शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

अवैध वाळू उपशाने बंधाऱ्याला गळती !

By admin | Updated: April 2, 2017 23:05 IST

अस्तित्वालाच सुरुंग : पाणी संपल्याने शिरवळमधील शेतकऱ्यांसमोर समस्या

शिरवळ : शिरवळ गावच्या हद्दीत फुलमळा या ठिकाणी असणाऱ्या पाणी साठवण बंधाऱ्याला अवैध वाळू उपशामुळे गळती लागली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये बंधाऱ्यामध्ये पाणी न राहिल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, वाळू उपशामुळे बंधाऱ्याच्या अस्तित्वालाच सुरुंग लागला आहे. शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये फुलमळ्यालगत असणाऱ्या मांड ओढ्यावर तत्कालीन आमदार मदन भोसले यांच्या माध्यमातून २००५ मध्ये १५ लाख रुपये खर्चून पाणी साठवण बंधारा उभारण्यात आला होता. त्यावेळी साठवण बंधारा उभारल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक झाल्याने शेतकऱ्यांना साठवण बंधारा हा वरदान ठरला. या बंधाऱ्यामुळे विहिरींना पाणीही मुबलक राहत असल्याने शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न संपला होता. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे साठवण बंधाऱ्यामध्ये अवैध वाळू उपसा होत होता. परिणामी साठवण बंधाऱ्याला गळती लागली असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. या ठिकाणी दररोज अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याने बंधाऱ्यांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. साठवण बंधाऱ्याला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असून, बंधाऱ्यांमध्ये केवळ पाण्याचे डबके शिल्लक राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, या ठिकाणी ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या समस्यांना व टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या ठिकाणी वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत असल्याने बंधाऱ्याच्या अस्तित्वालाच या ठिकाणी सुरुंग लागला आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून तसेच संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ करत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. साठवण बंधाऱ्याला गळती लागल्याने येथील विहिरींनाही पाण्याची कमतरता उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीला पाणी पुरवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या साठवण बंधाऱ्यामध्ये गाळाचे साम्राज्य पसरले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे गाळ उपसा करण्याची तोंडी मागणी केली. त्यावेळी संबंधितांकडून जाणीवपूर्वक उपसा केल्यास कारवाईची भीती दाखविण्यात आली. परिणामी मागणीकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने प्रशासनाने जलयुक्त शिवारांतर्गत अथवा कोणत्याही योजनेअंतर्गत गाळ उपसा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे प्रशासन व संबंधित विभागाने अवैध वाळू उपशाला पायबंद घालावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी) शिरवळ येथील साठवण बंधाऱ्याला लागलेल्या गळतीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन व संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन साठवण बंधाऱ्याची गळती थांबवून शेतकऱ्यांना न्याय देणे आवश्यक आहे. प्रशासनाने मागणीची दखल न घेतल्यास शिरवळ ग्रामस्थ आंदोलन करतील. याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनाची राहील. - विजय पवार, ग्रामपंचायत सदस्य शिरवळ येथील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या साठवण बंधाऱ्याच्या गळतीकडे संबंधितांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दाखल घेतली गेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साठवण बंधाऱ्यामधून पाणी गळती होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. - उमेश गिरमे, सामाजिक कार्यकर्ते