शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनाची पहाट आता ‘निर्बंध मुक्तीत’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST

सातारा : भारत देश आज स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. मधल्या दोन वर्षांचा कालखंड कोरोनाच्या जोखडातच ...

सातारा : भारत देश आज स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. मधल्या दोन वर्षांचा कालखंड कोरोनाच्या जोखडातच गेला. कोरोना रोखण्यासाठी केलेले लॉकडाऊन आणि त्यामुळे झालेली उपासमार आता टळणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून जिल्हा निर्बंधमुक्त होणार असून स्वातंत्र्यदिनाची पहाट आता निर्बंध मुक्तीतच उजाडणार आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी निर्बंध हटविण्याचा आदेश जाहीर केला अन् सातारकरांना मोठा दिलासा मिळाला. आता उद्योग व्यवसाय पूर्ववत होऊन हाताला काम मिळणार असल्याने सर्वांनीच सुस्कारा सोडला आहे. सर्व प्रकारच्या दुकानांच्या वेळा दुपारी ४ वरून रात्री १० वाजेपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. आता दुकाने बंद करण्याची घाई होणार नाही, तसेच दुकाने बंद होतील म्हणून दुपारच्यावेळेत गर्दीही होणार नाही. तालमींमध्ये

कडक निर्बंधांमुळे उद्योगधंदे रसातळाला गेले. व्यापारी वर्गावर कर्जाचा डोंगर साठला, तसेच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हाताला काम नसल्याने लोक आत्महत्येचे पाऊल उचलू लागले. अनेकजण नैराश्येमध्येच आहेत. आता निर्बंध उठले आहेत. स्वातंत्र्याची पहाट नवीन आशा घेऊन येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार व रविवार हे दोन दिवस असणारी संचारबंदी देखील हटवलेली आहे. आदेशाची अंमलबजावणी शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून केली जाणार आहे. जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हिटी रेट १० पेक्षा कमी असल्याने जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रामपंचायत स्तरावर कोविड प्रतिबंधात्मक खालील अटी व शर्तींचे अधिन राहून ऑफलाईन ग्रामसभांचे आयोजन करण्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

ग्रामसभा कार्यक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सक्तीने मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक राहील. यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सॅनिटायझर उपलब्ध ठेवावे. हस्तांदोलन व धूम्रपान करण्यास सक्त मनाई राहील. ग्रामसभेच्या कार्यक्रमामध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान १ मीटर सामाजिक अंतर राहील. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करणार आहेत त्या ठिकाणच्या हॉलमध्ये ग्रामसभेपूर्वी व ग्रामसभा संपल्यानंतर संपूर्ण सॅनिटायझेशन करणे बंधनकारक राहील. महाराष्ट्र शासनाकडील सूचननेनुसार सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारची धार्मिकस्थळे नागरिकांसाठी बंद असल्याने कोणत्याही परिस्थितीत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यास मनाई राहील.

आजारी व्यक्तींना ग्रामसभेत प्रवेश नाही

आजारी असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत ग्रामसभेमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. ग्रामसभेचे ठिकाण कंटेन्मेंट झोनमध्ये मोडत असल्यास त्या ठिकाणी संबंधित उपविभागीय अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले कोविडविषयक सूचनांचे तंतोतंत पालन करणे आयोजकांवर बंधनकारक राहील.

अब तुम्हारे हवाले वतन साथियों...!

स्वातंत्र्यदिनी देशभक्तिपर गीते वाजणार आहेत. ग्रामसभा लोकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडणार असल्याने चावड्या गजबजणार आहेत. बाजारपेठाही फुलून जाणार आहेत. ही गीते गात असताना कोरोना संसर्ग रोखण्याची मोठी जबाबदारी सर्वांवरच आहे. अब तुम्हारे हवाले वतन साथियों...हे गीत सर्वांनाच मंत्रमुग्ध करेल...आता आपल्याला आपल्या लोकांची काळजी घ्यावी लागेल. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळल्यास पुन्हा निर्बंधाचे जोखड पाठीवर बसणार नाही.

फोटो नेम : १४जावेद

फोटो ओळ : सातारा येथील बाजारपेठेत शनिवारी दुकाने बंद असल्याने गर्दी कमी होती. रविवारी मात्र वेगळे चित्र दिसणार आहे. (छाया : जावेद खान)