शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

सातारा जिल्हा बँकेकडून ‘ईडी’ने मागविली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

सातारा : कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल्सला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वाटप ...

सातारा : कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल्सला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वाटप प्रकरणाची माहिती मागविली आहे. कारखान्याला दिलेले कोट्यवधींचे कर्ज कशाच्या आधारावर दिले, याचा खुलासा करण्याचे या ‘ईडी’च्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, जिल्हा बँकेने जरंडेश्वर शुगर मिल्सला नियमानुसारच कर्जपुरवठा केला असल्याचे स्पष्टीकरण बँकेतर्फे करण्यात आले आहे.

राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिलावात काढला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी हा कारखाना लिलावात घेतला होता. कारखाना लिलावात घेत असताना संबंधितांना चार विविध बँकांनी कर्जपुरवठा केला होता. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने संबंधितांना १२९.९८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. ईडीने नुकतीच जरंडेश्वर शुगर मिल्सवर जप्तीची कारवाई केली होती. या कारखान्याशी संबंधित सर्व कंपन्यांची कसून चौकशी सुरू आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जवाटपाबाबत खुलासा मागविण्यात आला असल्याने राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यापुढे जाऊन सविस्तर माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. जिल्हा बँकेने जरंडेश्वर शुगर मिल्सला तब्बल २३७.६० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे, त्यापैकी १२९.९८ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. तर ३१.६० कोटी रुपयांचे कर्ज वसूल झाले असून ९७.३८ कोटी रुपयांचे कर्ज येणेबाकी असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. कर्जाची वसुली नियमित सुरू आहे. राज्य सहकारी बँकेमार्फत कारखान्याच्या जप्ती व लिलाव प्रक्रियेविरुध्दची बाब न्याय प्रविष्ट झाल्याने राज्य बँकेची चौकशी करताना कारखान्याला मंजूर व वितरित केलेल्या कर्जाची माहीत मागविण्यात आली आहे. या कारखान्याला दिलेले कर्ज नियमानुसार आणि सुरक्षितरित्या केला असल्याचे बँकेने म्हटले आहे.

कोट

कर्जवाटपात काहीही चुकीचे केलेले नाही : सरकाळे

जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे जरंडेश्वर शुगर मिल्सला रीतसर कर्ज वाटप केलेले आहे, तसेच कर्जाची परतफेडदेखील वेळेत सुरू आहे. ईडीने जिल्हा बँकेला कोणतीही नोटीस दिलेली नाही तर कर्ज वाटपाबाबत माहिती मागविलेली आहे, लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून नये.

- डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक