शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
4
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
5
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
6
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
7
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
8
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
9
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
10
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
11
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
12
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
13
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
14
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
15
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
16
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
17
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
18
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
19
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
20
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

असुविधांचा कल्ला, अर्धा कोटीचा गल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:48 IST

प्रगती जाधव-पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : टोलनाका कार्यक्षेत्रातील २० किमी अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालीन ...

प्रगती जाधव-पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : टोलनाका कार्यक्षेत्रातील २० किमी अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालीन सोयीसाठी रुग्णवाहिका असणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र यातील कोणतीही सुविधा खेडशिवापूर- आनेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर उपलब्ध नाही. प्रचंड असुविधा असतानाही या टोलनाक्यांवरून विक एंडला चक्क ५० लाखांहून अधिक टोल संकलन होत असल्याची माहिती आहे.पुण्याहून सातारा, कोल्हापूर आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यांकडे जाण्यासाठी खेडशिवापूर, आनेवाडी आणि तासवडे असे तीन टोलनाके येतात. तर कोल्हापूरकडे जाताना किणी टोलनाका लागतो. हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अनेक अवजड वाहने, मालवाहतूक करणारे ट्रक, पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास करणारे, व्यावसायिक दौरे करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या महामार्गावर कायम वर्दळ असते.महामार्गावर कोणताही अपघात झाला तर टोलनाका परिसरात त्याची माहिती देणं अपेक्षित असतं. त्यानंतर तातडीने अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचार देण्याची व्यवस्था करून मग रुग्णांना पुढे नेणे अपेक्षित आहे. असे असताना टोलनाका परिसरात रुग्णवाहिका किंवा वाहिकेचा चालक यापैकी कोणीतरी नेहमीच गायब असतं. त्यामुळे गरजेच्यावेळी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत.पुण्याहून खेडशिवापूर, आनेवाडी आणि तासवडे या टोलनाक्यांवर दिवसाला सरासरी ५० लाखांचा टोल वसूल होतो. सण, आठवड्याची अखेर आणि सलग येणाºया सुट्यांमध्ये हा आकडा दिवसाला कोटींच्या घरात जातो. दिवसाला कोट्यवधींचा गल्ला मिळूनही सोयीसुविधांचा कल्ला दिसतो.महामार्गावरील पादचारी मार्ग थोडाजरी पाऊस पडला तरी पाण्यात जातात. त्यामुळे महामार्गानजीक वसलेल्या गावकऱ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो, अथवा धोका पत्करून महामार्ग ओलांडावा लागतो. रस्ता, भुयारी मार्ग, पूल, सेवा रस्ता ही सर्वच कामे जवळपास दीड वर्षापासून ठप्प आहेत.वाहनधारकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नाहीत. मात्र, त्यांच्यासाठी टोलवसुली ही बंधनकारकच आहे. अपुºया कामांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. एखादा अपघात झाल्यास महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदाराने अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी तातडीने क्रेन उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. मात्र, प्रत्येकवेळी खासगी क्रेनच मागविली जाते. या क्रेनचे भाडे संबंधित वाहनचालकांकडूनच वसूल केले जाते. अशाप्रकारे वाहनधारकांना भुर्दंडही सहन करावा लागत आहे. सुविधांची वानवा असूनही जीव मुठीत धरुन या मार्गावरुन प्रवास करावा लागतो. तरीही टोलची वसुली मात्र नियमितपणे सुरु आहे.वाहकाशिवाय उभी असते रुग्णवाहिकाटोलनाका परिसरात अपघात झाल्यानंतर तेथे अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णवाहिका आणि प्रथमोपचार किट असणं बंधनकारक आहे. मात्र, कित्येकदा टोलनाक्यावर वाहकाशिवाय रुग्णवाहिका उभी असते, काहीवेळा रुग्णवाहिकाही गायब असते. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळत नाहीत.