शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे फलटणमध्ये बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 22:53 IST

< p >फलटण : धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करावा, यासाठी निर्णायक लढा उभा करण्यासाठी फलटण तालुक्यातील तमाम धनगर समाजबांधवांच्या वतीने फलटण तहसील कार्यालयासमोर रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजाने सरकारविरोधात फलटणमधून रणसिंग फुंकल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.धनगर समाज बऱ्याच दिवसांपासून एसटी आरक्षणाची मागणी ...

<p>फलटण : धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करावा, यासाठी निर्णायक लढा उभा करण्यासाठी फलटण तालुक्यातील तमाम धनगर समाजबांधवांच्या वतीने फलटण तहसील कार्यालयासमोर रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजाने सरकारविरोधात फलटणमधून रणसिंग फुंकल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.धनगर समाज बऱ्याच दिवसांपासून एसटी आरक्षणाची मागणी करीत आहे. मात्र सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याने आणि बरीच वर्षे चालढकल झाल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत. धनगर बांधवांनी मराठा समाजाप्रमाणे निर्णायक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. येथील समाजाच्या विविध मान्यवरांनी एकत्र येत समाजासाठी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत येथील तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याबरोबर समाजातही जागृती घडवून समाज पेटून उठेल. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटतील, अशा पद्धतीने नियोजन करून रविवारी आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी आंदोलनस्थळी ठेवण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन महिला भगिनींच्या हस्ते करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात समाजबांधव आणि महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.अनेकांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. बारामतीला झालेल्या आंदोलनाच्या आठवणी अनेकांनी जागा केल्या. २०१४ रोजी बारामती येथे धनगर समाजाने मोठ्या प्रमाणावर आरक्षणाचा लढा उभा केला. समाजातील काही युवक नऊ दिवस उपोषणास बसले होते. त्या उपोषणाची सांगता करण्यासाठी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आमचे सरकार आल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ,’ असे आश्वासन दिले होते. चार वर्षांत कॅबिनेटच्या शेकडो बैठका झाल्या तरी आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. त्यांनी धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय काही केले नाही. जर तत्काळ आरक्षण दिले नाही तर या नाकर्ते सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही.सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांच्या नावाची मागणीसोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात यावे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी, मेंढी विकास महामंडळास आर्थिक तरतूद करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे संयोजकांनी स्पष्ट केले.