शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वृक्षतोडीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:03 IST

गर्दीत मास्कचा वापर सातारा : सातारा शहरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र त्या गर्दीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये ...

गर्दीत मास्कचा वापर

सातारा : सातारा शहरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र त्या गर्दीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून असंख्य सुज्ञ नागरिक मास्कचा वापर करत आहेत. मात्र, अनेक कापड विक्रेते मात्र मास्कचा नीट वापर करत नाहीत किंवा हनुवटीजवळ मास्क घेत असतात.

कुत्र्यांची झुंड

सातारा : शहरात जागोजागी कुत्र्यांच्या झुंडी फिरत आहेत. या कुंडीतील श्वान वाहनधारकांवर हल्ला करताना पाहायला मिळत आहेत. रस्त्याने चालणाऱ्या लोकांनादेखील त्रास सोसावा लागत आहे. मात्र, सातारा नगरपालिकेने या समस्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.

रस्त्यावर पाण्याचे तळे

सातारा : शहरात अनेक रस्त्यांची चाळण झालेली आहे. रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यात पाणी साचून राहत आहे तसेच तुंबलेली गटारे पालिकेने साफ केलेली नाहीत. त्यामुळे गटारातील पाणी रस्त्यावर खड्ड्यांत साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

खड्ड्यांतून प्रवास...

सातारा : सातारा शहरातील महादरे -मंगळवार तेळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतूनच वाहनधारकांना जावे लागत आहे. पाऊस पडला की या परिसरात खड्डा पडतो. पाणी साचून राहिल्यानंतर वाहने जाऊन खड्डा आणखी मोठा होतो. येथील खड्डे डांबरीकरणाने मुजवावेत, अशी मागणी होत आहे.

सीसीटीव्हीची मागणी

सातारा : जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी गर्दी होत असते. त्याचा फायदा घेऊन पाकीट मारणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागायला नको म्हणून अनेकजण गुन्हे दाखल करत नाहीत. दरम्यान, शहरातील गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

नागरिकांकडून अस्वच्छता

सातारा : सातारा शहरातील अनेक चौकांमधील स्वच्छतागृहांशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी परिसरातील काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात तर भटकी कुत्री कचरा विखरून टाकत असतात. कधी-कधी हा कचरा रस्त्यावर येतो.

महामार्गाचे काम पूर्ण करा

सातारा : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांतून होऊ लागली आहे. सातारा-पंढरपूर या महामार्गाचे काम सुरू होऊन अनेक वर्षे होत आली. पण, अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वन्यप्राण्यांचा वावर

बामणोली : कास परिसरात तरस या वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

पुलाखाली अतिक्रमण

जनावरे रस्त्यावर...

कोरेगाव : शहरात मोठ्या संख्येने मोकाट गायींचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. शहरातील दुभाजकांवरतीच या मोकाट गायी बसत असल्याने त्यांचा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे. परिणामी वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

टरबुजाची मागणी वाढली

वाई : आहारासाठी उत्तम असलेल्या टरबूज फळाची मोठ्या प्रमाणात सध्या येथील बसस्थानक व मंडई परिसरात विक्री केली जात आहे. अगदी स्वस्त दराने टरबुजाची विक्री केली जात असल्याने याची खरेदीही मोठ्या प्रमाणात नागरिक करीत आहेत.

रस्त्यांची चाळण

सातारा : चारभिंती ते शाहूनगर येथील रस्ता लवकरात-लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे.

रस्त्याकडेला अतिक्रमण

सातारा : येथील भूविकास बॅंक ते मेढा रोडवरील परिसरात अनेकजण रस्त्याकडेला चायनीज, वडापाव तसेच फळविक्रेते व साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी विद्यार्थी व प्रवाशांना रस्त्यावरून चालावे लागत आहेत.

कचऱ्याचे साम्राज्य

शिरवळ : पुणे-बंगलोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे नागरिक व प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अस्वच्छतेमुळे साथीचे रोग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.