शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

"हिंमत असेल, तर सरकार पाडून दाखवा! अडीच वर्षे सरकार कोण चालवत होते, हे सर्वांना माहीत आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 10:40 IST

आम्ही कसोटी खेळणारे नाही तर वन-डे, २०/२० खेळणारे खेळाडू आहोत. कमी बाॅलमध्ये जादा रन कशा काढायच्या, हे आम्हाला चांगले माहीत आहे. त्यामुळे अडीच वर्षांमध्ये राज्यातील सरकार पथदर्शी काम करून दाखवेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कऱ्हाड (जि. सातारा) : ‘राज्यातील सरकार अडीच वर्षे नक्की कोण चालवत होते, हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेचे सरकार असतानाही शिवसैनिकांवरच अन्याय होत होता. म्हणून या ५० बहाद्दरांनी मला हा निर्णय घ्यायला लावला. गेल्या चार महिन्यांत आम्ही लोकहिताचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे विरोधकांचा जळफळाट होत आहे. काहीही टीका सुरू आहे; पण त्यांनी टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर हे सरकार पाडून दाखवावे,’ असे आव्हान मुख्यमंत्री  शिंदे यांनी  दिले.

कऱ्हाड येथे शुक्रवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह त्यांच्या आघाडीच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार महेश शिंदे उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘गद्दारी केली, असा आरोप आमच्यावर करतात; पण खरे तर टीका करणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. आम्ही त्याला कामाने उत्तर देत आहोत. हा मिंदे गट नव्हे, तर हा बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा शिंदे गट आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, एक दिवस पंतप्रधान करा. मी काश्मीरमधील ३७० कलम हटवून दाखवतो. ते तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हाच विश्वास मी सगळ्यांना देतोय. तो लोकांना पटतोय. म्हणून तर दररोज पक्षप्रवेश होत आहेत.’

आम्ही वन-डे खेळणारे -आम्ही कसोटी खेळणारे नाही तर वन-डे, २०/२० खेळणारे खेळाडू आहोत. कमी बाॅलमध्ये जादा रन कशा काढायच्या, हे आम्हाला चांगले माहीत आहे. त्यामुळे अडीच वर्षांमध्ये राज्यातील सरकार पथदर्शी काम करून दाखवेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यात कृषी उद्योग उभारणार! -‘रावणाला दहा तोंडे होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शंभर तोंडे आहेत म्हणूनच कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्त उत्पन्न कसे मिळेल, याकडे कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी सातारा जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी इंडस्ट्रीज साकारणार आहोत’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना