शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी शहर हादरून गेलं होतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:20 AM

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वसंध्येला सर्वत्र बॉम्बचा वर्षाव सुरू होता. याचे आवाज सतत कानावर पडत होते. अखेर १५ आॅगस्ट हा दिवस उजाडला अन् भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. साताऱ्यात ठिकठिकाणी तिरंगा फडकू लागला. मी ही ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वसंध्येला सर्वत्र बॉम्बचा वर्षाव सुरू होता. याचे आवाज सतत कानावर पडत होते. अखेर १५ आॅगस्ट हा दिवस उजाडला अन् भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. साताऱ्यात ठिकठिकाणी तिरंगा फडकू लागला. मी ही मोठ्या अभिमानाने ध्वजारोहणाला हजेरी लावली अन् यानंतर खºया अर्थाने माझ्या मनात देशसेवेचे बीज रोवले गेले,’ हे वाक्य आहेत माजी सैनिक हारुण मोहंमद मेमन यांचे.हारुण मेमन हे साताºयातील सदर बझार येथे वास्तव्य करीत आहेत. त्यांचा जन्म २५ जानेवारी १९४० रोजी साताºयात झाला. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने मेमन यांच्या मनातही देशसेवेची भावना निर्माण झाली. शिक्षण घेत असतानाच वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ते १९५४ रोजी आर्मीच्या बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये दाखल झाले अन् त्यांचे देशसेवेचे स्वप्न साकार झाले.हारुण मेमन यांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळातील काही अनुभव ‘लोकमत’पुढे व्यक्त केले. ते म्हणाले, ‘१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो. मी शाळेत जात होतो. भारत स्वातंत्र्य व्हावा, यासाठी सर्वत्र आंदोलने सुरू होती. इंग्रजांविरोधात सर्वत्र बंड पुकारण्यात आले होते. साताºयातही अशीच काहीशी परिस्थिती होती. अखेर असंख्य भारतीयांपुढे ब्रिटिशांना नमते घ्यावे लागले अन् भारत पारतंत्र्यांतून मुक्त झाला. मला आजही तो दिवस वरचेवर आठवत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वसंध्येला साताºयात बॉम्ब फुटल्यासारखे आवाज येत होते. मनामध्ये भीतीचे काहूर माजले होते. सर्वत्र धावपळ सुरू होती. ती रात्र कशीबशी गेली अन् तो दिवस अखेर उजाडला.रेडिओवरून भारत स्वातंत्र्य झाल्याचे वृत्त कानी पडले. सर्वत्र ही बातमी वाºयासारखी पसरली. गल्लीबोळात आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला. अनेकांच्या हातात राष्ट्रध्वज अभिमानाने फडकत होता. शहरात एका ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यासाठी माझ्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.भारत-पाकिस्तान युद्धात सहभागहारुण मेमन हे देशसेवा बजावत असताना पुणे, आसाम, इलाहाबाद श्रीनगर आदी ठिकाणी त्यांनी काम केले. तसेच भारत व पाकिस्तान युद्धातही त्यांचा सहभाग घेतला होता. या युद्धात पाकिस्तानला दोनदा भारताने नमवले होते. आपल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना सेना मेडल, रक्षा मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे.