शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नगररचना योजना राबविण्याचा महत्वपूर्ण ठराव

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

मलकापूर नगरपंचायत सभा : ‘डीपीडीसी’मधून चाळीस कोटी निधी देण्याच्या मागणीचाही ठराव

मलकापूर : सुधारित शहर विकास आराखड्यांतर्गत अहमदाबाद पॅटर्नप्रमाणे मलकापूर शहरात टी. पी. (नगररचना) योजना लागू करण्यास राष्ट्रपतींनी अंतीम मंजुरी दिली आहे. ही योजना राज्यात प्रथमच मलकापूर नगरपंचायतीमध्ये लागू होत आहे. ती अंमलात आणण्याचा महत्वपूर्ण ठराव मंगळवारी नगरपंचायतीच्या सभेत करण्यात आला. याशिवाय ‘डीपीडीसी’मधून नागरी भागास ४० कोटी निधी देण्याच्या मागणीचा ठरावही सभेत सर्वानुमते करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनंदा साठे होत्या. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राजेंद्र तेली व सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. नगरपंचायत सभागृहात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सभेला प्रारंभ झाला. विषय पत्रिकेवरील १५ व ऐनवेळचे ३ अशा एकूण १८ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये विषय क्र. १३ हा मलकापूर शहराच्यादृष्टीने महत्वाचा ठरला. सुधारीत शहरविकास आराखड्यांतर्गत कोणत्याही एका जमिन मालकावर अन्याय होऊ नये म्हणून अहमदाबाद पॅटर्नप्रमाणे जमीन एकत्रिकरण करून विकास करण्यासाठी टी. पी. योजना नगरपालिकांनाही लागू करावी, अशी मागणी मलकापूर नगरपंचायतीने केंद्र शासनाकडे केली होती. त्याबाबत १७ नोव्हेंबर २०१४ ला अध्यादेश काढण्यात आला होता. या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी नुकतीच अंतीम मंजुरी दिली आहे. ही योजना देशातील सर्व नगरपालिकांना लागू झाली असल्याचे पत्र मलकापूरला प्राप्त झाले आहे. राज्यात सर्वप्रथम मलकापुरात ही योजना अमलात आणण्याचा ठराव सभेत करण्यात आला.जिल्हा नियोजन मंडळामार्फत ९ नगरपालिकांची नागरी लोकसंख्या विचारात घेता लोकसंख्येच्या प्रमाणात एकुण निधीच्या १८ टक्के म्हणजेच ४० कोटीच्या आसपास निधी नगरपालिकांना द्यावा. ‘क’ वर्ग नगरपालिकांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांना जादा निधी मिळावा, अशी मागणी करण्याचा ठरावही या सभेत घेण्यात आला.याशिवाय शहरात वीज बचतीसाठी २९९ एल. ई. डी. दिवे बसविणे, नविन प्रशासकीय इमारत व अग्निशामक इमारतीच्या जागेस कुंपन घालणे, स्मशानभूमी, दफनभूमी संरक्षक भिंत बांधणे, शिक्षण व रोजगार हमी कर योग्य रकमेवर आकारण्यासाठी शासनाकडे मागणी करणे, अशा सर्व विषयांना सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली. (वार्ताहर)मलकापूर शहरासाठी शासनाकडून कोट्यावधी निधी उपलब्ध झाला आहे. किरकोळ अडचणी असल्यामुळे काही कामे थांबली आहेत. उपलब्ध निधीचा शहरासाठी वेळेत वापर व्हावा म्हणून ही कामे वेळेतच मार्गी लावणे गरजेचे आहे. घनकचरा, सांडपाणी व विकास आराखड्यातील रस्ते अशा मुलभूत सुविधा वेळेत मार्गी लावण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.