शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवरायांमुळे लिहिण्याची प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:26 IST

पाचगणी : मोठ्यांनी लहानांसाठी लिहिलेले साहित्य म्हणून बालसहित्याचा उल्लेख होत असला तरी बाल्यावस्थेत वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ...

पाचगणी : मोठ्यांनी लहानांसाठी लिहिलेले साहित्य म्हणून बालसहित्याचा उल्लेख होत असला तरी बाल्यावस्थेत वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून आपणाला प्रेरणा दिली,’ असे मत अखिल भारतीय साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.भिलार येथे आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लेखक संजय मालपाणी, ज्येष्ठ लेखिका रेणू दांडेकर, स्वागताध्यक्ष बाळासाहेब भिलारे, डॉ. संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरू, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, सहकार्यवाह सुनील महाजन, सरपंच वंदना भिलारे, समन्वयक शिरीष चिटणीस, प्रवीण भिलारे उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले, ‘सुमारे सातशे वर्षांपूर्वी महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी कावळा चिमणीची गोष्ट सांगितली. ती बालकांबरोबर प्रौढांसाठी ही मागर्दशक आहे. त्यामुळे साहित्यनिर्मितीत मोठ्यांचे आणि बालसाहित्य असा भेदभाव नको; पण बालमनावर संस्कार घडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लेखन झाले पाहिजे.’दांडेकर म्हणाल्या, ‘आजोबा-आजीच्या गोष्टी ऐकतच आम्ही मोठे झालो; पण आता या गोष्टीची जागा लॅपटॉप, मोबाईलने घेतली. हे सर्व बदल संस्कारक्षम पिढी घडविण्यास खोडा घालत आहेत. निसर्ग आणि पुस्तके आपणाला आनंद देतात म्हणजे वाचन करा व लिहिते व्हा.’यावेळी लेखक संजय मालपाणी यांनी भोलनाथाची गोष्ट बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून सांगितली. वाचनाचे महत्त्व पटवून दिले. सुनील महाजन यांनी प्रास्तविक केले. रसूल पठाण यांनी सूत्रसंचालन केले. संजय ऐलवाड यांनी आभार मानले.