शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

कऱ्हाड कृषी प्रदर्शनावर ‘भाजप’ची छाप!

By admin | Updated: November 25, 2015 00:43 IST

राज्यस्तरीय प्रदर्शनाचे व्यासपीठ प्रथमच ‘कमळ’मय : निमंत्रणपत्रिकेत फक्त भाजप-सेनेचेच मंत्री, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची नावे ‘गायब’

प्रमोद सुकरे- कऱ्हाड -राज्यात जरी भाजप-सेना युतीचे सरकार असले तरी कोणत्याही कामाचे श्रेय भाजप मित्रपक्षालाही द्यायला तयार दिसत नाही. असाच काहीसा अनुभव कऱ्हाडात येत्या बुधवारी होणाऱ्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त येऊ लागलाय. कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ‘भाजप-सेने’च्याच सात मंत्र्यांची नावे अग्रक्रमाने आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची नावे पत्रिकेवरून गायब झाली आहेत. गेल्या बारा वर्षांची परंपरा प्रथमच खंडित केली गेली आहे.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्त गेली १२ वर्षे कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन भरविले जाते. यशवंतरावांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ नोव्हेंबरला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बहुतांशी मंत्रिमंडळ कऱ्हाडला त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करायला हजेरी लावते. त्यामुळे प्रत्येक वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होते. त्याच परंपरेनुसार गतवर्षीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते अन् यंदाही होणार आहे. मात्र संयोजकांनी छापलेल्या यंदाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजपचाच पगडा दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महसूल, कृषिमंत्री एकनाथ खडसे, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट, गृह व पर्यटन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे या भाजपच्या मंत्र्यांची नावे आहेत. तर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या विजय शिवतारे या एकमेव सेनेच्या मंत्र्याचे नाव पत्रिकेत आहे. हे कृषी प्रदर्शन शेती उत्पन्न बाजार समिती आयोजित करत असते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ही बाजार समिती काँग्रेसचे बंडखोर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी ताब्यात घेतली आहे. कदाचित त्यामुळे तर भाजपचा वरचष्मा दिसत नसेल? आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई व माथाडींचे नेते विधानपरिषद आमदार नरेंद्र पाटील वगळता जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निमंत्रण पत्रिकेवरून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे यशवंतरावांच्या कार्यभूमीत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या नावाने होणाऱ्या कृषी प्रदर्शनापासून जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीला जाणिवपूर्वक दूर ठेवल्याची चर्चा आहे; पण हे संयोजकांनी दूर ठेवले आहे की, भाजपच्या कोण्या नेत्याच्या सूचनेवरून दूर ठेवलंय, हे समजायला मार्ग नाही. वास्तविक, सातारा हा काँग्रेस-राष्ट्रवादी विचारांचा जिल्हा मानला जातो. येथे अपवाद वगळता सेनेचा भगवा फारसा कधी फडकला नाही, तर भाजपचे कमळही कधी फुललेले दिसत नाही. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांना धडा शिकविण्याचा तरी डाव नसेल ना, अशीही शंका उपस्थित होत आहे. यावर्षी खासदार उदयनराजे भोसले, स्थानिक आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील कोणत्याच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदाराचे नाव निमंत्रण पत्रिकेत दिसत नाही. ही भाजपची खेळी आहे की, शेती उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झालेल्या नेत्यांची स्थानिक सोय, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. कऱ्हाड बाजार समिती आयोजक असली तरी सह आयोजक म्हणून राज्य शासनाचा कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग यांच्यासह जिल्हा परिषदेचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेवर दिसतो. शासनाचे पणन मंडळ, कृषी औद्योगिक विकास महामंडळ, राज्य वखार महामंडळ, फलोत्पादन व औषधी वनस्पती महामंडळ व बँक आॅफ महाराष्ट्र हे याचे मुख्य प्रायोजक आहेत. कृषी प्रदर्शनात शासनाचा सहभाग असल्यामुळे निमंत्रण पत्रिकेवर स्थानिक आमदारांसह जिल्ह्यातील आमदारांची नावे आवश्यक असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील मात्र अध्यक्ष निमंत्रण पत्रिकेत जिल्ह्यातील काँगेंस- राष्ट्रवादीच्या आमदारांची नावे नसताना नजीकच्या सांगली जिल्ह्यातील वाळव्याचे आमदार, राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंतराव पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्यामुळे याचीही जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.