शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवरायांमुळे लिहिण्याची प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:26 IST

पाचगणी : मोठ्यांनी लहानांसाठी लिहिलेले साहित्य म्हणून बालसहित्याचा उल्लेख होत असला तरी बाल्यावस्थेत वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ...

पाचगणी : मोठ्यांनी लहानांसाठी लिहिलेले साहित्य म्हणून बालसहित्याचा उल्लेख होत असला तरी बाल्यावस्थेत वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून आपणाला प्रेरणा दिली,’ असे मत अखिल भारतीय साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.भिलार येथे आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लेखक संजय मालपाणी, ज्येष्ठ लेखिका रेणू दांडेकर, स्वागताध्यक्ष बाळासाहेब भिलारे, डॉ. संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरू, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, सहकार्यवाह सुनील महाजन, सरपंच वंदना भिलारे, समन्वयक शिरीष चिटणीस, प्रवीण भिलारे उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले, ‘सुमारे सातशे वर्षांपूर्वी महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी कावळा चिमणीची गोष्ट सांगितली. ती बालकांबरोबर प्रौढांसाठी ही मागर्दशक आहे. त्यामुळे साहित्यनिर्मितीत मोठ्यांचे आणि बालसाहित्य असा भेदभाव नको; पण बालमनावर संस्कार घडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लेखन झाले पाहिजे.’दांडेकर म्हणाल्या, ‘आजोबा-आजीच्या गोष्टी ऐकतच आम्ही मोठे झालो; पण आता या गोष्टीची जागा लॅपटॉप, मोबाईलने घेतली. हे सर्व बदल संस्कारक्षम पिढी घडविण्यास खोडा घालत आहेत. निसर्ग आणि पुस्तके आपणाला आनंद देतात म्हणजे वाचन करा व लिहिते व्हा.’यावेळी लेखक संजय मालपाणी यांनी भोलनाथाची गोष्ट बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून सांगितली. वाचनाचे महत्त्व पटवून दिले. सुनील महाजन यांनी प्रास्तविक केले. रसूल पठाण यांनी सूत्रसंचालन केले. संजय ऐलवाड यांनी आभार मानले.