शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

इच्छुक वाढले; विद्यमानच कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा परिषदेतील सभापती बदलाच्या हालचाली गतिमान झाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा परिषदेतील सभापती बदलाच्या हालचाली गतिमान झाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत बराच खल झाला. त्यातच इच्छुकांची संख्या वाढल्याने निर्णयाविनाच बैठक संपल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे विद्यमानच कायम राहण्याची शक्यता असल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी पडणार आहे.

जिल्हा परिषदेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. पुढीलवर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही सदस्यांनी सभापतीपद मिळावे म्हणून देव पाण्यात घातले आहेत. कारण, पहिल्या अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर मागीलवर्षी जानेवारी महिन्यात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. त्यानंतर ९ जानेवारीला सभापतींची निवड झाली होती. सभापतींची निवड होण्यापूर्वी साताऱ्यातील झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सभापती पदाचे दावेदार मागे पडले आणि अनपेक्षितपणे काही नावे समोर आली.

सभापती पदाची नावे जाहीर केल्यानंतर राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी एक वर्षासाठी पदे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यावेळी नाराज झालेले दावेदार वर्ष कधी संपते याची वाट पाहत होते. हे वर्ष संपल्यानंतर त्यांनी आपापल्या नेत्यांकडे वारंवार सभापती पदाची मागणी केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली.

या बैठकीला रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह पक्षाचे आमदार आणि जिल्ह्यातील पक्षाचे इतर पदाधिकारीही होते, असे सांगण्यात आले. पण, सभापती पदासाठी इच्छुक वाढल्याने नुसताच खल झाला. त्यामुळे कोणताही निर्णय झाला नसल्याचीही माहिती समोर येत आहे. परिणामी राजकीय घडामोडीत विद्यमान सभापती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चौकट :

निवडणुकांमुळे बदल नको...

अंतिम निर्णय बाकी...

जिल्ह्यात आगामी काळात अनेक निवडणुका होत आहेत. तसेच वर्षभरात जिल्हा परिषदेचीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी, सभापतींचा बदल नको, अशी भूमिका घेतली. तसेच विकास कामांना प्राधान्य द्यावे, अशी चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा मावळण्याची चिन्हे आहेत. तरीही अंतिम निर्णय होणे बाकी आहे.

...........................................................