शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

सूचनांना हो हो.. काम मात्र शून्य

By admin | Updated: April 30, 2016 00:58 IST

कऱ्हाड : अधिकारी आक्रमक; पाणीपुरवठा विभागावर ताशेरे; जलसंधारणाची कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश--पंचायत समिती मासिक सभा

कऱ्हाड : पावसाळा सुरू होण्यास अजूनही किमान दीड महिन्याचा अवधी बाकी आहे. विशेषत: तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईची भीषण अवस्था आहे. तुम्ही आमच्या सूचनांना केवळ हो हो म्हणता, प्रत्यक्षात काम मात्र शून्य असते. या शब्दांत सभापती देवराज पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी देवराज पाटील होते. गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते. पाणीपुरवठा विभागाच्या आढाव्यावेळी सभापती पाटील यांनी जलयुक्त शिवार अंतर्गत तालुक्यातील जलसंधारणाची कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना केली. जलयुक्त शिवार योजना केवळ माण-खटाव तालुक्यासाठी नाही हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे. योजनेत समाविष्ट १३ गावांमध्ये जून महिना सुरू होण्यापूर्वी कामे पूर्ण करावीत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता महेश आरळेकर यांनी जिल्हा परिषदेकडे बोअरवेलसाठी पाठवलेले ३९ पैकी २३ प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले. यावेळी ज्या गावांमध्ये खोदलेल्या बोअरवेलना पाणी लागले नाही. त्याठिकाणी पुन्हा भूजल सर्वेक्षण करून नवीन बोअरवेल खोदण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. रूपाली यादव यांनी बोअरवेल मारताना अगोदर त्याठिकाणी योग्य प्रकारे भूजल सर्वेक्षण करावे. विनाकारण शासनाचा निधी वाया घालवू नये, अशी मागणी केली.भाग्यश्री पाटील यांनी आरफळ कॅनॉलला ५ मे पर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी उपस्थित इतर सदस्यांनी सांगितले की, आरफळ कॅनॉल परिसरातील विहिरींचे जलस्त्रोत टिकून राहावे यासाठी तरी पाणी सोडण्याची गरज आहे. गरज नसतानाही सलग ६२ दिवस आरफळ कॅनॉलला पाणी सोडण्यात येत होते. आता गरज असताना मात्र कॅनॉल कोरडा खडखडीत पडला आहे. माण-खटाव किंवा सांगली जिल्ह्याला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र नेहमीच टंचाईग्रस्त बनून राहिलेल्या मसूरच्या पूर्व भागालाही पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच पाटबंधारे विभागालाही ठराव दिला पाहिजे. प्रसंगी यासाठी मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्याची गरज आहे.शेरे-शेणोली परिसरात तीन महिन्यांपूर्वी विजेच्या अतिरिक्त दबावामुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे वीज कंपनीकडून अजूनही केला नसल्याबद्दल अनिता निकम यांनी नाराजी व्यक्त केली. ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी बजेटचे कारण आणखी किती दिवस सांगणार? या शब्दांत सभापतींनी आपली नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)पाणी आहे; पण वीज नाही!घोलपवाडी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी उपलब्ध झाले आहे. परंतु वीज कनेक्शनअभावी त्या पाण्याचा उपयोग ग्रामस्थांना करता येत नाही. पावसाळा सुरू होईपर्यंत संबंधित विहिरींचे अधिग्रहण करू देण्यासही संबंधित शेतकरी तयार आहेत. त्यामुळे या विहिरींचे पाणी उपलब्ध झाल्यास गावासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार नाही. तातडीने वीज कनेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना गटविकास अधिकाऱ्यांनी दिली.