शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

सातारा : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच शेतकऱ्यांनाही फटका बसला. आता तर इंधन दर वाढल्याने व इतर कारणाने ...

सातारा : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच शेतकऱ्यांनाही फटका बसला. आता तर इंधन दर वाढल्याने व इतर कारणाने खताचा भाव १५० ते २५० रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच यंत्राद्वारे मशागतीचा खर्चही वधारलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

सातारा जिल्ह्यात इंधनाचे दर वाढत चालले आहेत. मागील दोन महिन्यांपूर्वी ९० रुपयांपर्यंत पेट्रोल तर ८० पर्यंत एक लिटर डिझेल मिळायचे. पण, सध्यस्थितीत इंधनाचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पेट्रोलचा भाव ९८ ते ९९ तर डिझेलचा एक लिटरचा भाव ९० रुपयांच्या घरात पोहोचलाय. या इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. शेतमाल असो किंवा यंत्राच्या सहायाने शेतीची कामे यांचे दर वाढले आहेत. तसेच पिकांसाठी लागणाऱ्या खताचेही दर वाढले आहेत. मागील काही दिवसांत १५० ते २५० रुपयांपर्यंत पोत्यामागे (५० किलो) दर वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच बसत आहे. तसेच दुसरीकडे यंत्राद्वारे मशागती, पेरणी आणि काढणीचा खर्चही वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतच चालला आहे.

........

डीएपीचे दर आधीचे दर आताचे दर

१० २६ २६ १२२५ १४००

१९ १९ १९ १२८५ १५००

१२ ३२ १६ १२३५ १४१०

२४ २४ ० १३३० १५००

........................................................

इंधन दरवाढीचा परिणाम...

इंधन दरवाढीचा परिणाम शेती तसेच वाहतुकीवरही झाला आहे. शेतीमाल बाजारपेठेत घेऊन जायचा झाला तरी वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे बाजारात मालाला चांगला भाव आला तरच शेतकऱ्यांच्या हातात काही पैसे येतात. पण, दुसरीकडे शेतीशी निगडित अनेक वस्तू, खते, मशागतींचा खर्च वाढत चाललाय.

.........................................................

मशागत महागली...

जिल्ह्यातील शेती अधिक करुन यंत्राद्वारे करण्यात येते. मशागत, पेरणी आणि काढणी करायची झाली तरी यंत्राचाच अधिक वापर होतो. आता इंधनाचे दर वाढल्याने मशागतीचे दर वाढले आहेत. पूर्वी नांगरणीचा दर १८०० रुपये एकर होता. आता तो २६०० ते २८०० पर्यंत पोहोचलाय. फणपाळीचा दर ८०० होता. आता १ हजारांवर गेला आहे. चार फुटी सरीचा दर १२०० होता. इंधन दरवाढ झाल्यानंतर याचा भाव २ हजार रुपयांवर पोहोचलाय. तसेच वाहतूक आणि शेतीसंबंधी इतर खर्चातही वाढ झाली आहे.

.........................

कोट :

दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे शेतीवरही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे शेतमाल वाहतूक आणि शेती मशागतीचे दरही वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसत आहे.

- प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी

.......................................................

कोरोना पूर्वी डिझेलचा दर कमी होता. मात्र, मागील काही महिन्यांपासून इंधन दर वाढत चालला आहे. यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागतीच्या दरातही वाढ झालेली आहे. परिणामी एकरी दीड हजार तरी अधिक खर्च करावा लागत आहे.

- संजय कदम, शेतकरी

.................................................

शेती केली तर फायद्याची आहे. पण, निसर्गाची साथही महत्त्वाची ठरते. त्यातच आता डिझेलचा दर वाढला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, फणपाळी व इतर कामे करायची झाली तर एकरी किमान हजार रुपये तरी जादा लागणार आहेत.

- जगन्नाथ यादव, शेतकरी

.............................................................