शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

"हिंमत असेल, तर सरकार पाडून दाखवा! अडीच वर्षे सरकार कोण चालवत होते, हे सर्वांना माहीत आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 10:40 IST

आम्ही कसोटी खेळणारे नाही तर वन-डे, २०/२० खेळणारे खेळाडू आहोत. कमी बाॅलमध्ये जादा रन कशा काढायच्या, हे आम्हाला चांगले माहीत आहे. त्यामुळे अडीच वर्षांमध्ये राज्यातील सरकार पथदर्शी काम करून दाखवेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कऱ्हाड (जि. सातारा) : ‘राज्यातील सरकार अडीच वर्षे नक्की कोण चालवत होते, हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेचे सरकार असतानाही शिवसैनिकांवरच अन्याय होत होता. म्हणून या ५० बहाद्दरांनी मला हा निर्णय घ्यायला लावला. गेल्या चार महिन्यांत आम्ही लोकहिताचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे विरोधकांचा जळफळाट होत आहे. काहीही टीका सुरू आहे; पण त्यांनी टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर हे सरकार पाडून दाखवावे,’ असे आव्हान मुख्यमंत्री  शिंदे यांनी  दिले.

कऱ्हाड येथे शुक्रवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह त्यांच्या आघाडीच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार महेश शिंदे उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘गद्दारी केली, असा आरोप आमच्यावर करतात; पण खरे तर टीका करणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. आम्ही त्याला कामाने उत्तर देत आहोत. हा मिंदे गट नव्हे, तर हा बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा शिंदे गट आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, एक दिवस पंतप्रधान करा. मी काश्मीरमधील ३७० कलम हटवून दाखवतो. ते तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हाच विश्वास मी सगळ्यांना देतोय. तो लोकांना पटतोय. म्हणून तर दररोज पक्षप्रवेश होत आहेत.’

आम्ही वन-डे खेळणारे -आम्ही कसोटी खेळणारे नाही तर वन-डे, २०/२० खेळणारे खेळाडू आहोत. कमी बाॅलमध्ये जादा रन कशा काढायच्या, हे आम्हाला चांगले माहीत आहे. त्यामुळे अडीच वर्षांमध्ये राज्यातील सरकार पथदर्शी काम करून दाखवेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यात कृषी उद्योग उभारणार! -‘रावणाला दहा तोंडे होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शंभर तोंडे आहेत म्हणूनच कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्त उत्पन्न कसे मिळेल, याकडे कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी सातारा जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी इंडस्ट्रीज साकारणार आहोत’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना