शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

...तर माढ्याला पाणी नाही!

By admin | Updated: December 26, 2014 23:49 IST

शंभूराज देसार्इंचा इशारा : अगोदर धरण क्षेत्रात पाणी द्या

कऱ्हाड : ‘तारळीचे पाणी बंद कॅनॉलमधून माढा मतदारसंघाला नेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाणी द्यायला आमचा विरोध नाही. मात्र, त्याच वेळी धरण जेथे झाले, त्या लगतचे ७५ टक्के क्षेत्र कोरडी ठेवून हे पाणी जाणार असेल, तर ते आम्ही चालू देणार नाही,’ असा इशारा आमदार शंभूराज देसाई यांनी दिला.कऱ्हाड विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवदौलत बँकेचे चेअरमन अ‍ॅड. मिलिंद पाटील, कऱ्हाड खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण यांची उपस्थिती होती.आ. देसाई म्हणाले, ‘माळीण दुर्घटनेच्या अनुषंगाने तालुक्यातील बोरगेवाडी, जिमनवाडी गावांचे पुनर्वसन व्हावे, अशी लक्षवेधी सूचना मांडली. तारळी, मराठवाडी व कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे उपसा जलसिंचन मंत्री गिरीश महाजन पुढील महिन्यात तालुक्याचा दौरा करणार आहेत. कोयना भूकंपग्रस्तांना दाखले पूर्ववत सुरू करावे, राज्याला वीज पुरवणारे कोयना धरण तालुक्यात असल्यामुळे किमान तालुका पूर्णत: भारनियमनमुक्त व्हावा, तालुक्याच्या क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न दहा वर्षांपासून प्रलंबित असून, यासाठी शासकीय जागा मिळत नसल्याने हे एखाद्या शिक्षण संस्थेच्या जागेमध्ये उभारावे व त्याची देखभाल संस्थेकडे सोपवावी. तालुक्यात १६ आरोग्य केंद्रे व ६० उपकेंद्रे आहेत. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असून, किमान डोंगरी भागामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी असावा, तसेच साखर कारखानदारांना किमान एखादीआरपी देता यावी, यासाठी केंद्राने अनुदान द्यावे,’ अशा सूचना तारांकित व लक्षवेधी प्रश्नामध्ये मांडल्या असून, शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे आमदार देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चुकीचे असेल ते बंद करू...भाजप-शिवसेना युती शासनाच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात १६ प्रश्न उपस्थित करून मतदारसंघातील अनेक प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका मी बजावली. त्याचबरोबर कृष्णा खोरे कालव्याचे काम पाटण तालुक्यात चुकीच्या पद्धतीने झाले आहे. याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना दिली असून, त्यांनी तत्काळ या भागाचा दौरा करून ‘जे चुकीचे झाले असेल ते बंद करू,’ असे आश्वासन दिले आहे, अशी माहितीही आमदार देसाई यांनी यावेळी दिली.