शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

"हिंमत असेल, तर सरकार पाडून दाखवा! अडीच वर्षे सरकार कोण चालवत होते, हे सर्वांना माहीत आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 10:40 IST

आम्ही कसोटी खेळणारे नाही तर वन-डे, २०/२० खेळणारे खेळाडू आहोत. कमी बाॅलमध्ये जादा रन कशा काढायच्या, हे आम्हाला चांगले माहीत आहे. त्यामुळे अडीच वर्षांमध्ये राज्यातील सरकार पथदर्शी काम करून दाखवेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कऱ्हाड (जि. सातारा) : ‘राज्यातील सरकार अडीच वर्षे नक्की कोण चालवत होते, हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेचे सरकार असतानाही शिवसैनिकांवरच अन्याय होत होता. म्हणून या ५० बहाद्दरांनी मला हा निर्णय घ्यायला लावला. गेल्या चार महिन्यांत आम्ही लोकहिताचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे विरोधकांचा जळफळाट होत आहे. काहीही टीका सुरू आहे; पण त्यांनी टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर हे सरकार पाडून दाखवावे,’ असे आव्हान मुख्यमंत्री  शिंदे यांनी  दिले.

कऱ्हाड येथे शुक्रवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह त्यांच्या आघाडीच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार महेश शिंदे उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘गद्दारी केली, असा आरोप आमच्यावर करतात; पण खरे तर टीका करणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. आम्ही त्याला कामाने उत्तर देत आहोत. हा मिंदे गट नव्हे, तर हा बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा शिंदे गट आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, एक दिवस पंतप्रधान करा. मी काश्मीरमधील ३७० कलम हटवून दाखवतो. ते तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हाच विश्वास मी सगळ्यांना देतोय. तो लोकांना पटतोय. म्हणून तर दररोज पक्षप्रवेश होत आहेत.’

आम्ही वन-डे खेळणारे -आम्ही कसोटी खेळणारे नाही तर वन-डे, २०/२० खेळणारे खेळाडू आहोत. कमी बाॅलमध्ये जादा रन कशा काढायच्या, हे आम्हाला चांगले माहीत आहे. त्यामुळे अडीच वर्षांमध्ये राज्यातील सरकार पथदर्शी काम करून दाखवेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यात कृषी उद्योग उभारणार! -‘रावणाला दहा तोंडे होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शंभर तोंडे आहेत म्हणूनच कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्त उत्पन्न कसे मिळेल, याकडे कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी सातारा जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी इंडस्ट्रीज साकारणार आहोत’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना