शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

ढगांच्या गडगडाटात सातारा शहर, फलटणला वळवाने झोडपले

By नितीन काळेल | Updated: April 19, 2023 18:23 IST

एका विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस : आठवड्यात सहावेळा  हजेरी; पाऊण तास बॅटिंग 

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहर आणि परिसराला बुधवारी सायंकाळी ५  वाजण्याच्या सुमारास वळवाच्या पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात जवळपास पाऊण तास पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले, तर रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. तर मंगळवारी फक्त साताऱ्यात पाऊस झाला नाही. मात्र मागील आठवड्यात सहावेळा वळीवाने हजेरी लावली आहे. पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे.    

फलटण शहर परिसरामध्ये देखील सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडडाटासह पाऊस सुरु झाला. यामुळे परिसरातील वीज गेली होती.

     सातारा जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. त्याचबरोबर उकाड्यातही कमालीची वाढ झालेली. त्यातच अधूनमधून ढगाळ वातावरणही तयार व्हायचे. त्यामुळे पावसाळा पोषक वातावरण तयार होत होते. याची सुरुवात मागील गुरुवारपासून झाली. त्यावेळी गुरुवारी जिल्ह्यातील मान,  खटाव, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तर पाटण तालुक्यातच एका ठिकाणी वीज पडण्याची घटना घडली होती. सातारा शहरातही पाऊस झाला होता. आठ दिवसाचा विचार करता सातारा शहरात सहा दिवस पाऊस पडलेला आहे. तर जिल्ह्यात दररोज कोणत्या कोणत्या भागात वळवाचा पाऊस हजेरी लावत आहे. यामध्ये अधिक करून गाराच अधिक पडतात. परिमेय शेती पिकांचे आणि फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ८ एप्रिलपासून आतापर्यंत सुमारे सात कोटी रुपयांचे पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. असे असतानाच पाऊस आणखी पाठ सोडण्यास तयार नाही. बुधवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. तसेच सातारा शहरातही जोरदार हजेरी लावली. 

   सातारा शहर आणि परिसरात बुधवारी  सकाळपासूनच उकाडा तीव्र होता. बारानंतर अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे पाऊस लवकरच पडणार असा अंदाज होता. दुपारी चारच्या सुमारास सातारा शहर आणि परिसरात आभाळ भरून आले. त्याचबरोबर ढगाचा गडगडाट सुरू झाला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी पावसाचे मोठमोठे थेंब पडू लागले.  त्यानंतर बघता बघता पावसाने जोर धरला. सुमारे पाऊण तास पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यावर पाणी वाहू लागले. तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांची त्रेधातिरपीट उडाली.  छोट्या विक्रेत्यांचेही नुकसान झाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. 

आंब्याचे नुकसान... सातारा शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी आंब्याची झाड लावली आहेत. तसेच रस्त्याच्या बाजूलाही झाडे आहेत. वारे आणि पावसामुळे आंबे गळून खाली पडत आहेत. बुधवारीही पावसामुळे आंबे खाली पडले.  परिणामी आंब्याचे नुकसान झाले. 

टॅग्स :Rainपाऊस