शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

‘ऑनलाइन’ शिक्षणामुळे दृष्टिदोषात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST

पुसेगाव: : कोरोना महामारीमुळे सुमारे गेल्या दीड वर्षापासून शालेय शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ...

पुसेगाव: :

कोरोना महामारीमुळे सुमारे गेल्या दीड वर्षापासून शालेय शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना संगणक आणि मोबाइलच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’ पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र ‘ऑनलाइन’मुळे विद्यार्थ्यांचा वही आणि पेन यांचा संबंध खूपच कमी झाला असून याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या लेखन शैली व दृष्टीवर झालेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या बोटांची हरवलेली हस्ताक्षराची गती आणि लहान वयात निर्माण होत असलेले दृष्टिदोष यामुळे पालकही चिंता व्यक्त करत आहेत.

कोरोना महामारीचा समाजातील सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेकांचे व्यवसाय बुडाले असून लहान-मोठे व्यापारी, दुकानदार, मजुरांचे आणि शेतकामगार वर्गाचे खूपच हाल झाले आहेत. याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. गेल्या सुमारे दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ‘ऑनलाइन’मुळे ग्रामीण, व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना संगणक व मोबाइल रेंजअभावी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर समाजातील बहुतांशी मुलांच्याकडे त्यांच्या आर्थिक परिस्थितीअभावी मोबाइलच नसल्यामुळे त्यांना ‘ऑनलाइन’ शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. सतत संगणक किंवा मोबाइलचे स्क्रीनसमोर बसून तासन‌्तास अध्ययन-अध्यापन केल्यामुळे याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर होत असल्याच्या तक्रारी अनेक पालक व्यक्त करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये सुंदर व मोत्यासारख्या वळणदार हस्ताक्षराला तर व्यावहारिक जीवनात दृष्टीला महत्त्व आहे. कोरोनामुळे या दोन्हीही गोष्टी लहान वयातच मुलांना त्रासदायक ठरू लागल्याने पालकही चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या सुमारे दीड वर्षापासून शाळाच बंद असल्यामुळे आणि ‘ऑनलाइन’ पद्धतीने शिक्षण सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाताला वही व पेनचा संबंध आलाच नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी लिखाणाच्या सरावापासून दूर गेले. तासन‌्तास संगणक व मोबाइल स्क्रीनसमोर असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांचे दृष्टीवर झाला असून शेकडो विद्यार्थ्यांच्यामध्ये दृष्टिदोषाच्या किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दिसून येत आहेत. यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना चष्मा आणि मोडलेला लिखाणाचा सराव यामुळे पालकवर्गात चिंतेचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.