शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

धनगर समाजाचे फलटणमध्ये बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 22:53 IST

< p >फलटण : धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करावा, यासाठी निर्णायक लढा उभा करण्यासाठी फलटण तालुक्यातील तमाम धनगर समाजबांधवांच्या वतीने फलटण तहसील कार्यालयासमोर रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजाने सरकारविरोधात फलटणमधून रणसिंग फुंकल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.धनगर समाज बऱ्याच दिवसांपासून एसटी आरक्षणाची मागणी ...

<p>फलटण : धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करावा, यासाठी निर्णायक लढा उभा करण्यासाठी फलटण तालुक्यातील तमाम धनगर समाजबांधवांच्या वतीने फलटण तहसील कार्यालयासमोर रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजाने सरकारविरोधात फलटणमधून रणसिंग फुंकल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.धनगर समाज बऱ्याच दिवसांपासून एसटी आरक्षणाची मागणी करीत आहे. मात्र सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याने आणि बरीच वर्षे चालढकल झाल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत. धनगर बांधवांनी मराठा समाजाप्रमाणे निर्णायक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. येथील समाजाच्या विविध मान्यवरांनी एकत्र येत समाजासाठी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत येथील तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याबरोबर समाजातही जागृती घडवून समाज पेटून उठेल. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटतील, अशा पद्धतीने नियोजन करून रविवारी आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी आंदोलनस्थळी ठेवण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन महिला भगिनींच्या हस्ते करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात समाजबांधव आणि महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.अनेकांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. बारामतीला झालेल्या आंदोलनाच्या आठवणी अनेकांनी जागा केल्या. २०१४ रोजी बारामती येथे धनगर समाजाने मोठ्या प्रमाणावर आरक्षणाचा लढा उभा केला. समाजातील काही युवक नऊ दिवस उपोषणास बसले होते. त्या उपोषणाची सांगता करण्यासाठी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आमचे सरकार आल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ,’ असे आश्वासन दिले होते. चार वर्षांत कॅबिनेटच्या शेकडो बैठका झाल्या तरी आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. त्यांनी धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय काही केले नाही. जर तत्काळ आरक्षण दिले नाही तर या नाकर्ते सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही.सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांच्या नावाची मागणीसोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात यावे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी, मेंढी विकास महामंडळास आर्थिक तरतूद करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे संयोजकांनी स्पष्ट केले.