शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

नांदगाव, वाठार, कालवडे, बेलवडेत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:39 IST

नांदगाव येथे दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. डॉ. अतुल भोसले समर्थकांच्या ग्रामविकास पॅनलने सहा जागा जिंकत सत्तांतर घडविले. विरोधी ...

नांदगाव येथे दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. डॉ. अतुल भोसले समर्थकांच्या ग्रामविकास पॅनलने सहा जागा जिंकत सत्तांतर घडविले. विरोधी पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील गटाला पाच जागांवर विजय समाधान मानावे लागले. ग्रामविकास पॅनलच्या विजयासाठी वि. तु. सुकरे गुरूजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील, पै. संपत पाटील, विकास पाटील आदींनी परिश्रम घेतले.

कालवडे येथे १५ वर्षांनंतर सत्तांतर झाले. भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले व आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी नऊ जागा जिंकल्या, तर उदयसिंह पाटील गटाला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. पॅनलच्या विजयासाठी शिवाजीराव थोरात, संताजी थोरात, पै. दादासाहेब थोरात आदींनी प्रयत्न केले.

बेलवडे ग्रामपंचायतीतही सत्तांतराचा नारळ फुटला. डॉ. अतुल भोसले व उदयसिंह पाटील समर्थकांनी एकत्रित येत आठ जागा जिंकल्या, तर विरोधकांना फक्त तीन जागांवर थांबावे लागले. हर्षवर्धन मोहिते, जगन्नाथ मोहिते यांनी पॅनलचे नेतृत्व केले.

वाठारच्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले गटाने सात जागा जिंकून परिवर्तन घडविले. विरोधी पृथ्वीराज चव्हाण-उदयसिंह पाटील गटाला फक्त चार जागा मिळाल्या. विजयी पॅनलचे नेतृत्व दिनकरराव मोरे, बाळासाहेब पाटील, पांडूरंग पाटील, प्रमोद पाटील यांनी केले.

काले येथील ग्रामपंचायत निवडणुकीत अतुल भोसले समर्थक कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने १४ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली. विरोधी उदयसिंह पाटील, अविनाश मोहिते समर्थक पॅनलला फक्त तीन जागा मिळाल्या.

ओंड ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अ‍ॅड. उदयसिंह पाटील समर्थकांनी सर्व जागा जिंकून सत्ता कायम ठेवली आहे. विजयी पॅनलचे नेतृत्व सर्जेराव शिंदे, लालासाहेब थोरात, अजयसिंह थोरात, बाजीराव थोरात यांनी केले.

धोंडेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. अतुल भोसले व आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी नऊ जागा जिंकल्या, तर अ‍ॅड. उदयसिंह पाटील गटाला फक्त दोन जागा मिळाल्या.

आता या नव्या गावकारभाऱ्यांकडून मतदारांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. ते त्या कशा पूर्ण करणार, हे पहावे लागेल.

- चौकट

आता लक्ष आरक्षणाकडे...

ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल तर लागले. मात्र, सरपंच कोण, हे निश्चित नाही. त्यामुळे सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता कोणत्या गावात कोणते आरक्षण पडते, हे पहावे लागेल.