शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

सातारा : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच शेतकऱ्यांनाही फटका बसला. आता तर इंधन दर वाढल्याने व इतर कारणाने ...

सातारा : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच शेतकऱ्यांनाही फटका बसला. आता तर इंधन दर वाढल्याने व इतर कारणाने खताचा भाव १५० ते २५० रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच यंत्राद्वारे मशागतीचा खर्चही वधारलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

सातारा जिल्ह्यात इंधनाचे दर वाढत चालले आहेत. मागील दोन महिन्यांपूर्वी ९० रुपयांपर्यंत पेट्रोल तर ८० पर्यंत एक लिटर डिझेल मिळायचे. पण, सध्यस्थितीत इंधनाचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पेट्रोलचा भाव ९८ ते ९९ तर डिझेलचा एक लिटरचा भाव ९० रुपयांच्या घरात पोहोचलाय. या इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. शेतमाल असो किंवा यंत्राच्या सहायाने शेतीची कामे यांचे दर वाढले आहेत. तसेच पिकांसाठी लागणाऱ्या खताचेही दर वाढले आहेत. मागील काही दिवसांत १५० ते २५० रुपयांपर्यंत पोत्यामागे (५० किलो) दर वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच बसत आहे. तसेच दुसरीकडे यंत्राद्वारे मशागती, पेरणी आणि काढणीचा खर्चही वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतच चालला आहे.

........

डीएपीचे दर आधीचे दर आताचे दर

१० २६ २६ १२२५ १४००

१९ १९ १९ १२८५ १५००

१२ ३२ १६ १२३५ १४१०

२४ २४ ० १३३० १५००

........................................................

इंधन दरवाढीचा परिणाम...

इंधन दरवाढीचा परिणाम शेती तसेच वाहतुकीवरही झाला आहे. शेतीमाल बाजारपेठेत घेऊन जायचा झाला तरी वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे बाजारात मालाला चांगला भाव आला तरच शेतकऱ्यांच्या हातात काही पैसे येतात. पण, दुसरीकडे शेतीशी निगडित अनेक वस्तू, खते, मशागतींचा खर्च वाढत चाललाय.

.........................................................

मशागत महागली...

जिल्ह्यातील शेती अधिक करुन यंत्राद्वारे करण्यात येते. मशागत, पेरणी आणि काढणी करायची झाली तरी यंत्राचाच अधिक वापर होतो. आता इंधनाचे दर वाढल्याने मशागतीचे दर वाढले आहेत. पूर्वी नांगरणीचा दर १८०० रुपये एकर होता. आता तो २६०० ते २८०० पर्यंत पोहोचलाय. फणपाळीचा दर ८०० होता. आता १ हजारांवर गेला आहे. चार फुटी सरीचा दर १२०० होता. इंधन दरवाढ झाल्यानंतर याचा भाव २ हजार रुपयांवर पोहोचलाय. तसेच वाहतूक आणि शेतीसंबंधी इतर खर्चातही वाढ झाली आहे.

.........................

कोट :

दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे शेतीवरही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे शेतमाल वाहतूक आणि शेती मशागतीचे दरही वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसत आहे.

- प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी

.......................................................

कोरोना पूर्वी डिझेलचा दर कमी होता. मात्र, मागील काही महिन्यांपासून इंधन दर वाढत चालला आहे. यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागतीच्या दरातही वाढ झालेली आहे. परिणामी एकरी दीड हजार तरी अधिक खर्च करावा लागत आहे.

- संजय कदम, शेतकरी

.................................................

शेती केली तर फायद्याची आहे. पण, निसर्गाची साथही महत्त्वाची ठरते. त्यातच आता डिझेलचा दर वाढला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, फणपाळी व इतर कामे करायची झाली तर एकरी किमान हजार रुपये तरी जादा लागणार आहेत.

- जगन्नाथ यादव, शेतकरी

.............................................................