शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लोकसहभागातून उभारलेल्या आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:37 IST

वडूज : सातेवाडी येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्या ...

वडूज : सातेवाडी येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, डॉ. संतोष मोरे, उपसरपंच भाऊसाहेब बोटे, पोलीस पाटील विजया माने, तलाठी सुनील सत्रे तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

सातेवाडी येथे काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. धावाधाव करूनही येथील एका रुग्णाला ऑक्सिजनअभावी जिवाला मुकावे लागले. ही बाब गावकऱ्यांना खटकू लागली. त्यामुळे किमान आपल्या गावातील रुग्णांना तरी वेळेत ऑक्सिजन मिळावा, अशी गावकऱ्यांत चर्चा झाली. सरपंच वृषाली व त्यांचे पती विक्रम रोमन यांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांमध्ये चर्चा विनिमय झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनीही पाठबळ दिले.

ग्रामस्थांनी आयसोलेशन सेंटरसाठी कॉट, गाद्या, बेडशिट, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य लोकसहभागातून आणले. येथील जिल्हा परिषद शाळेत आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी पाच ऑक्सिजन बेड व दहा आयसोलेशन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.

येथील मयूर बबन बोटे हे मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) याठिकाणी आहेत. गावात आयसोलेशन सेंटर सुरू करत असल्याचे त्यांना समाजमाध्यमातून समजल्यानंतर त्यांनी सहकार्य केले. रोहित रोमन हे लष्करात सेवेत असणारे जवान गेल्या काही दिवसांपूर्वी सुट्टीनिमित्त गावी आले आहेत. त्यांनीही मदत केली. या आयसोलेशन सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.

प्रांताधिकारी कासार म्हणाले, ‘वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. अनेक रुणांना वेळेत ऑक्सिजन बेड मिळत नाहीत अशा काळात रुग्णाला तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन व आयसोलेशनची सोय या सेंटरचा माध्यमातून करण्यात आली आहे. सातेवाडी ग्रामस्थांनी सुरू केलेली ही संकल्पना स्तुत्य असून अन्य गावांनीही याचा आदर्श घ्यावा.’

सरपंच वृषाली रोमन म्हणाल्या, ‘वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे प्रशासन यंत्रणेवर ताण येत आहे. रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे रुग्णांना किमान काही काळापुरता तरी ऑक्सिजन मिळावा, त्यांना जीवनदान मिळावे यासाठी गावामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून व लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे.’