शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही वात पेटवा...या अग्नीतून सरकार पेटेल! : शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँगे्रसचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:53 IST

सातारा : ‘सातारा जिल्हा हा सवतीचा जिल्हा असल्यासारखी वागणूक राज्यातील देवेंद्र सरकार देत आहे. जिल्'ातून ९०० कोटी रुपयांचा महसूल शासनाला जातो. मात्र

सातारा : ‘सातारा जिल्हा हा सवतीचा जिल्हा असल्यासारखी वागणूक राज्यातील देवेंद्र सरकार देत आहे. जिल्'ातून ९०० कोटी रुपयांचा महसूल शासनाला जातो. मात्र जिल्'ातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्याची दानक सरकारमध्ये नाही. पालकमंत्री हतबल आहेत, अधिकारीही हतबल आहेत, आता तुम्हीच सरकारविरोधात वात पेटवा, या अग्नीतून सरकार पेटवा,’ असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे केले.

जिल्'ातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या वतीने वीज वितरण कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे भव्य सभा घेण्यात आली. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सभापती शिवाजीराव सर्वगौड, वनीता गोरे, जिल्हा परिषद सदस्य जयवंत भोसले, मंगेश धुमाळ, किरण साबळे-पाटील, अ‍ॅड. नितीन भोसले, राजकुमार पाटील, श्रीनिवास शिंदे, बाळासाहेब महामुलकर, गोरख नलावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, ‘जिल्'ातील शेतकºयांनी वीज पंपाची वीज घेण्यासाठी २५ कोटी रुपये वीज कंपनीकडे जमा आहेत. तब्बल १३ हजार शेतकºयांनी वीज कनेक्शनची मागणी केली. तरीदेखील विदर्भाचा बॅकलॉग पुढे करत शेतकºयांवर अन्याय केला जातोय. वीज कनेक्शन दिली जात नाहीत. जिल्'ातील ९० टक्के वीज बिल वसुली असतानाही राज्याच्या थकबाकी दाखवून लोकांची दिशाभूल केली जाते. आम्ही आता वीज बिल भरू नका म्हणून जनतेला आव्हान करणार आहोत. कोण वीज तोडायला आला तर त्याला करंट देऊ, संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. ती मिळेपर्यंत राष्ट्रवादी सरकारला सोडणार नाही. या सरकारने अनेक पापी पुण्यवान करून घेतले. २६ मंत्री भ्रष्टाचारात अडकले असले तरी अजूनही मुख्यमंत्री म्हणतात आमचे सरकार क्लीन आहे. हे सरकारच बेशरम आहे.राष्ट्रवादीविरोधात बळाचा वापरराष्ट्रवादी काँगे्रसविरोधात सरकार बळाचा वापर करत आहे. राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्याविरोधात मोक्का लावत असताना वरून प्रेशर वापरले गेले. राजकीय व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त करण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी. सर्वसामान्य शेतकºयांची जमीन जात असताना त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाºयांवर मोक्का लावला जातो. हे दुर्दैवी आहे. त्यांच्या मोक्याचा फेरविचार केला जावा, अशी मागणीही आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकाºयांशी चर्चेत केली.