहिरे, बावडा, म्हावशी, खंडाळा या गावांमधील शेतजमीन एमआयडीसी टप्पा क्रमांक तीनसाठी औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले होते. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही सुरू होती. मात्र, तालुक्यातील शेतकऱ्यांचा या गोष्टींसाठी सातत्याने विरोध होता. त्यामुळे काही गावांतील क्षेत्र वगळण्यात आले आहे. मात्र, शिवाजीनगर, भादे येथील ज्या शेतकऱ्यांची संमती आहे त्यांचे क्षेत्र घेण्याबाबत शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी संपादित करण्यात येणाऱ्या क्षेत्रातील एकाच गटातील आणेवारी निश्चित नाही. तरीही एमआयडीसीला व्यवहार केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला.

त्यासाठी आणेवारी दुरुस्ती करूनच मोबदला दिला जाईल, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बागायत केले आहे त्या क्षेत्राऐवजी बदली जमीन मिळावी, अशी मागणी केली. याबाबत संबंधित खातेदारांनी बदली क्षेत्र निदर्शनास आणून दिले तर त्यात सहकार्य केले जाईल. औद्योगिक वसाहतीला आवश्यक सलग क्षेत्र मिळविण्यासाठी भूसंपादन मंडळाचे प्रयत्न सुरू असून ज्या क्रमाने गटाचे संपादन होईल त्यानुसार भूसंपादित जमिनीचा मोबदला वाटप करण्यात येणार आहे. याबाबतीत शेतकऱ्यांच्या अन्य काही अडचणी असतील तर त्या मांडा. त्यावर मार्ग काढून संपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.