शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवरायांमुळे लिहिण्याची प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:26 IST

पाचगणी : मोठ्यांनी लहानांसाठी लिहिलेले साहित्य म्हणून बालसहित्याचा उल्लेख होत असला तरी बाल्यावस्थेत वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ...

पाचगणी : मोठ्यांनी लहानांसाठी लिहिलेले साहित्य म्हणून बालसहित्याचा उल्लेख होत असला तरी बाल्यावस्थेत वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून आपणाला प्रेरणा दिली,’ असे मत अखिल भारतीय साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.भिलार येथे आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लेखक संजय मालपाणी, ज्येष्ठ लेखिका रेणू दांडेकर, स्वागताध्यक्ष बाळासाहेब भिलारे, डॉ. संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरू, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, सहकार्यवाह सुनील महाजन, सरपंच वंदना भिलारे, समन्वयक शिरीष चिटणीस, प्रवीण भिलारे उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले, ‘सुमारे सातशे वर्षांपूर्वी महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी कावळा चिमणीची गोष्ट सांगितली. ती बालकांबरोबर प्रौढांसाठी ही मागर्दशक आहे. त्यामुळे साहित्यनिर्मितीत मोठ्यांचे आणि बालसाहित्य असा भेदभाव नको; पण बालमनावर संस्कार घडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लेखन झाले पाहिजे.’दांडेकर म्हणाल्या, ‘आजोबा-आजीच्या गोष्टी ऐकतच आम्ही मोठे झालो; पण आता या गोष्टीची जागा लॅपटॉप, मोबाईलने घेतली. हे सर्व बदल संस्कारक्षम पिढी घडविण्यास खोडा घालत आहेत. निसर्ग आणि पुस्तके आपणाला आनंद देतात म्हणजे वाचन करा व लिहिते व्हा.’यावेळी लेखक संजय मालपाणी यांनी भोलनाथाची गोष्ट बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून सांगितली. वाचनाचे महत्त्व पटवून दिले. सुनील महाजन यांनी प्रास्तविक केले. रसूल पठाण यांनी सूत्रसंचालन केले. संजय ऐलवाड यांनी आभार मानले.