शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

स्वातंत्र्यदिनी ३९ जणांनी आंदोलन घेतले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 13:57 IST

स्वातंत्र्यदिन म्हटलं की,आपल्या मागण्यांसाठी आंदोलकांमधून आत्मदहन करण्यासाठी चढाओढ सुरू असते. यंदाही जिल्ह्यातून ३९ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, अशा लोकांना आंदोलनापासून परावृत्त करण्यास पोलिसांना यश आले. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी कायदा व सुव्यवस्थेचा बिकट प्रश्न निर्माण झाला नाही.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनी ३९ जणांनी आंदोलन घेतले मागेकायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश

सातारा : स्वातंत्र्यदिन म्हटलं की,आपल्या मागण्यांसाठी आंदोलकांमधून आत्मदहन करण्यासाठी चढाओढ सुरू असते. यंदाही जिल्ह्यातून ३९ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, अशा लोकांना आंदोलनापासून परावृत्त करण्यास पोलिसांना यश आले. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी कायदा व सुव्यवस्थेचा बिकट प्रश्न निर्माण झाला नाही.स्वातंत्र्यदिनी आंदोलन केले तर प्रशासनापर्यंत आपल्या मागण्या सहज पोहोचतात, अशी एक धारणा पूवीर्पासूनच आंदोलकांमध्ये आहे. त्यामुळे इतर दिवशी प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलनाचा मुहूर्त हा शक्यतो स्वातंत्र्यदिनी निवडला जातो.

या दिवशी जिल्ह्यात पालकमंत्र्यासह प्रशासकीय अधिकारी आणि लोक प्रतिनिधी उपस्थित राहतात. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी आंदोलन केले तर आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले जाईल, ही सुद्धा एक त्यांची समजूत असते. त्याप्रमाणे दर वर्षी स्वातंत्र्यदिनी आंदोलकांचे आत्मदहन करण्याचे इशारे येत असतात.

यंदाही अशा प्रकारचे तब्बल ३९ अर्ज प्रशासनाला मिळाले होते. हे अर्ज स्वातंत्र्यदिनापूर्वी आठ दिवस मिळाल्यामुळे पोलिसांना त्यांचीशी चर्चा करण्यास वेळ मिळाला. लोकशाही मागार्ने तुमच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवा. आततायीपणा करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, असे पोलिसांनी सर्व आंदोलकांना समजावून सांगितले. त्यामुळे सर्व आंदोलक आत्मदहनापासून परावृत्त झाले. आम्ही स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणार नाही. आमच्या मागण्यासंदर्भात संबंधित कार्यालयात जाऊन दाद मागू, अशी लेखी हमी आंदोलकांनी पोलिसांकडे दिली. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांसह अग्निशामक दलाच्या जवानांना डोळ्यात तेल घालून आंदोलकाची वाट पाहावी लागते. आंदोलक कुठूनही येण्याची शक्यता असल्याने गोपनीय विभागातील पोलिसांना प्रचंड खबरदारी घ्यावी लागते. ही खबरदारी यंदा या विभागाने अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही या विभागाचे विशेष कौतुक केले जात आहे.दोघांना समजमाण तालुक्यातील राणंद येथील अनिता हणमंत दळवी यांना गावातील काहीजण त्रास देत असल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता तर प्रशांत शिंदे (रा. डी मार्टजवळ) यांनी विविध मागण्यांसाठी प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. हे दोघेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले होते.

यावेळी पोलिसांनी त्यांना समजावून सांगून आंदोलनापासून परावृत्त केले. साताऱ्यातील संभाजीनगरमधील कविता दरेकर यांनी सांडपाण्याबाबत तर विठ्ठल बनसोडे (सातारा) यांनी जमीन व घरकुलासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर