शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

धनगर समाजाचे फलटणमध्ये बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 22:53 IST

< p >फलटण : धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करावा, यासाठी निर्णायक लढा उभा करण्यासाठी फलटण तालुक्यातील तमाम धनगर समाजबांधवांच्या वतीने फलटण तहसील कार्यालयासमोर रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजाने सरकारविरोधात फलटणमधून रणसिंग फुंकल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.धनगर समाज बऱ्याच दिवसांपासून एसटी आरक्षणाची मागणी ...

<p>फलटण : धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करावा, यासाठी निर्णायक लढा उभा करण्यासाठी फलटण तालुक्यातील तमाम धनगर समाजबांधवांच्या वतीने फलटण तहसील कार्यालयासमोर रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजाने सरकारविरोधात फलटणमधून रणसिंग फुंकल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.धनगर समाज बऱ्याच दिवसांपासून एसटी आरक्षणाची मागणी करीत आहे. मात्र सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याने आणि बरीच वर्षे चालढकल झाल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत. धनगर बांधवांनी मराठा समाजाप्रमाणे निर्णायक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. येथील समाजाच्या विविध मान्यवरांनी एकत्र येत समाजासाठी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत येथील तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याबरोबर समाजातही जागृती घडवून समाज पेटून उठेल. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटतील, अशा पद्धतीने नियोजन करून रविवारी आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी आंदोलनस्थळी ठेवण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन महिला भगिनींच्या हस्ते करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात समाजबांधव आणि महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.अनेकांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. बारामतीला झालेल्या आंदोलनाच्या आठवणी अनेकांनी जागा केल्या. २०१४ रोजी बारामती येथे धनगर समाजाने मोठ्या प्रमाणावर आरक्षणाचा लढा उभा केला. समाजातील काही युवक नऊ दिवस उपोषणास बसले होते. त्या उपोषणाची सांगता करण्यासाठी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आमचे सरकार आल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ,’ असे आश्वासन दिले होते. चार वर्षांत कॅबिनेटच्या शेकडो बैठका झाल्या तरी आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. त्यांनी धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय काही केले नाही. जर तत्काळ आरक्षण दिले नाही तर या नाकर्ते सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही.सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांच्या नावाची मागणीसोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात यावे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी, मेंढी विकास महामंडळास आर्थिक तरतूद करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे संयोजकांनी स्पष्ट केले.