शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

असुविधांचा कल्ला, अर्धा कोटीचा गल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:48 IST

प्रगती जाधव-पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : टोलनाका कार्यक्षेत्रातील २० किमी अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालीन ...

प्रगती जाधव-पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : टोलनाका कार्यक्षेत्रातील २० किमी अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालीन सोयीसाठी रुग्णवाहिका असणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र यातील कोणतीही सुविधा खेडशिवापूर- आनेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर उपलब्ध नाही. प्रचंड असुविधा असतानाही या टोलनाक्यांवरून विक एंडला चक्क ५० लाखांहून अधिक टोल संकलन होत असल्याची माहिती आहे.पुण्याहून सातारा, कोल्हापूर आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यांकडे जाण्यासाठी खेडशिवापूर, आनेवाडी आणि तासवडे असे तीन टोलनाके येतात. तर कोल्हापूरकडे जाताना किणी टोलनाका लागतो. हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अनेक अवजड वाहने, मालवाहतूक करणारे ट्रक, पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास करणारे, व्यावसायिक दौरे करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या महामार्गावर कायम वर्दळ असते.महामार्गावर कोणताही अपघात झाला तर टोलनाका परिसरात त्याची माहिती देणं अपेक्षित असतं. त्यानंतर तातडीने अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचार देण्याची व्यवस्था करून मग रुग्णांना पुढे नेणे अपेक्षित आहे. असे असताना टोलनाका परिसरात रुग्णवाहिका किंवा वाहिकेचा चालक यापैकी कोणीतरी नेहमीच गायब असतं. त्यामुळे गरजेच्यावेळी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत.पुण्याहून खेडशिवापूर, आनेवाडी आणि तासवडे या टोलनाक्यांवर दिवसाला सरासरी ५० लाखांचा टोल वसूल होतो. सण, आठवड्याची अखेर आणि सलग येणाºया सुट्यांमध्ये हा आकडा दिवसाला कोटींच्या घरात जातो. दिवसाला कोट्यवधींचा गल्ला मिळूनही सोयीसुविधांचा कल्ला दिसतो.महामार्गावरील पादचारी मार्ग थोडाजरी पाऊस पडला तरी पाण्यात जातात. त्यामुळे महामार्गानजीक वसलेल्या गावकऱ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो, अथवा धोका पत्करून महामार्ग ओलांडावा लागतो. रस्ता, भुयारी मार्ग, पूल, सेवा रस्ता ही सर्वच कामे जवळपास दीड वर्षापासून ठप्प आहेत.वाहनधारकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नाहीत. मात्र, त्यांच्यासाठी टोलवसुली ही बंधनकारकच आहे. अपुºया कामांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. एखादा अपघात झाल्यास महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदाराने अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी तातडीने क्रेन उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. मात्र, प्रत्येकवेळी खासगी क्रेनच मागविली जाते. या क्रेनचे भाडे संबंधित वाहनचालकांकडूनच वसूल केले जाते. अशाप्रकारे वाहनधारकांना भुर्दंडही सहन करावा लागत आहे. सुविधांची वानवा असूनही जीव मुठीत धरुन या मार्गावरुन प्रवास करावा लागतो. तरीही टोलची वसुली मात्र नियमितपणे सुरु आहे.वाहकाशिवाय उभी असते रुग्णवाहिकाटोलनाका परिसरात अपघात झाल्यानंतर तेथे अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णवाहिका आणि प्रथमोपचार किट असणं बंधनकारक आहे. मात्र, कित्येकदा टोलनाक्यावर वाहकाशिवाय रुग्णवाहिका उभी असते, काहीवेळा रुग्णवाहिकाही गायब असते. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळत नाहीत.