शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

सातारा : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच शेतकऱ्यांनाही फटका बसला. आता तर इंधन दर वाढल्याने व इतर कारणाने ...

सातारा : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच शेतकऱ्यांनाही फटका बसला. आता तर इंधन दर वाढल्याने व इतर कारणाने खताचा भाव १५० ते २५० रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच यंत्राद्वारे मशागतीचा खर्चही वधारलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

सातारा जिल्ह्यात इंधनाचे दर वाढत चालले आहेत. मागील दोन महिन्यांपूर्वी ९० रुपयांपर्यंत पेट्रोल तर ८० पर्यंत एक लिटर डिझेल मिळायचे. पण, सध्यस्थितीत इंधनाचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पेट्रोलचा भाव ९८ ते ९९ तर डिझेलचा एक लिटरचा भाव ९० रुपयांच्या घरात पोहोचलाय. या इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. शेतमाल असो किंवा यंत्राच्या सहायाने शेतीची कामे यांचे दर वाढले आहेत. तसेच पिकांसाठी लागणाऱ्या खताचेही दर वाढले आहेत. मागील काही दिवसांत १५० ते २५० रुपयांपर्यंत पोत्यामागे (५० किलो) दर वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच बसत आहे. तसेच दुसरीकडे यंत्राद्वारे मशागती, पेरणी आणि काढणीचा खर्चही वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतच चालला आहे.

........

डीएपीचे दर आधीचे दर आताचे दर

१० २६ २६ १२२५ १४००

१९ १९ १९ १२८५ १५००

१२ ३२ १६ १२३५ १४१०

२४ २४ ० १३३० १५००

........................................................

इंधन दरवाढीचा परिणाम...

इंधन दरवाढीचा परिणाम शेती तसेच वाहतुकीवरही झाला आहे. शेतीमाल बाजारपेठेत घेऊन जायचा झाला तरी वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे बाजारात मालाला चांगला भाव आला तरच शेतकऱ्यांच्या हातात काही पैसे येतात. पण, दुसरीकडे शेतीशी निगडित अनेक वस्तू, खते, मशागतींचा खर्च वाढत चाललाय.

.........................................................

मशागत महागली...

जिल्ह्यातील शेती अधिक करुन यंत्राद्वारे करण्यात येते. मशागत, पेरणी आणि काढणी करायची झाली तरी यंत्राचाच अधिक वापर होतो. आता इंधनाचे दर वाढल्याने मशागतीचे दर वाढले आहेत. पूर्वी नांगरणीचा दर १८०० रुपये एकर होता. आता तो २६०० ते २८०० पर्यंत पोहोचलाय. फणपाळीचा दर ८०० होता. आता १ हजारांवर गेला आहे. चार फुटी सरीचा दर १२०० होता. इंधन दरवाढ झाल्यानंतर याचा भाव २ हजार रुपयांवर पोहोचलाय. तसेच वाहतूक आणि शेतीसंबंधी इतर खर्चातही वाढ झाली आहे.

.........................

कोट :

दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे शेतीवरही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे शेतमाल वाहतूक आणि शेती मशागतीचे दरही वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसत आहे.

- प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी

.......................................................

कोरोना पूर्वी डिझेलचा दर कमी होता. मात्र, मागील काही महिन्यांपासून इंधन दर वाढत चालला आहे. यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागतीच्या दरातही वाढ झालेली आहे. परिणामी एकरी दीड हजार तरी अधिक खर्च करावा लागत आहे.

- संजय कदम, शेतकरी

.................................................

शेती केली तर फायद्याची आहे. पण, निसर्गाची साथही महत्त्वाची ठरते. त्यातच आता डिझेलचा दर वाढला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, फणपाळी व इतर कामे करायची झाली तर एकरी किमान हजार रुपये तरी जादा लागणार आहेत.

- जगन्नाथ यादव, शेतकरी

.............................................................