शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाइन’ शिक्षणामुळे दृष्टिदोषात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST

पुसेगाव: : कोरोना महामारीमुळे सुमारे गेल्या दीड वर्षापासून शालेय शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ...

पुसेगाव: :

कोरोना महामारीमुळे सुमारे गेल्या दीड वर्षापासून शालेय शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना संगणक आणि मोबाइलच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’ पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र ‘ऑनलाइन’मुळे विद्यार्थ्यांचा वही आणि पेन यांचा संबंध खूपच कमी झाला असून याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या लेखन शैली व दृष्टीवर झालेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या बोटांची हरवलेली हस्ताक्षराची गती आणि लहान वयात निर्माण होत असलेले दृष्टिदोष यामुळे पालकही चिंता व्यक्त करत आहेत.

कोरोना महामारीचा समाजातील सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेकांचे व्यवसाय बुडाले असून लहान-मोठे व्यापारी, दुकानदार, मजुरांचे आणि शेतकामगार वर्गाचे खूपच हाल झाले आहेत. याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. गेल्या सुमारे दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ‘ऑनलाइन’मुळे ग्रामीण, व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना संगणक व मोबाइल रेंजअभावी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर समाजातील बहुतांशी मुलांच्याकडे त्यांच्या आर्थिक परिस्थितीअभावी मोबाइलच नसल्यामुळे त्यांना ‘ऑनलाइन’ शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. सतत संगणक किंवा मोबाइलचे स्क्रीनसमोर बसून तासन‌्तास अध्ययन-अध्यापन केल्यामुळे याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर होत असल्याच्या तक्रारी अनेक पालक व्यक्त करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये सुंदर व मोत्यासारख्या वळणदार हस्ताक्षराला तर व्यावहारिक जीवनात दृष्टीला महत्त्व आहे. कोरोनामुळे या दोन्हीही गोष्टी लहान वयातच मुलांना त्रासदायक ठरू लागल्याने पालकही चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या सुमारे दीड वर्षापासून शाळाच बंद असल्यामुळे आणि ‘ऑनलाइन’ पद्धतीने शिक्षण सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाताला वही व पेनचा संबंध आलाच नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी लिखाणाच्या सरावापासून दूर गेले. तासन‌्तास संगणक व मोबाइल स्क्रीनसमोर असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांचे दृष्टीवर झाला असून शेकडो विद्यार्थ्यांच्यामध्ये दृष्टिदोषाच्या किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दिसून येत आहेत. यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना चष्मा आणि मोडलेला लिखाणाचा सराव यामुळे पालकवर्गात चिंतेचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.