शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

लोणंदमध्ये शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन; "नव्या पिढीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा बदलणार" - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 22:25 IST

नव्या पिढीला शक्ती, अधिकार देऊन महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा ही पिढी बदलू शकते, हा इतिहास निर्माण करणार असल्याचा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

लोणंद : येथील कृषी महोत्सव शेतकऱ्यांना नवीन दिशा देणारा महोत्सव आहे. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन नवीन पिढीतील नवे नेतृत्व निर्माण करण्याचा मनोदय आहे. नव्या पिढीला शक्ती, अधिकार देऊन महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा ही पिढी बदलू शकते, हा इतिहास निर्माण करणार असल्याचा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

लोणंद येथील बाजार तळावर भरविण्यात आलेल्या शरद कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रोहित पवार, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, अभयसिंह जगताप, सारंग पाटील, प्रवीण गायकवाड, लक्ष्मण माने, दशरथ माने, सुनील गव्हाणे, सत्यजित पाटणकर, दीपक पवार, प्रभाकर देशमुख, सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, सत्ता येते सत्ता जाते, सत्ता ही कायमची नसते; पण विचार कायम राहतात. देशाला पुढे नेणारा कार्यक्रम राबविण्याची गरज असताना सत्ताधारी याकडे ढुंकूणही पाहत नाहीत. भारतीय संसद ही लोकशाहीची महत्त्वाची संस्था असताना पंधरा दिवसांच्या अधिवेशन काळात देशाचे पंतप्रधान फक्त एका तासासाठी येतात. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांनी अधिवेशन काळात संसदेत एक दिवसही चुकविला नाही.

रोहित पवार म्हणाले, हा महोत्सव होऊ नये म्हणून फोनाफोनी करणाऱ्या स्थानिक आमदारांना जनता अद्दल घडवेल. केवळ टीका करून शेतकऱ्यांचे हित न जपणाऱ्यांना या निवडणुकीत जनता धडा शिकविणार आहे.

डॉ. नितीन सावंत म्हणाले, खंडाळा तालुक्याचा पाणी प्रश्न व बेरोजगारीसंदर्भातील प्रश्नाबाबत आमदार अयशस्वी झाले आहेत. संपूर्ण सातारा जिल्हा हा कायम आपल्या सोबतच राहणार असून, भलेही पक्ष आणि पक्ष चिन्ह जरी हिसकावून घेतले असले, तरी साहेब तुम्हीच आमचा पक्ष, तुम्ही सांगाल तेच आमचं धोरण, तुम्ही बांधाल तेच आमचं तोरण. खासदार श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली.

कार्यक्रमाला अभिजित घोरपडे, रामदास कांबळे, नंदकुमार घाडगे, दत्ता चव्हाण, चंद्रकांत ढमाळ, प्रा. एस. वाय. पवार, नगरसेविका तृप्ती घाडगे, ज्योती डोनीकर, दीपाली नीलेश शेळके, माजी नगरसेविका शैलजा खरात, अजित यादव, योगेश क्षीरसागर व डॉ. नितीन सावंत विचार मंचचे अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

विचार महत्त्वाचा वयाचे काय ?माझे वय झाले म्हणून काय झाले, त्यांनी काय बघितलेय... वयाची चिंता तुम्ही करू नका, देशाने अनेक नेते पाहिलेत. मोरारजीभाई देसाई वयाच्या ८५ व्या वर्षी प्रधानमंत्री झाले. आपली विचारधारा जर भक्कम असेल तर वय आडवे येत नाही. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAgriculture Sectorशेती क्षेत्र