शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

लोणंदमध्ये शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन; "नव्या पिढीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा बदलणार" - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 22:25 IST

नव्या पिढीला शक्ती, अधिकार देऊन महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा ही पिढी बदलू शकते, हा इतिहास निर्माण करणार असल्याचा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

लोणंद : येथील कृषी महोत्सव शेतकऱ्यांना नवीन दिशा देणारा महोत्सव आहे. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन नवीन पिढीतील नवे नेतृत्व निर्माण करण्याचा मनोदय आहे. नव्या पिढीला शक्ती, अधिकार देऊन महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा ही पिढी बदलू शकते, हा इतिहास निर्माण करणार असल्याचा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

लोणंद येथील बाजार तळावर भरविण्यात आलेल्या शरद कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रोहित पवार, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, अभयसिंह जगताप, सारंग पाटील, प्रवीण गायकवाड, लक्ष्मण माने, दशरथ माने, सुनील गव्हाणे, सत्यजित पाटणकर, दीपक पवार, प्रभाकर देशमुख, सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, सत्ता येते सत्ता जाते, सत्ता ही कायमची नसते; पण विचार कायम राहतात. देशाला पुढे नेणारा कार्यक्रम राबविण्याची गरज असताना सत्ताधारी याकडे ढुंकूणही पाहत नाहीत. भारतीय संसद ही लोकशाहीची महत्त्वाची संस्था असताना पंधरा दिवसांच्या अधिवेशन काळात देशाचे पंतप्रधान फक्त एका तासासाठी येतात. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांनी अधिवेशन काळात संसदेत एक दिवसही चुकविला नाही.

रोहित पवार म्हणाले, हा महोत्सव होऊ नये म्हणून फोनाफोनी करणाऱ्या स्थानिक आमदारांना जनता अद्दल घडवेल. केवळ टीका करून शेतकऱ्यांचे हित न जपणाऱ्यांना या निवडणुकीत जनता धडा शिकविणार आहे.

डॉ. नितीन सावंत म्हणाले, खंडाळा तालुक्याचा पाणी प्रश्न व बेरोजगारीसंदर्भातील प्रश्नाबाबत आमदार अयशस्वी झाले आहेत. संपूर्ण सातारा जिल्हा हा कायम आपल्या सोबतच राहणार असून, भलेही पक्ष आणि पक्ष चिन्ह जरी हिसकावून घेतले असले, तरी साहेब तुम्हीच आमचा पक्ष, तुम्ही सांगाल तेच आमचं धोरण, तुम्ही बांधाल तेच आमचं तोरण. खासदार श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली.

कार्यक्रमाला अभिजित घोरपडे, रामदास कांबळे, नंदकुमार घाडगे, दत्ता चव्हाण, चंद्रकांत ढमाळ, प्रा. एस. वाय. पवार, नगरसेविका तृप्ती घाडगे, ज्योती डोनीकर, दीपाली नीलेश शेळके, माजी नगरसेविका शैलजा खरात, अजित यादव, योगेश क्षीरसागर व डॉ. नितीन सावंत विचार मंचचे अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

विचार महत्त्वाचा वयाचे काय ?माझे वय झाले म्हणून काय झाले, त्यांनी काय बघितलेय... वयाची चिंता तुम्ही करू नका, देशाने अनेक नेते पाहिलेत. मोरारजीभाई देसाई वयाच्या ८५ व्या वर्षी प्रधानमंत्री झाले. आपली विचारधारा जर भक्कम असेल तर वय आडवे येत नाही. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAgriculture Sectorशेती क्षेत्र