शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

लोणंदमध्ये शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन; "नव्या पिढीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा बदलणार" - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 22:25 IST

नव्या पिढीला शक्ती, अधिकार देऊन महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा ही पिढी बदलू शकते, हा इतिहास निर्माण करणार असल्याचा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

लोणंद : येथील कृषी महोत्सव शेतकऱ्यांना नवीन दिशा देणारा महोत्सव आहे. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन नवीन पिढीतील नवे नेतृत्व निर्माण करण्याचा मनोदय आहे. नव्या पिढीला शक्ती, अधिकार देऊन महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा ही पिढी बदलू शकते, हा इतिहास निर्माण करणार असल्याचा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

लोणंद येथील बाजार तळावर भरविण्यात आलेल्या शरद कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रोहित पवार, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, अभयसिंह जगताप, सारंग पाटील, प्रवीण गायकवाड, लक्ष्मण माने, दशरथ माने, सुनील गव्हाणे, सत्यजित पाटणकर, दीपक पवार, प्रभाकर देशमुख, सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, सत्ता येते सत्ता जाते, सत्ता ही कायमची नसते; पण विचार कायम राहतात. देशाला पुढे नेणारा कार्यक्रम राबविण्याची गरज असताना सत्ताधारी याकडे ढुंकूणही पाहत नाहीत. भारतीय संसद ही लोकशाहीची महत्त्वाची संस्था असताना पंधरा दिवसांच्या अधिवेशन काळात देशाचे पंतप्रधान फक्त एका तासासाठी येतात. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांनी अधिवेशन काळात संसदेत एक दिवसही चुकविला नाही.

रोहित पवार म्हणाले, हा महोत्सव होऊ नये म्हणून फोनाफोनी करणाऱ्या स्थानिक आमदारांना जनता अद्दल घडवेल. केवळ टीका करून शेतकऱ्यांचे हित न जपणाऱ्यांना या निवडणुकीत जनता धडा शिकविणार आहे.

डॉ. नितीन सावंत म्हणाले, खंडाळा तालुक्याचा पाणी प्रश्न व बेरोजगारीसंदर्भातील प्रश्नाबाबत आमदार अयशस्वी झाले आहेत. संपूर्ण सातारा जिल्हा हा कायम आपल्या सोबतच राहणार असून, भलेही पक्ष आणि पक्ष चिन्ह जरी हिसकावून घेतले असले, तरी साहेब तुम्हीच आमचा पक्ष, तुम्ही सांगाल तेच आमचं धोरण, तुम्ही बांधाल तेच आमचं तोरण. खासदार श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली.

कार्यक्रमाला अभिजित घोरपडे, रामदास कांबळे, नंदकुमार घाडगे, दत्ता चव्हाण, चंद्रकांत ढमाळ, प्रा. एस. वाय. पवार, नगरसेविका तृप्ती घाडगे, ज्योती डोनीकर, दीपाली नीलेश शेळके, माजी नगरसेविका शैलजा खरात, अजित यादव, योगेश क्षीरसागर व डॉ. नितीन सावंत विचार मंचचे अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

विचार महत्त्वाचा वयाचे काय ?माझे वय झाले म्हणून काय झाले, त्यांनी काय बघितलेय... वयाची चिंता तुम्ही करू नका, देशाने अनेक नेते पाहिलेत. मोरारजीभाई देसाई वयाच्या ८५ व्या वर्षी प्रधानमंत्री झाले. आपली विचारधारा जर भक्कम असेल तर वय आडवे येत नाही. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAgriculture Sectorशेती क्षेत्र