शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

पाणीगळती रोखण्यासाठी नळजोडांना मीटर बसवा - शंभूराज देसाई

By सचिन काकडे | Updated: December 5, 2023 17:54 IST

सातारा पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.

सातारा : शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा योजना, वितरण वाहिन्या आदींचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. हे करत असताना पालिका प्रशासनाने पाणीगळती रोखण्यासाठी सर्व नळजोडांना मीटर बसविण्याचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

सातारा पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट, पालिका प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील, नगर अभियंता दिलीप चिद्रे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, यावर्षी धरणातील पाणीसाठ्याची गंभीर परिस्थिती असून, पुढील काळात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कास तलावात पुरेसे पाणी असेल तरी त्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करायला हवे. पाणी गळती होऊ नये यासाठी सर्व शहरात नळजोडांना मीटर बसवणे आवश्यक आहे. शहरात स्वच्छता राखण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी कचरा व्यवस्थापन योग्यरीत्या करावे. भुयारी गटार योजना शहराच्या ठराविक भागात न करता संपूर्ण शहर समाविष्ट होईल अशा प्रकारे राबवावी. त्यासाठी उर्वरित भागाचा प्रस्ताव तातडीने तयार करून सादर करावा. उड्डाण पुलांच्या मोकळ्या जागांचे सुशोभीकरण करत असताना वृद्ध, बालके यांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता येईल याचाही विचार करावा.

मुख्याधिकारी बापट यांनी पालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. कास धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाल्याने कास मधील पाणी संपूर्ण शहरासाठी येणार आहे. अमृत २.० अंतर्गत जल विद्युत प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. प्रस्तावित कास पाणीपुरवठा योजना, शहर सुशोभीकरण, गोडोली तळे खोलीकरण, अजिंक्यतारा रस्ता विकास आदी आदी प्रकल्पांची त्यांनी तपशीलवार माहिती दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर