शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अवकाळी पावसाचा पिकांवर परिणाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

आदर्की : फलटण पश्चिम भागात ३ ते ७ जानेवारीदरम्यान कमी-जास्त प्रमाणात पावसाच्या सरी व दाट धुके पडल्याचा परिणाम झाल्याचे ...

आदर्की : फलटण पश्चिम भागात ३ ते ७ जानेवारीदरम्यान कमी-जास्त प्रमाणात पावसाच्या सरी व दाट धुके पडल्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पावसाने ज्वारीची कणसे काळी पडली असून, गहू, हरभरा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. आंब्याचे मोहर जळाल्याने रब्बी हंगाम वाया जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

फलटण पश्चिम तालुक्यातील आदर्की महुसली मंडलात अधूनमधून पावसाच्या सरी, रिमझिम पाऊस, दाट धुके, वारा, थंडी पडल्याने ज्वारीची कणसे काळी पडून फुलोऱ्यातच जळाला आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादनात घट होणार आहे तर ज्वारी काळी पडून भाकरीची चव बदलणार आहे. गहू पिकावरही तांबेरा व मावा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. हरभरा पीक घाटे

भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे घाट्यावर अळी पडणार आहे. आंब्याला मोहर येत असताना पाऊस व धुके पडल्याने मोहर जळाला आहे. कांदा पिकावर करपा रोग पडल्याचे दिसत आहे. विचित्र हवामानामुळे पिकावर परिणाम झाल्यामुळे सलग तीन वर्षे रब्बी हंगाम वाया जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

१२ आदर्की

फोटो : अवकाळी पावसाने हिंगणगाव, सासवड, बिबी, आदर्की परिसरात ज्वारीची कणसे काळी पडली आहेत.