शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

‘ऑनलाइन’ शिक्षणामुळे दृष्टिदोषात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST

पुसेगाव: : कोरोना महामारीमुळे सुमारे गेल्या दीड वर्षापासून शालेय शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ...

पुसेगाव: :

कोरोना महामारीमुळे सुमारे गेल्या दीड वर्षापासून शालेय शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना संगणक आणि मोबाइलच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’ पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र ‘ऑनलाइन’मुळे विद्यार्थ्यांचा वही आणि पेन यांचा संबंध खूपच कमी झाला असून याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या लेखन शैली व दृष्टीवर झालेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या बोटांची हरवलेली हस्ताक्षराची गती आणि लहान वयात निर्माण होत असलेले दृष्टिदोष यामुळे पालकही चिंता व्यक्त करत आहेत.

कोरोना महामारीचा समाजातील सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेकांचे व्यवसाय बुडाले असून लहान-मोठे व्यापारी, दुकानदार, मजुरांचे आणि शेतकामगार वर्गाचे खूपच हाल झाले आहेत. याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. गेल्या सुमारे दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ‘ऑनलाइन’मुळे ग्रामीण, व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना संगणक व मोबाइल रेंजअभावी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर समाजातील बहुतांशी मुलांच्याकडे त्यांच्या आर्थिक परिस्थितीअभावी मोबाइलच नसल्यामुळे त्यांना ‘ऑनलाइन’ शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. सतत संगणक किंवा मोबाइलचे स्क्रीनसमोर बसून तासन‌्तास अध्ययन-अध्यापन केल्यामुळे याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या दृष्टीवर होत असल्याच्या तक्रारी अनेक पालक व्यक्त करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये सुंदर व मोत्यासारख्या वळणदार हस्ताक्षराला तर व्यावहारिक जीवनात दृष्टीला महत्त्व आहे. कोरोनामुळे या दोन्हीही गोष्टी लहान वयातच मुलांना त्रासदायक ठरू लागल्याने पालकही चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या सुमारे दीड वर्षापासून शाळाच बंद असल्यामुळे आणि ‘ऑनलाइन’ पद्धतीने शिक्षण सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाताला वही व पेनचा संबंध आलाच नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी लिखाणाच्या सरावापासून दूर गेले. तासन‌्तास संगणक व मोबाइल स्क्रीनसमोर असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांचे दृष्टीवर झाला असून शेकडो विद्यार्थ्यांच्यामध्ये दृष्टिदोषाच्या किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दिसून येत आहेत. यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना चष्मा आणि मोडलेला लिखाणाचा सराव यामुळे पालकवर्गात चिंतेचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.