शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

नांदगाव, वाठार, कालवडे, बेलवडेत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:39 IST

नांदगाव येथे दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. डॉ. अतुल भोसले समर्थकांच्या ग्रामविकास पॅनलने सहा जागा जिंकत सत्तांतर घडविले. विरोधी ...

नांदगाव येथे दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. डॉ. अतुल भोसले समर्थकांच्या ग्रामविकास पॅनलने सहा जागा जिंकत सत्तांतर घडविले. विरोधी पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील गटाला पाच जागांवर विजय समाधान मानावे लागले. ग्रामविकास पॅनलच्या विजयासाठी वि. तु. सुकरे गुरूजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील, पै. संपत पाटील, विकास पाटील आदींनी परिश्रम घेतले.

कालवडे येथे १५ वर्षांनंतर सत्तांतर झाले. भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले व आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी नऊ जागा जिंकल्या, तर उदयसिंह पाटील गटाला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. पॅनलच्या विजयासाठी शिवाजीराव थोरात, संताजी थोरात, पै. दादासाहेब थोरात आदींनी प्रयत्न केले.

बेलवडे ग्रामपंचायतीतही सत्तांतराचा नारळ फुटला. डॉ. अतुल भोसले व उदयसिंह पाटील समर्थकांनी एकत्रित येत आठ जागा जिंकल्या, तर विरोधकांना फक्त तीन जागांवर थांबावे लागले. हर्षवर्धन मोहिते, जगन्नाथ मोहिते यांनी पॅनलचे नेतृत्व केले.

वाठारच्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले गटाने सात जागा जिंकून परिवर्तन घडविले. विरोधी पृथ्वीराज चव्हाण-उदयसिंह पाटील गटाला फक्त चार जागा मिळाल्या. विजयी पॅनलचे नेतृत्व दिनकरराव मोरे, बाळासाहेब पाटील, पांडूरंग पाटील, प्रमोद पाटील यांनी केले.

काले येथील ग्रामपंचायत निवडणुकीत अतुल भोसले समर्थक कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने १४ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली. विरोधी उदयसिंह पाटील, अविनाश मोहिते समर्थक पॅनलला फक्त तीन जागा मिळाल्या.

ओंड ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अ‍ॅड. उदयसिंह पाटील समर्थकांनी सर्व जागा जिंकून सत्ता कायम ठेवली आहे. विजयी पॅनलचे नेतृत्व सर्जेराव शिंदे, लालासाहेब थोरात, अजयसिंह थोरात, बाजीराव थोरात यांनी केले.

धोंडेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. अतुल भोसले व आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी नऊ जागा जिंकल्या, तर अ‍ॅड. उदयसिंह पाटील गटाला फक्त दोन जागा मिळाल्या.

आता या नव्या गावकारभाऱ्यांकडून मतदारांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. ते त्या कशा पूर्ण करणार, हे पहावे लागेल.

- चौकट

आता लक्ष आरक्षणाकडे...

ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल तर लागले. मात्र, सरपंच कोण, हे निश्चित नाही. त्यामुळे सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता कोणत्या गावात कोणते आरक्षण पडते, हे पहावे लागेल.