शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

सह्याद्रीतील निद्रिस्त झऱ्यांना फोडला पाझर

By admin | Updated: April 1, 2017 17:02 IST

पशुपक्ष्यांची मिटली तहान : कास पठारावरील कुसुंबीमुरा वन व्यवस्थापन समितीचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतपेट्री,(जि. सातारा), दि. १ : साताऱ्याच्या पश्चिमेस कास पठारालगतच्या कुसुंबीमुरा हद्दीतील निद्रिस्त नैसर्गिक झऱ्यांना नवसंजीवनी दिली आहे. त्यामुळे वन्य पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले आहे. कुसुंबीमुरा वनव्यवस्थापन समितीने स्तुत्य उपक्रम राबविला असून, समाजासमोर उत्तम असा आदर्श ठेवला आहे.शहराच्या पश्चिमेस डोंगर पठारावरील गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण होऊ लागले आहे. तसेच उन्हाच्या तीव्रतेने तळी, झऱ्यांचे पाणीही कमी होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत माणसाचीच पाण्यासाठी वणवण सुरू झालेली असताना वन्य प्राण्यांची अवस्था फार बिकट होते आहे. मुक्या प्राण्यांची ही गरज ओळखून कुसुंबीमुरा वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे, तसेच भरत कोकरे, किसन चिकणे, ज्ञानदेव चिकणे, सुरेश चिकणे आदी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन वन्य पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या दृष्टीने झऱ्यांची सफाई केली आहे. या परिसरात वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतीसह अनेक वन्यजीव आढळतात. यात विशेषत: ससे, रानडुकरे, भेकर, सायाळ, खवले मांजर, सांबर, बिबट्या, रानगवे, रानकुत्रा, वानर, माकड, पिसोरी, अस्वले तसेच उभयचर प्राणी, पक्षी ,कीटक, फुलपाखरे आढळतात. कासच्या दुर्गम परिसरात असल्याने या गावाला नेहमीच वन्य प्राण्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. कधी पिकांची नासाडी होते. मुक्या प्राण्यांवर जिवापाड प्रेम करत उन्हाळ्यात पाण्यावाचून या जिवांची होणारी तडफड थांबविण्याचा स्तुत्य निर्णय घेत शेतीची कामे बाजूला करून झऱ्यांची साफसफाई केली आहे.कास पठारालगत कुसुंबीमुरा गावाच्या हद्दीत कड्याकपारी, दाट झाडीत नैसर्गिक झरे (पाणवठे) आहेत. परंतु या झऱ्यांवर चिखल, माती, दगडे, पालापाचोळा साचल्याने बहुतांशी झरे मुजून निद्रिस्त अवस्थेच्या मार्गावर असल्याने पाण्याचा प्रवाह बंद होण्याच्या मार्गावर असताना येथील झऱ्यांचा पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा तसेच कास पठार परिसरातील वन्य पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणताही अडसर निर्माण होऊ नये, या भावनेतून कुसुंबीमुरा वनव्यवस्थापन समितीने परिसरातील निर्द्रितावस्थेतील झरे शोधण्यासाठी मोहीम राबविली.दिवसभरात चार पाणवठ्यांची टिकाव, खोरे साहित्याने स्वच्छता करत निद्रिस्त झऱ्यांवर साचलेला तसेच सभोवताली पडलेला पालापाचोळा बाजूला केला. दगड, मातीने मुजवून दडपल्या गेलेल्या पाणवठ्यांवरचा चिखल काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करून सभोवताली दगड रचून या झऱ्यांना जणू काही नवसंजीवनी देण्याचाच प्रयत्न केला आहे. पाण्याच्या शोधावर लघुपटहीजागतिक वारसा हक्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर वैविध्यपूर्ण वनसंपदा तसेच प्राणी आहेत. येथील पर्यावरण संतुलित राहावे, यादृष्टीने पठाराच्या कड्याकपारीतील या गावांमधील ग्रामस्थ, तरूणांनी गेल्यावर्षी उन्हाळ्यात स्वत:चा जीव मूठीत धरून घळी, गुहा साफ केल्या होत्या. झरे, पाणवठे, आटल्याने वन्य पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी भर उन्हात कित्येक मैल दूर अंतरावरून चालत डोक्यावरून घागरीद्वारे पाणी वाहून घळी, गुहेतील जमिनीलगत पूरलेल्या पत्र्याच्या डब्यात आणून पाणीसाठा केला होता. अनेक झाडांवर प्लास्टिक बाटल्या टांगून त्यात वेळोवेळी पाणी टाकून पक्ष्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर पाणी संघर्षावर मात करण्यासाठी गावातील जुन्या जाणकारांच्या पूवार्नुभवानुसार वनस्पतींच्या साह्याने ३५ वर्षांपूर्वी पन्नास फूट खोल खणत पाण्याचा शोध लावून झरे निर्माण केले होते. यावर कड्याचे पाणी हा लघुपटही प्रदर्शित झाला आहे.पूर्वी गुराखी वर्षभर जनावरे चारत असल्याने या झऱ्यांवर गुराख्यांचे कायम लक्ष असायचे. तसेच हे झरे वेळोवेळी साफ केले जायचे. परंतु आत्ता गुरांचे प्रमाण फार कमी झाल्याने तसेच जनावरे गोठ्यातच बांधली गेल्याने हे पाणवठे दुर्लक्षित होत पालापाचोळा, दगड, मातीने मूजण्याच्या मार्गावर होते. येथील झरे नष्ट होऊ नये तसेच पूवीर्सारखा पाण्याचा प्रवाह सुरू राहून वन्य पशुपक्ष्यांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने झऱ्यांची साफसफाई करण्यात आली आहे.- ज्ञानेश्वर आखाडे अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती कुसुंबीमुरा