शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

भाजपच्या जाहिरातीत महाराष्ट्राचा अपमान

By admin | Updated: October 5, 2014 00:18 IST

शरद पवार : वाई, मल्हारपेठ येथे प्रचारसभा; शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे मोदी सरकारचे काम

मल्हारपेठ/वाई : निवडणुकीच्या काळात भाजपकडून प्रक्षेपित करण्यात येणारी जाहिरात महाराष्ट्राचा अपमान करणारी आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्र तसा नसतानाही जाहिरातीतून तो दाखविला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील प्रचार सभेत केली.वाई येथे मकरंद पाटील आणि मल्हारपेठ येथे सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी भाजपच्या जाहिरातींच्या अनुषंगाने मोदी सरकारवर प्रहार केला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र जणू काही रसातळालाच गेला आहे. अशी वातावरण निर्मिती भाजपच्या जाहिरातीतून केली जात आहे. यामुळे राज्याची संपूर्ण देशात बदनामी होत आहे. मोदी सरकारने निर्यातबंदीचे धोरण राबविल्यामुळे फळ, दूध आणि काद्यांचे दर झपाट्याने कमी झाले.’ नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार तीन महिन्यांत घेतलेल्या निर्णयामुळे लोकप्रियता हरवून बसले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात आला. परिणामी त्याचा फायदा देशातील ६७ टक्के जनतेला झाला. मात्र, मोदी सरकार देशातील संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम करत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.घोडं आहे तेथेच आहे...शरद पवारांनी मल्हारपेठेतील सभेत शंभूराज देसाई यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘स्वत:च्या हातात कारखाना असणाऱ्यांना तो नीट संभाळता येत नाही. राज्यातील बहुतांशी कारखाने प्रतिदिन चार हजार टन गाळप करतात; मात्र कोठेही प्रतिदिन १२५0 टन गाळप करणारा कारखाना नाही. मात्र, यांच्या कारखान्याचं घोडं आहे तेथे आहे.’ पवारांच्या या वाक्यावर सभेत चांगलाच हशा पिकला. शरद पवारांनी दोन्ही सभेत मकरंद पाटील आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्या तरुणाईचा गौरव करत राष्ट्रवादीच्या या चेहऱ्यांना संधी देण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीने नेहमीच नव्या पिढीच्या कर्तृत्वाला वाव दिल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला.