शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

नगररचना योजना राबविण्याचा महत्वपूर्ण ठराव

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

मलकापूर नगरपंचायत सभा : ‘डीपीडीसी’मधून चाळीस कोटी निधी देण्याच्या मागणीचाही ठराव

मलकापूर : सुधारित शहर विकास आराखड्यांतर्गत अहमदाबाद पॅटर्नप्रमाणे मलकापूर शहरात टी. पी. (नगररचना) योजना लागू करण्यास राष्ट्रपतींनी अंतीम मंजुरी दिली आहे. ही योजना राज्यात प्रथमच मलकापूर नगरपंचायतीमध्ये लागू होत आहे. ती अंमलात आणण्याचा महत्वपूर्ण ठराव मंगळवारी नगरपंचायतीच्या सभेत करण्यात आला. याशिवाय ‘डीपीडीसी’मधून नागरी भागास ४० कोटी निधी देण्याच्या मागणीचा ठरावही सभेत सर्वानुमते करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनंदा साठे होत्या. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राजेंद्र तेली व सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. नगरपंचायत सभागृहात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सभेला प्रारंभ झाला. विषय पत्रिकेवरील १५ व ऐनवेळचे ३ अशा एकूण १८ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये विषय क्र. १३ हा मलकापूर शहराच्यादृष्टीने महत्वाचा ठरला. सुधारीत शहरविकास आराखड्यांतर्गत कोणत्याही एका जमिन मालकावर अन्याय होऊ नये म्हणून अहमदाबाद पॅटर्नप्रमाणे जमीन एकत्रिकरण करून विकास करण्यासाठी टी. पी. योजना नगरपालिकांनाही लागू करावी, अशी मागणी मलकापूर नगरपंचायतीने केंद्र शासनाकडे केली होती. त्याबाबत १७ नोव्हेंबर २०१४ ला अध्यादेश काढण्यात आला होता. या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी नुकतीच अंतीम मंजुरी दिली आहे. ही योजना देशातील सर्व नगरपालिकांना लागू झाली असल्याचे पत्र मलकापूरला प्राप्त झाले आहे. राज्यात सर्वप्रथम मलकापुरात ही योजना अमलात आणण्याचा ठराव सभेत करण्यात आला.जिल्हा नियोजन मंडळामार्फत ९ नगरपालिकांची नागरी लोकसंख्या विचारात घेता लोकसंख्येच्या प्रमाणात एकुण निधीच्या १८ टक्के म्हणजेच ४० कोटीच्या आसपास निधी नगरपालिकांना द्यावा. ‘क’ वर्ग नगरपालिकांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांना जादा निधी मिळावा, अशी मागणी करण्याचा ठरावही या सभेत घेण्यात आला.याशिवाय शहरात वीज बचतीसाठी २९९ एल. ई. डी. दिवे बसविणे, नविन प्रशासकीय इमारत व अग्निशामक इमारतीच्या जागेस कुंपन घालणे, स्मशानभूमी, दफनभूमी संरक्षक भिंत बांधणे, शिक्षण व रोजगार हमी कर योग्य रकमेवर आकारण्यासाठी शासनाकडे मागणी करणे, अशा सर्व विषयांना सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली. (वार्ताहर)मलकापूर शहरासाठी शासनाकडून कोट्यावधी निधी उपलब्ध झाला आहे. किरकोळ अडचणी असल्यामुळे काही कामे थांबली आहेत. उपलब्ध निधीचा शहरासाठी वेळेत वापर व्हावा म्हणून ही कामे वेळेतच मार्गी लावणे गरजेचे आहे. घनकचरा, सांडपाणी व विकास आराखड्यातील रस्ते अशा मुलभूत सुविधा वेळेत मार्गी लावण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.